शहरं
Join us  
Trending Stories
1
"मोदींच्या नेतृत्वाखाली २०२९ निवडणूक लढवावी लागणे ही भाजपची मजबुरी"; भाजप खासदाराचे विधान
2
मोहम्मद शमीची एक्स पत्नी हसीन जहां आणि मुलीवर हत्येच्या प्रयत्नाचा आरोप, गुन्हा दाखल; भांडणाचा व्हिडिओ व्हायरल
3
Narendra Modi : "बिहारला लुटलं, बदला घेतला..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेस-राजदवर जोरदार हल्लाबोल
4
गुहेत सापडलेल्या रशियन महिलेबाबत मोठी माहिती आली समोर; इस्त्रायलच्या पार्टनरने केली वेगळीच मागणी
5
मित्र-नातेवाईकांसाठी 'जामीनदार' बनताय? 'ही' काळजी घेतली नाही तर बँक दारातही उभं करणार नाही
6
मोठी बातमी! सांगलीतील 'इस्लामपूर' शहराचे नाव बदलणार; भुजबळांची विधानसभेत घोषणा
7
स्टायलिश लूकसह जबरदस्त फीचर्स! टीव्हीएसची स्पोर्ट्स बाईक अपाचे आरटीआर ३१० भारतात लॉन्च
8
सीईओंना कोट्यवधी रुपयाचं पॅकेज तर इंटर्नला ५०० रुपयांचं ॲमेझॉन व्हाउचर! तरुणाच्या पोस्टने खळबळ
9
हे कसले डॉक्टर? जीवाशी खेळ; सर्दीच्या रुग्णांना कॅन्सरची आणि गर्भवती महिलांना वंध्यत्वाची औषधं
10
Viral Video : दुकानदाराच्या डोळ्यांदेखत चोराने मोबाईल उचलून नेला अन् कुणाला कळलंही नाही! व्हिडीओ बघाच 
11
जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल, मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला गुन्हा
12
१,२,३...२४ तासांत तीन मिसाईल टेस्ट! भारताची ऑपरेशन सिंदूरनंतर मोठी कामगिरी, लडाखमध्ये एक...
13
विश्वासघातकी चीन! भारताचं करायचंय २.७५ लाख कोटींचं नुकसान; ड्रॅगनची एक चाल, सरकार काय करणार?
14
Video: आव्हाड-दानवे बोलत होते, रिपोर्टर रेकॉर्डिंग करत होता... आव्हाडांना राग आला... हात उचलला! बघा, काय घडलं!
15
Rohit Pawar: "आवाज खाली करा, बोलता येत नसेल तर..."; रोहित पवारांनी पोलीस अधिकाऱ्याला झापलं!
16
विधानभवनातील वाद अन् गोपीचंद पडळकरांचं गाणं चर्चेत; तुम्ही पाहिलं का?
17
तिसऱ्या लग्नाचा हव्यास, पत्नीनं बॉयफ्रेंडला बोलवून घेतलं अन् कांड झालं! लग्नमंडपाऐवजी गेली तुरुंगात; असं काय केलं?
18
'लॅन्ड फॉर जॉब' घोटाळ्यात लालू यादव यांना मोठा धक्का! पण 'या' प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
19
हिंदू रक्षा दलाचे कार्यकर्ते केएफसीमध्ये घुसले, रेस्टॉरंटला ठोकले टाळे; म्हणाले, "श्रावणामध्ये नॉन व्हेज..."
20
सात तरुण, २३ मोबाईल, दुबईहून सुरू होता भयंकर खेळ, पाहून पोलिसही अवाक्

श्रमदानातून केले तळवाडे भामेर कालव्याचे काम

By admin | Updated: February 20, 2017 23:16 IST

पाणीटंचाई : वीस वर्षांपासून सुरू आहे पोहोच कालव्याचे काम

जायखेडा : बागलाण तालुक्यातील पिंपळकोठे व परिसरातील गावांना संभाव्य पाणीटंचाईची चाहूल लागू लागली असून, फेब्रुवारीनंतर सिंचनासाठी व पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागणार असून, ही बाब लक्षात घेऊन हरणबारी धरणाच्या डावा कालवा ते काठगड बंधारा व तळवाडे भामेर पोहोच कालव्याद्वारे तुंगाडी नदीपर्यंत पाणी सोडून दिलासा देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. संबंधित विभाग तांत्रिक कारण देत दुर्लक्ष करीत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या भागातील विहिरींची पाणी पातळी खालावल्याने आत्तापासूनच पिकांना पाणी देणे अवघड झाले आहे. या कालव्याद्वारे पाणी सोडल्यास विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊन सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. अन्यथा पाण्याअभावी उभी पिकं सोडून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणार आहे. यासाठी तातडीने पाणी सोडण्याची मागणी होत आहे.वीस वर्षांपूर्वी प्रशासकीय मान्यता मिळालेल्या तळवाडे भामेर पोहोच कालव्याचे काम कासव गतीने सुरू आहे. या कालव्यामुळे जवळपास दहा हजार हेक्टरहून अधिक शेतजमीन ओलिताखाली येण्याची अपेक्षा आहे. मात्र शेतकरी केवळ प्रतीक्षा करीत आहेत.  कालव्याचे १ ते १० किलोमीटरचे काम या आधीच पूर्ण झाले आहे. मात्र दरम्यान काही शेतकऱ्यांनी कालव्याच्या कामास विरोध केल्याने काम बरीच वर्ष बंद होते. दरम्यान, कालव्याच्या सेवा तसेच निरीक्षण पथावरील भराव शेतकऱ्यांनी नांगरून टाकल्याने व भरावाची उंची संकलित उंचीपेक्षा कमी झाल्याने पाणी सोडल्यास हे पाणी भरावाच्या वरून जाऊन आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होऊ शकते. यामुळे कालव्याच्या ४ ते ५ किलोमीटर दरम्यानचा भराव केल्याशिवाय पाणी सोडणे शक्य नसल्याचे कारण पाटबंधारे विभागाकडून देण्यात येत होते. भरावाचे काम पूर्ण करून पाणी सोडावे यासाठी शेतकऱ्यांनी अनेक दिवस सर्वस्थरावर प्रयत्न केले मात्र त्यास यश आले नाही.  अखेर शासनाची वाट न पाहता पिंपळकोठे, भडाणे, तांदूळवाडी व लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी लोकवर्गणी, श्रमदानाने द्वारकधीश साखर कारखान्याच्या मदतीने भराव करून या कालव्याची दुरुस्ती करून घेतली आहे. आता हरणबारी धरण ते कठगड बंधारा व पुढे तुंगाडी नदीपर्यंत पाणी साडावे, अशी मागणी करण्यात येत आहे.(वार्ताहर)