शहरं
Join us  
Trending Stories
1
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
2
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
3
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
4
जरांगेंचा होकार, पण जर जीआरमध्ये काही दगा फटका झाला तर...; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा
5
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, १ तासांत सर्व GR काढा, मग अंतिम निर्णय सांगतो: मनोज जरांगे पाटील
6
रात्री ९ वाजेपर्यंत मुंबई खाली करतो, मराठ्यांची पोरं नाचत जातील, पण...; मनोज जरांगेंचा विखेंना शब्द
7
श्रीसंतची दुखापत अन् RR फ्रँचायझीचा ८२ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा! विमा कंपनीची सर्वोच्च न्यायालयात धाव
8
Manoj Jarange: मनोज जरांगे आजच उपोषण सोडणार? हैदराबाद गॅझेटचा जीआर निघणार, सातारा गॅझेटीयरची जबाबदारी शिवेंद्रराजेंनी घेतली...
9
Pitru Paksha 2025: गणेशोत्सवानंतर लगेचच पितृपक्ष का? ९० टक्के लोकांना माहीतच नाही खरे कारण!
10
"कुठलाही विषय असू दे, मी नेहमी धावून जातो, पण...!" जरांगेंच्या आंदोलनावर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया; स्पष्टच बोलले
11
मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी! अंतिम मसुदा घेऊन सरकारचे ४ मंत्री मनोज जरांगेंच्या भेटीला
12
Viral Video : गर्लफ्रेंडचा फोन सतत लागत होता व्यस्त, संतापलेल्या बॉयफ्रेंडनं काय केलं बघाच!
13
Maratha Protest: मनोज जरांगे यांच्या पत्नी आणि मुलांचाही अन्नत्याग; मुलगी म्हणाली...
14
८ वर्षांपूर्वी गायब झालेला 'रीलस्टार' पती, सतत शोध घेत होती पत्नी! आता समोर आलं धक्कादायक सत्य
15
शेअर बाजारापेक्षा जास्त परतावा देणारी सरकारी योजना; EPF का ठरत आहे सरस? संपूर्ण गणित समजून घ्या
16
Video: आझाद मैदान परिसरात तणावाची स्थिती, आंदोलकांनी वाट अडवली; पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवली
17
Anant Chaturdashi 2025: अनंत चतुर्दशीला का बांधला जातो अनंताचा धागा? हे व्रत गणेशाचे नाही तर... 
18
नाशिकच्या राहुल धोत्रे हत्या प्रकरणातील फरार दोघांना बेड्या, पोलीस माजी नगरसेवक निमसेच्या मागावर
19
भाक्रा धरणापासून एअरबेसपर्यंत पाकिस्तानला दिली माहिती; प्रसिद्ध युटयूबर विरोधात आरोपपत्र दाखल
20
"पूर नव्हे, हा तर देवाचा आशीर्वाद"; पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी जनतेला दिला अजब सल्ला! म्हणाले...

श्रमदानातून केले तळवाडे भामेर कालव्याचे काम

By admin | Updated: February 20, 2017 23:16 IST

पाणीटंचाई : वीस वर्षांपासून सुरू आहे पोहोच कालव्याचे काम

जायखेडा : बागलाण तालुक्यातील पिंपळकोठे व परिसरातील गावांना संभाव्य पाणीटंचाईची चाहूल लागू लागली असून, फेब्रुवारीनंतर सिंचनासाठी व पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागणार असून, ही बाब लक्षात घेऊन हरणबारी धरणाच्या डावा कालवा ते काठगड बंधारा व तळवाडे भामेर पोहोच कालव्याद्वारे तुंगाडी नदीपर्यंत पाणी सोडून दिलासा देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. संबंधित विभाग तांत्रिक कारण देत दुर्लक्ष करीत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या भागातील विहिरींची पाणी पातळी खालावल्याने आत्तापासूनच पिकांना पाणी देणे अवघड झाले आहे. या कालव्याद्वारे पाणी सोडल्यास विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊन सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. अन्यथा पाण्याअभावी उभी पिकं सोडून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणार आहे. यासाठी तातडीने पाणी सोडण्याची मागणी होत आहे.वीस वर्षांपूर्वी प्रशासकीय मान्यता मिळालेल्या तळवाडे भामेर पोहोच कालव्याचे काम कासव गतीने सुरू आहे. या कालव्यामुळे जवळपास दहा हजार हेक्टरहून अधिक शेतजमीन ओलिताखाली येण्याची अपेक्षा आहे. मात्र शेतकरी केवळ प्रतीक्षा करीत आहेत.  कालव्याचे १ ते १० किलोमीटरचे काम या आधीच पूर्ण झाले आहे. मात्र दरम्यान काही शेतकऱ्यांनी कालव्याच्या कामास विरोध केल्याने काम बरीच वर्ष बंद होते. दरम्यान, कालव्याच्या सेवा तसेच निरीक्षण पथावरील भराव शेतकऱ्यांनी नांगरून टाकल्याने व भरावाची उंची संकलित उंचीपेक्षा कमी झाल्याने पाणी सोडल्यास हे पाणी भरावाच्या वरून जाऊन आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होऊ शकते. यामुळे कालव्याच्या ४ ते ५ किलोमीटर दरम्यानचा भराव केल्याशिवाय पाणी सोडणे शक्य नसल्याचे कारण पाटबंधारे विभागाकडून देण्यात येत होते. भरावाचे काम पूर्ण करून पाणी सोडावे यासाठी शेतकऱ्यांनी अनेक दिवस सर्वस्थरावर प्रयत्न केले मात्र त्यास यश आले नाही.  अखेर शासनाची वाट न पाहता पिंपळकोठे, भडाणे, तांदूळवाडी व लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी लोकवर्गणी, श्रमदानाने द्वारकधीश साखर कारखान्याच्या मदतीने भराव करून या कालव्याची दुरुस्ती करून घेतली आहे. आता हरणबारी धरण ते कठगड बंधारा व पुढे तुंगाडी नदीपर्यंत पाणी साडावे, अशी मागणी करण्यात येत आहे.(वार्ताहर)