शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

कामगार, शेतकरी आर्थिक विषमतेत भरडतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:16 IST

नाशिक : या देशात आर्थिक विषमता वाढत असून कामगार, शेतकरी त्यात भरडला जातोय. म्हणून समन्यायी समाज निर्माण व्हावा, असा ...

नाशिक : या देशात आर्थिक विषमता वाढत असून कामगार, शेतकरी त्यात भरडला जातोय. म्हणून समन्यायी समाज निर्माण व्हावा, असा आशावाद कामगार नेते डॉ. डी. एल. कराड यांनी व्यक्त केला.

नाशिकच्या कामगार क्षेत्रात सिटूच्या माध्यमातून कार्यरत असलेले डॉ. कराड डिजिटल वसंत व्याख्यानमालेत बोलत होते. लक्ष्मणराव तांबे स्मृती व्याख्यानात डॉ. कराड यांनी सतरावे पुष्प 'कामगार-नोकरदारांपुढील आव्हाने' या विषयावर गुंफले.

एकेकाळी कामगार चळवळीतील नेतृत्वाला समाजमान्यता होती. पण दोन दशकांपासून ही भावना बदलून गेली. मालकाच्या दडपशाहीखाली असलेल्या कामगारांच्या हक्कासाठी संघर्षाची भूमिका घ्यावी लागल्याचे मत डॉ. कराड यांनी व्यक्त केले.

यावेळी बोलताना डॉ. कराड म्हणाले, स्वातंत्र्य चळवळीत शेतकरी, कामगार आघाडीवर होता, पण सामाजिक, आर्थिक आणि मानसिक गुलामगिरी होती. ब्रिटिश आणि पोर्तुगीजांनी प्रागतिक विचार आणल्याने मूल्ये बदलत गेली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी व्हॉईसरॉयचे सरकार आणि स्वतंत्र भारत सरकारच्या काळात मंत्री म्हणून १४ महत्त्वाचे कायदे निर्माण केले, मात्र विद्यमान सरकारने जुने कायदे रद्द करून श्रमसंहिता कायदे करून कामगार हा घटकच नष्ट केल्याची खंत डॉ. कराड यांनी व्यक्त केली.

शेतकरी आणि कामगार कायदे रद्द होत असताना विरोधकही कोषात राहिले, हे लोकशाहीचे दुभंगलेपण असून, त्याची मोठी किंमत सामान्य जनतेला द्यावी लागणार असल्याचे डॉ. कराड म्हणाले. उद्योग बंद पाडणारे लोक म्हणून टीकाही झाली, पण या संघर्षात प्रतिकार करण्याची भूमिका घेतली, म्हणून गुणवत्तापूर्ण कामगामरांची पिढी घडवू शकलो, अशा शब्दात त्यांनी चळवळीतील प्रवासाचे सिंहावलोकन केले.

यावेळी प्रसन्न तांबे, मालेच्या सहसचिव उषा तांबे उपस्थित होते. मालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक केले, तर चिटणीस संगीता बाफना यांनी आभार मानले.