शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

नांदगाव नगर परिषदेचे कामकाज बेशिस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 00:17 IST

येथील नगर परिषदेच्या कामकाजात आलेल्या बेशिस्तीला अजूनही लगाम लावण्यात आलेला नाही, अशी तक्रार नगराध्यक्ष राजेश कवडे यांनी उपजिल्हाधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांच्याकडे केली आहे. नगराध्यक्षांनी भ्रमणध्वनीवरून संपर्कसाधला असता मंगरुळे यांनी कारवाई (दुसऱ्यांदा) करण्याचे आश्वासन दिले.

नांदगाव : येथील नगर परिषदेच्या कामकाजात आलेल्या बेशिस्तीला अजूनही लगाम लावण्यात आलेला नाही, अशी तक्रार नगराध्यक्ष राजेश कवडे यांनी उपजिल्हाधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांच्याकडे केली आहे. नगराध्यक्षांनी भ्रमणध्वनीवरून संपर्कसाधला असता मंगरुळे यांनी कारवाई (दुसऱ्यांदा) करण्याचे आश्वासन दिले.  बहुसंख्य कर्मचारी कार्यालयीन वेळेत कार्यालयात उपस्थित झाले नव्हते, याकडे नगराध्यक्षांनी उपजिल्हाधिकायांचे लक्ष वेधले. प्रशासनातील अपूर्ण कर्मचारी वर्ग, बेशिस्त व दैनंदिन कामांसह विविध विकासकामांची परवड या विषयांचे गाºहाणे घेऊन नगराध्यक्ष राजेश कवडे यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने दि. १६ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांची भेट घेतली होती. जिल्हाधिकाºयांनी त्यावेळी दिलेल्या आश्वासनांची अजूनही पूर्तता झालेली नाही. त्यावेळी जिल्हाधिकाºयांनी येवला-मनमाड येथील अभियंता यांना अतिरिक्त पदभार देणे, दररोजच्या हजेरीसाठी बायोमेट्रिक यंत्रणा कार्यान्वित करणे तसेच वेळेवर न येणाºयांसाठी अधिकारी नगर परिषदेच्या कार्यालयात अचानक पाठवून तपासणी करावी, अशा सूचना उपजिल्हाधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांना दिल्या  होत्या; मात्र अद्याप अंमलबजावणी झालेली नाही.११ पदे रिक्त, १८० ठरावांची फाईलनांदगाव नगर परिषदेत लेखापाल (२), स्थापत्य अभियंता (२) व संगणक अभियंता (१), पाणीपुरवठा अभियंता (१), सहा. कर निरीक्षक (१), सहा. मिळकत व्यवस्थापक (१), सहा. खरेदी पर्यवेक्षक (१), अग्निशमन पर्यवेक्षक (१), सहा. नगररचनाकार (१) ही महत्त्वाची पदे रिक्त आहेत. १२ पैकी ११ पदे रिक्त आहेत. प्रशासनाने कार्यवाही न केलेल्या १८० ठरावांच्या प्रतींची मोठी फाईल जिल्हाधिकारी यांना देऊन नगरसेवकांनी याकडे लक्ष वेधले होते. प्रकरणाची गंभीर दखल घेऊन उपरोल्लिखित मुद्द्यावर त्वरित कारवाईचे निर्देश जिल्हाधिकाºयांनी दिले होते. परंतु नगर परिषदेत आजही ‘जैसे थे’च परिस्थिती आहे.सहा दिवसाआड पाणीपुरवठावाढत्या तपमानामुळे पाण्याची अधिक गरज असताना सहा दिवसाआड पाण्याचा पुरवठा होत असलेले पाण्याचे आवर्तन दहा ते पंधरा दिवसांपर्यंत लांबणीवर पडत आहे. शहरातील दुकानदारांची व वाहनांची अतिक्र मणे पायी चालणाºयांसाठी अडथळा ठरत आहेत. नगरपालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. ग्रामविकास राज्यमंत्री दादाभाऊ भुसे यांनी या प्रकरणी दिलेले निर्देश कुचकामी ठरले आहेत. पालिका निवडणुकीत भुसे यांनी नवीन पाणीपुरवठा योजना देण्याची घोषणा केली होती ती जणू हवेतच विरली असल्याची भावना नागरिकांमधून उमटत आहे.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय