शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

निळवंडी पाडे पुलाचे काम अजूनही अपुर्णं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 15:59 IST

वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील निळवंडी येथील पुलाचे काम गेल्या दोन ते तीन वर्षांपासून चालू असून अजूनही या पुलाचे काम ...

ठळक मुद्देठेकेदार बदलून सुद्धा निळवंडी पुलाचे काम कासवगतीनेनागरिकांच्या तक्र ारीला केराची टोपली वाढत्या खड्यांमुळे प्रवासी हैराण

वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील निळवंडी येथील पुलाचे काम गेल्या दोन ते तीन वर्षांपासून चालू असून अजूनही या पुलाचे काम होत नसल्याने निळवंडी व परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.निळवंडी ते पाडे या रस्त्यावर असलेला पुलाचे काम अजूनही अपुर्णं असून, दोन वर्षात दोन ते तीन कंत्राटदार बदलेले तरी पण पुलाची अवस्था आहे तशीच आहे.बांधकाम विभाग,याकडे दुर्लक्ष करत आहे. याच नवीन पुलाच्या शेजारी असणारा जुना पूल अर्धा तोडला असून नागरिकांना त्या पुलावरून आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.दळणवळणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असणारा हा पूल आहे.मात्र या पुलाचे काम रखडले आहे.त्यामुळे संभिधत खात्याने त्याची दखल घेऊन ठेकेदार सुद्धा बदलून टाकला मात्र अजूनही हे काम पूर्ण होत नसल्याने या पुलाचे काम कधी होणार?असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.सध्या जुना पूल अर्ध्याबाजूने तोडला असून जवळपासच्या गावांचा सम्पर्क तुटला असून ,नागरिकांची कोंडी झाली असून काही अंतर कापून दिंडोरी बाजारपेठेत नागरिकांना यावे लागते आहे.जुना पूल अर्धा तोडल्यामुळे ननाशी,निगडोळ, वणी खुर्द,नळवाडपाडा,येथील नागरिक वळखेडहुन दिंडोरीकडे यावे लागत आहे.त्यामुळे जवळपास १० ते १२ कि. मी.चा अंतर लांब पडत आहे.त्यामुळे शेतीमाल लवकर बाजारपेठेत पोहचत नसल्याने त्यांचाही फटका शेतकर्यांना बसतो.जर तीन वर्ष्या पूर्वीच ठेकेदाराणे या पुलाचे काम केले असते तर, आता ही वेळ नागरिकांवर आली नसती.तसेच निळवंडी पाडे रस्त्याचीही अतिशय दुरवस्था झाल्याने निळवंडी परिसर हा लोक प्रतिनिधींनी वाळीतच टाकल की काय? असा प्रश्न सर्व सामान्य जनतेला पडला आहे.निळवंडी परिसर हा विविध विकासकामांपासून वंचीत राहिला आहे या रस्त्यावर मोठेमोठे खड्डे पडले त्यामुळे वाहनचालकांना वाहांचालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.त्यामुळे या पुलाचे काम व निळवंडी -पाडे रस्त्याचे काम लवकरात लवकर करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. पश्चिम भागातील रस्त्यांची अतिशय बिकट अवस्था झाली असुन त्विरत दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी वाहनधारकांकडून केली जात आहे .दिंडोरी ,निळवंडी,पाडे निगडोळ ,हा अति रहदारीचा रस्ता असतानां देखिल अधिकारी ,पदाधिकारी यांच्या दुर्लक्षामुळे या रस्त्यांवर खड्यांचे साम्राज्य वाढल्याने हे रस्ते म्हणुन असुन घात अण नसुन संताप असे ठरू लागले आहेत .दिंडोरी तालुक्यातील पश्चिम पट्यातील सर्वच रस्त्यांची चाळण झाली आहे .नुसती चाळणच नाही तर रस्त्यांची महाचाळण म्हटले तर वावगे ठरू नये या रस्त्यांच्या दुरूस्तीबाबत अनेक वेळा आवाज उठवून देखील त्याबाबत कार्यवाही होत नसल्याने आता जनतेचे गाºहाणे मांडावी तरी कुणाकडे पुढारी मुका आणी अधिकारी बिहरा , अशा परिस्थितीमुळे ग्रामस्थांचे हाल होत आहे.(१७निलवंडी आणि १७ निलवंडी १)