शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
3
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
4
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
5
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
6
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
7
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
8
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
9
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
10
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
11
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
12
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
13
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
14
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
15
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
16
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
17
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
18
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
19
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
20
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले

ग्रामपंचायत विभागाचे कामकाज पेपरलेसकडे

By admin | Updated: December 22, 2016 00:58 IST

ई-मेलवर कामांची माहिती मागविली

गणेश धुरी : नाशिकदेश आणि राज्य कॅशलेसकडे वाटचाल करीत असताना आणि देशाच्या पंतप्रधानांनी डिजिटल इंडियाचा नारा दिलेला असताना, जिल्हा परिषदेच्या एका विभागाने त्यादृष्टीने वाटचाल सुरू केली आहे. ग्रामपंचायत विभागाचा कारभार जास्तीत जास्त पेपरलेस होण्यासाठी विभागातील सर्वच कर्मचाऱ्यांकडून त्यांच्या कामकाजाची माहिती ई-मेलवर मागविण्यास सुरुवात केली आहे.ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील यांनी विभागातील सहायक गटविकास अधिकारी रत्नाकर पवार, कार्यालयीन अधीक्षक प्रकाश थेटे यांच्यासह सर्व वीस सहकाऱ्यांना त्यांच्या दैनंदिन कामकाजाची माहिती ई-मेलवर देण्यास सांगितले आहे. त्यासाठी विशिष्ट प्रपत्रात त्यांनी विभागातील कर्मचाऱ्यांकडून माहिती मागवून रत्नाकर पवार व प्रकाश थेटे यांचे वैयक्तिक ई-मेल वगळता अन्य १८ कर्मचाऱ्यांना स्वतंत्रपणे ग्रामपंचायत विभागाचे ई-मेल तयार केले आहे. विशिष्ट प्रपत्रात कोणाकडे कोणते काम आहे, त्याने ते किती दिवसात करणे अपेक्षित आहे, कोणती नस्ती कोणाकडे प्रलंबित आहे, त्या नस्तीला विलंब का झाला, यासह सर्व बारीक सारीक तपशील या माहितीपत्रात असणार असल्याचे समजते. तसेच सर्वच कर्मचाऱ्यांनी त्यांना द्यावयाची माहिती त्यांच्या मेलवर (संकेतस्थळावर) देणे अपेक्षित  आहे.  या सर्व ई-मेलवरील विभागातील कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीचे संकलन करण्यासाठी एका स्वतंत्र कर्मचाऱ्याची नेमणूक केली आहे. या कर्मचाऱ्याकडे एक लॅपटॉप देण्यात आला आहे. ग्रामपंचायत विभागाने अन्य विभागांवर आघाडी घेत कारभार पेपरलेस करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)