शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
2
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
3
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
4
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
5
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
6
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
7
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
8
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
9
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
10
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
11
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
12
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
13
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
14
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
15
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
16
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
17
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
20
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका

वाढत्या संसर्गामुळे मजुरांनी घेतली धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:14 IST

नाशिक : जिल्ह्यातील कळवण, मालेगाव, सटाणा, देवळा, चांदवड, निफाड, दिंडोरी आणि सिन्नर तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कांदा लागवड करण्यात आली ...

नाशिक : जिल्ह्यातील कळवण, मालेगाव, सटाणा, देवळा, चांदवड, निफाड, दिंडोरी आणि सिन्नर तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कांदा लागवड करण्यात आली असून, सध्या उन्हाळ कांदा काढण्याचे काम सुरू आहे. परंतु, मजुरांनी कोरोनाच्या संसर्गाची धास्ती घेतली असून, शेतीच्या कामासाठी मजूरच मिळत नसल्याने शेतीची कामे रेंगाळल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे.

कसमादे पट्ट्यासह लगतच्या तालुक्यांमध्ये सध्या उन्हाळ कांदा काढणीचा हंगाम सुरु आहे. मात्र, कोरोनाबाधितांची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, मजूरही शेतीकामाला येण्यास स्पष्ट नकार देत आहेत. कोरोनामुळे शेतमजुरांचाही वानवा निर्माण झाल्याने शेतकरी पुन्हा चिंतेत सापडला आहे. गेल्या चार महिन्यांपासून संगोपन केलेला उन्हाळी कांदा काढणीला आला आहे. उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे कांदा लवकरात लवकर काढणी करून साठवणूक करण्यासाठी शेतकऱ्यांचा आटापिटा सुरू आहे. त्याचप्रमाणे अवकाळी पावसामुळे कांदा ओला होऊन खराब होण्याची भीतीही शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे लवकरात लवकर कांदा काढून साठविण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रयत्न सुरू आहे. परंतु, ग्रामीण भागातही कोरोनाचा फैलाव झाला असून, कळवण, मालेगाव, सटाणा, देवळा, चांदवड, निफाड, दिंडोरी आणि सिन्नर तालुक्यांमध्ये रुग्णवाढीचा उद्रेक सुरु आहे. त्यामुळे मजूरही शेतीकामाला येण्यास नकार देत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.

कोट-१

दरवर्षी उन्हाळ कांद्याच्या हंगामात कसमादे परिसरात मोठ्या प्रमाणात कोकणी मजूर कांदा काढणीसाठी दाखल होतात. त्यामुळे शेतकऱ्यांची शेतीकामे वेळीच पूर्ण होतात. पण कोरोनाच्या महामारीमुळे मजूरही धास्तावले आहेत. त्यात कोकणीसह इतर परप्रांतीय मजूर दाखल न झाल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

- साहेबराव निकम, शेतकरी

कोट-२

उन्हाळ कांदा लागवडीपासून पिकाला ग्रहणच लागले की काय? अशी स्थिती आहे. लागवडीपूर्वी बियाणांचा, रोपांचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यानंतर अवकाळी पावसामुळे कांद्याच्या रोपांचेही नुकसान झालेय. पुन्हा हिंमत न हरता शेतकऱ्यांनी महागडी बियाणे आणून कांदा लागवड केली. यात काही ठिकाणी बोगस बियाणांचा फटका बसला तर काही ठिकाणी परतीच्या पावसाने व गेल्या महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे कांदा उत्पादकांवर मोठे संकट कोसळले होते. लागवडीचा खर्चही निघणे कठीण झाले असताना आता कोरोनामुळे शेतमजूर मिळत नाहीत. त्यामुळे अडचणीत आणखीनच वाढ झाली आहे.

- शंकरराव खालकर, शेतकरी