शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या संसर्गामुळे मजुरांनी घेतली धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:14 IST

नाशिक : जिल्ह्यातील कळवण, मालेगाव, सटाणा, देवळा, चांदवड, निफाड, दिंडोरी आणि सिन्नर तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कांदा लागवड करण्यात आली ...

नाशिक : जिल्ह्यातील कळवण, मालेगाव, सटाणा, देवळा, चांदवड, निफाड, दिंडोरी आणि सिन्नर तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कांदा लागवड करण्यात आली असून, सध्या उन्हाळ कांदा काढण्याचे काम सुरू आहे. परंतु, मजुरांनी कोरोनाच्या संसर्गाची धास्ती घेतली असून, शेतीच्या कामासाठी मजूरच मिळत नसल्याने शेतीची कामे रेंगाळल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे.

कसमादे पट्ट्यासह लगतच्या तालुक्यांमध्ये सध्या उन्हाळ कांदा काढणीचा हंगाम सुरु आहे. मात्र, कोरोनाबाधितांची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, मजूरही शेतीकामाला येण्यास स्पष्ट नकार देत आहेत. कोरोनामुळे शेतमजुरांचाही वानवा निर्माण झाल्याने शेतकरी पुन्हा चिंतेत सापडला आहे. गेल्या चार महिन्यांपासून संगोपन केलेला उन्हाळी कांदा काढणीला आला आहे. उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे कांदा लवकरात लवकर काढणी करून साठवणूक करण्यासाठी शेतकऱ्यांचा आटापिटा सुरू आहे. त्याचप्रमाणे अवकाळी पावसामुळे कांदा ओला होऊन खराब होण्याची भीतीही शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे लवकरात लवकर कांदा काढून साठविण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रयत्न सुरू आहे. परंतु, ग्रामीण भागातही कोरोनाचा फैलाव झाला असून, कळवण, मालेगाव, सटाणा, देवळा, चांदवड, निफाड, दिंडोरी आणि सिन्नर तालुक्यांमध्ये रुग्णवाढीचा उद्रेक सुरु आहे. त्यामुळे मजूरही शेतीकामाला येण्यास नकार देत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.

कोट-१

दरवर्षी उन्हाळ कांद्याच्या हंगामात कसमादे परिसरात मोठ्या प्रमाणात कोकणी मजूर कांदा काढणीसाठी दाखल होतात. त्यामुळे शेतकऱ्यांची शेतीकामे वेळीच पूर्ण होतात. पण कोरोनाच्या महामारीमुळे मजूरही धास्तावले आहेत. त्यात कोकणीसह इतर परप्रांतीय मजूर दाखल न झाल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

- साहेबराव निकम, शेतकरी

कोट-२

उन्हाळ कांदा लागवडीपासून पिकाला ग्रहणच लागले की काय? अशी स्थिती आहे. लागवडीपूर्वी बियाणांचा, रोपांचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यानंतर अवकाळी पावसामुळे कांद्याच्या रोपांचेही नुकसान झालेय. पुन्हा हिंमत न हरता शेतकऱ्यांनी महागडी बियाणे आणून कांदा लागवड केली. यात काही ठिकाणी बोगस बियाणांचा फटका बसला तर काही ठिकाणी परतीच्या पावसाने व गेल्या महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे कांदा उत्पादकांवर मोठे संकट कोसळले होते. लागवडीचा खर्चही निघणे कठीण झाले असताना आता कोरोनामुळे शेतमजूर मिळत नाहीत. त्यामुळे अडचणीत आणखीनच वाढ झाली आहे.

- शंकरराव खालकर, शेतकरी