शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नांदगाव नगर परिषदेचे कामकाज बेशिस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 00:17 IST

येथील नगर परिषदेच्या कामकाजात आलेल्या बेशिस्तीला अजूनही लगाम लावण्यात आलेला नाही, अशी तक्रार नगराध्यक्ष राजेश कवडे यांनी उपजिल्हाधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांच्याकडे केली आहे. नगराध्यक्षांनी भ्रमणध्वनीवरून संपर्कसाधला असता मंगरुळे यांनी कारवाई (दुसऱ्यांदा) करण्याचे आश्वासन दिले.

नांदगाव : येथील नगर परिषदेच्या कामकाजात आलेल्या बेशिस्तीला अजूनही लगाम लावण्यात आलेला नाही, अशी तक्रार नगराध्यक्ष राजेश कवडे यांनी उपजिल्हाधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांच्याकडे केली आहे. नगराध्यक्षांनी भ्रमणध्वनीवरून संपर्कसाधला असता मंगरुळे यांनी कारवाई (दुसऱ्यांदा) करण्याचे आश्वासन दिले.  बहुसंख्य कर्मचारी कार्यालयीन वेळेत कार्यालयात उपस्थित झाले नव्हते, याकडे नगराध्यक्षांनी उपजिल्हाधिकायांचे लक्ष वेधले. प्रशासनातील अपूर्ण कर्मचारी वर्ग, बेशिस्त व दैनंदिन कामांसह विविध विकासकामांची परवड या विषयांचे गाºहाणे घेऊन नगराध्यक्ष राजेश कवडे यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने दि. १६ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांची भेट घेतली होती. जिल्हाधिकाºयांनी त्यावेळी दिलेल्या आश्वासनांची अजूनही पूर्तता झालेली नाही. त्यावेळी जिल्हाधिकाºयांनी येवला-मनमाड येथील अभियंता यांना अतिरिक्त पदभार देणे, दररोजच्या हजेरीसाठी बायोमेट्रिक यंत्रणा कार्यान्वित करणे तसेच वेळेवर न येणाºयांसाठी अधिकारी नगर परिषदेच्या कार्यालयात अचानक पाठवून तपासणी करावी, अशा सूचना उपजिल्हाधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांना दिल्या  होत्या; मात्र अद्याप अंमलबजावणी झालेली नाही.११ पदे रिक्त, १८० ठरावांची फाईलनांदगाव नगर परिषदेत लेखापाल (२), स्थापत्य अभियंता (२) व संगणक अभियंता (१), पाणीपुरवठा अभियंता (१), सहा. कर निरीक्षक (१), सहा. मिळकत व्यवस्थापक (१), सहा. खरेदी पर्यवेक्षक (१), अग्निशमन पर्यवेक्षक (१), सहा. नगररचनाकार (१) ही महत्त्वाची पदे रिक्त आहेत. १२ पैकी ११ पदे रिक्त आहेत. प्रशासनाने कार्यवाही न केलेल्या १८० ठरावांच्या प्रतींची मोठी फाईल जिल्हाधिकारी यांना देऊन नगरसेवकांनी याकडे लक्ष वेधले होते. प्रकरणाची गंभीर दखल घेऊन उपरोल्लिखित मुद्द्यावर त्वरित कारवाईचे निर्देश जिल्हाधिकाºयांनी दिले होते. परंतु नगर परिषदेत आजही ‘जैसे थे’च परिस्थिती आहे.सहा दिवसाआड पाणीपुरवठावाढत्या तपमानामुळे पाण्याची अधिक गरज असताना सहा दिवसाआड पाण्याचा पुरवठा होत असलेले पाण्याचे आवर्तन दहा ते पंधरा दिवसांपर्यंत लांबणीवर पडत आहे. शहरातील दुकानदारांची व वाहनांची अतिक्र मणे पायी चालणाºयांसाठी अडथळा ठरत आहेत. नगरपालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. ग्रामविकास राज्यमंत्री दादाभाऊ भुसे यांनी या प्रकरणी दिलेले निर्देश कुचकामी ठरले आहेत. पालिका निवडणुकीत भुसे यांनी नवीन पाणीपुरवठा योजना देण्याची घोषणा केली होती ती जणू हवेतच विरली असल्याची भावना नागरिकांमधून उमटत आहे.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय