शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

वाढत्या संसर्गामुळे मजुरांनी घेतली धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:14 IST

नाशिक : जिल्ह्यातील कळवण, मालेगाव, सटाणा, देवळा, चांदवड, निफाड, दिंडोरी आणि सिन्नर तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कांदा लागवड करण्यात आली ...

नाशिक : जिल्ह्यातील कळवण, मालेगाव, सटाणा, देवळा, चांदवड, निफाड, दिंडोरी आणि सिन्नर तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कांदा लागवड करण्यात आली असून, सध्या उन्हाळ कांदा काढण्याचे काम सुरू आहे. परंतु, मजुरांनी कोरोनाच्या संसर्गाची धास्ती घेतली असून, शेतीच्या कामासाठी मजूरच मिळत नसल्याने शेतीची कामे रेंगाळल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे.

कसमादे पट्ट्यासह लगतच्या तालुक्यांमध्ये सध्या उन्हाळ कांदा काढणीचा हंगाम सुरु आहे. मात्र, कोरोनाबाधितांची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, मजूरही शेतीकामाला येण्यास स्पष्ट नकार देत आहेत. कोरोनामुळे शेतमजुरांचाही वानवा निर्माण झाल्याने शेतकरी पुन्हा चिंतेत सापडला आहे. गेल्या चार महिन्यांपासून संगोपन केलेला उन्हाळी कांदा काढणीला आला आहे. उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे कांदा लवकरात लवकर काढणी करून साठवणूक करण्यासाठी शेतकऱ्यांचा आटापिटा सुरू आहे. त्याचप्रमाणे अवकाळी पावसामुळे कांदा ओला होऊन खराब होण्याची भीतीही शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे लवकरात लवकर कांदा काढून साठविण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रयत्न सुरू आहे. परंतु, ग्रामीण भागातही कोरोनाचा फैलाव झाला असून, कळवण, मालेगाव, सटाणा, देवळा, चांदवड, निफाड, दिंडोरी आणि सिन्नर तालुक्यांमध्ये रुग्णवाढीचा उद्रेक सुरु आहे. त्यामुळे मजूरही शेतीकामाला येण्यास नकार देत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.

कोट-१

दरवर्षी उन्हाळ कांद्याच्या हंगामात कसमादे परिसरात मोठ्या प्रमाणात कोकणी मजूर कांदा काढणीसाठी दाखल होतात. त्यामुळे शेतकऱ्यांची शेतीकामे वेळीच पूर्ण होतात. पण कोरोनाच्या महामारीमुळे मजूरही धास्तावले आहेत. त्यात कोकणीसह इतर परप्रांतीय मजूर दाखल न झाल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

- साहेबराव निकम, शेतकरी

कोट-२

उन्हाळ कांदा लागवडीपासून पिकाला ग्रहणच लागले की काय? अशी स्थिती आहे. लागवडीपूर्वी बियाणांचा, रोपांचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यानंतर अवकाळी पावसामुळे कांद्याच्या रोपांचेही नुकसान झालेय. पुन्हा हिंमत न हरता शेतकऱ्यांनी महागडी बियाणे आणून कांदा लागवड केली. यात काही ठिकाणी बोगस बियाणांचा फटका बसला तर काही ठिकाणी परतीच्या पावसाने व गेल्या महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे कांदा उत्पादकांवर मोठे संकट कोसळले होते. लागवडीचा खर्चही निघणे कठीण झाले असताना आता कोरोनामुळे शेतमजूर मिळत नाहीत. त्यामुळे अडचणीत आणखीनच वाढ झाली आहे.

- शंकरराव खालकर, शेतकरी