शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

कार्यकर्त्यांनी स्वबळावर कॉँग्रेसचा झेंडा फडकवावा

By admin | Updated: October 22, 2016 22:58 IST

राजाराम पानगव्हाणे : कॉँग्रेसचा मेळावा, ३५ उमेदवारांच्या मुलाखती; राष्ट्रवादीवर टीकेची झोड

येवला : भाजपाच्या अच्छे दिनचे स्वप्न हवेत विरले तर राष्ट्रवादीने शहर भकास करून शहरवासीयांची निराशा केली. त्यामुळे शहर विकासासाठी आता पालिका निवडणुकीत कॉँग्रेस शिवाय पर्याय नाही, त्यामुळे एकजुटीने कामाला लागा आणि स्वबळावर काँग्रेस पक्षाचा झेंडा पालिकेवर फडकवण्यासाठी परिश्रम घ्या, असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांनी केले. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील स्टेशन रस्त्यावरील एका सभागृहात कॉँग्रेस पक्षाने सभेचे आयोजन केले होते. या सभेत पानगव्हाणे बोलत होते. येथील सभागृहात पालिकेत प्रभागनिहाय इच्छुक असलेल्या उमेदवाराच्या मुलाखती यावेळी घेण्यात आल्या. शहरात रस्त्यांची झालेली दुरवस्था, व्यापाराना विस्थापित करण्याचे राष्ट्रवादीचे धोरण, तर भाजपाने मुंगेरीलाल के हसीन सपने दाखवणारे भाजप यांनी घोर निराशा केली असल्याची टीका पानगव्हाणे यांनी केली. राष्ट्रवादीने सन्मानजनक जागा दिल्या तरच युती करण्याची काँग्रेसची इच्छा असल्याचेही त्यांनी सांगितले. गुणवंत होळकर, विकास चांदर यांना येवला पक्ष निरीक्षक म्हणून नेमणूक केल्याचे पक्षाने यावेळी स्पष्ट केले. व्यासपीठावर तालुकाध्यक्ष अरुण अहेर, शहर अध्यक्ष राजेश भंडारी, सुरेश गोंधळी, समीर देशमुख, बळीराम दादा शिंदे, फारूक शेख, जमीर पीरजादे, फारुकी शेख, जरार पहिलवान, रश्मी पालवे, तेहसीन बानो, उस्मान शेख होते. बैठकीचे प्रास्ताविक नानासाहेब शिंदे यांनी केले. मेळाव्यास प्रनिताराजे शिंदे, राजेंद्र गणोरे, गोरखनाथ खोकले, संजय वाळुंज, अण्णा पवार, विमल अहेर, रुख्साना शेख, सीमा बोडके, नसीर शेख, मंगल परदेशी, नूरा शेख, सविता गणोरे, अनिल गोसावी, मुकेश पाटोदकर, संजय शिंदे, अर्चना शिंदे, सनाउल्ला गाझी, चांगदेव खैरे, रमा लाघवे, राजे आबासाहेब शिंदे, आत्मेश भायभंग, शबाना मन्सुरी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. काँग्रेस पक्षाकडे एकूण ५२ उमेदवारांनी उमेदवारी मागितली. यापैकी ३५ उमेदवारांनी नाशिक येथे मुलाखती दिल्या. (वार्ताहर)