शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

संपामुळे कामकाज ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 01:26 IST

महसूल कर्मचाºयांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारपासून सुरू झालेल्या बेमुदत संपाच्या पहिल्याच दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासह पंधराही तालुुक्यांतील तहसील कार्यालयाचे कामकाज पूर्णत: ठप्प झाले. या संपात कार्यालयीन शिपाईदेखील सहभागी झाल्याने सकाळी अधिकाºयांनाच कुलूप उघडून साफसफाई करावी लागली, तर शासकीय कामासाठी आलेल्या अभ्यागतांना रिकाम्या हाताने परतावे लागले आहे.

नाशिक : महसूल कर्मचाºयांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारपासून सुरू झालेल्या बेमुदत संपाच्या पहिल्याच दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासह पंधराही तालुुक्यांतील तहसील कार्यालयाचे कामकाज पूर्णत: ठप्प झाले. या संपात कार्यालयीन शिपाईदेखील सहभागी झाल्याने सकाळी अधिकाºयांनाच कुलूप उघडून साफसफाई करावी लागली, तर शासकीय कामासाठी आलेल्या अभ्यागतांना रिकाम्या हाताने परतावे लागले आहे.दरम्यान, कर्मचाºयांनी संपावर जातांनाच सकाळी कार्यालयात हजेरी लावून यंत्रावर थम्ब केल्याने नियमानुसार ते कामावर असल्याचे चित्र निर्माण करण्यात ते यशस्वी झाले. या संपाची शासनाला यापूर्वीच कल्पना देण्यात आलेली असल्याने सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर्मचाºयांनी जोरदार निदर्शने केले. महसूल कर्मचारी संघटनेच्या अनेक मागण्या शासनाकडे प्रलंबित असून, त्यात महत्त्वाचे म्हणजे अन्न व नागरी पुरवठा विभागाने अलीकडेच पुरवठा निरीक्षकांची पदे सरळसेवेने भरण्याचा निर्णय घेतला आहे. तसे झाल्यास अव्वल कारकुनांवर अन्याय होणार असल्याने ही भरती स्थगित करावी ही प्रमुख मागणी संपकरी कर्मचाºयांची असून, त्यापाठोपाठ महसूल कर्मचाºयांचा महसूल सहायक म्हणून नेमणूक देण्यात यावी, नायब तहसीलदारांच्या वेतनातील तफावत दूर करावी, सातवा वेतन आयोग लागू करावा, पाच दिवसांचा आठवडा करावा आदी मागण्यांसाठी दि. ३ आॅक्टोबरपासूनच महसूल कर्मचाºयांनी पुरवठा खात्याच्या कामकाजावर बहिष्कार टाकून आंदोलन छेडले आहे. तरीही शासनाने दखल न घेतल्याने अखेर मंगळवारपासून जिल्ह्यातील ८३४ कर्मचारी बेमुदत संपावर रवाना झाले. सकाळी पावणे दहा वाजता या कर्मचाºयांनी कार्यालयात नियमित हजेरी लावत रजिष्टरवर उपस्थितीची स्वाक्षरी केली. त्यानंतर यंत्रावर थम्ब करून हजर असल्याची नोंद घेतली व कामकाज बंद केले. त्यानंतर सर्वांनी एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर जोरदार निदर्शने केली. सकाळी कार्यालयात आलेल्या अधिकाºयांना त्यांचे स्वत:चे दालन उघडावे लागले. त्यानंतर स्वत:च्या हातानेच कामकाज करावे लागले. दरम्यान, या संपाची कल्पना नसल्याने शासकीय कामकाजासाठी जिल्हाभरातून आलेल्या अभ्यागतांना आल्या पावलीच माघारी फिरावे लागले.