शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

संपामुळे कामकाज ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 01:26 IST

महसूल कर्मचाºयांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारपासून सुरू झालेल्या बेमुदत संपाच्या पहिल्याच दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासह पंधराही तालुुक्यांतील तहसील कार्यालयाचे कामकाज पूर्णत: ठप्प झाले. या संपात कार्यालयीन शिपाईदेखील सहभागी झाल्याने सकाळी अधिकाºयांनाच कुलूप उघडून साफसफाई करावी लागली, तर शासकीय कामासाठी आलेल्या अभ्यागतांना रिकाम्या हाताने परतावे लागले आहे.

नाशिक : महसूल कर्मचाºयांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारपासून सुरू झालेल्या बेमुदत संपाच्या पहिल्याच दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासह पंधराही तालुुक्यांतील तहसील कार्यालयाचे कामकाज पूर्णत: ठप्प झाले. या संपात कार्यालयीन शिपाईदेखील सहभागी झाल्याने सकाळी अधिकाºयांनाच कुलूप उघडून साफसफाई करावी लागली, तर शासकीय कामासाठी आलेल्या अभ्यागतांना रिकाम्या हाताने परतावे लागले आहे.दरम्यान, कर्मचाºयांनी संपावर जातांनाच सकाळी कार्यालयात हजेरी लावून यंत्रावर थम्ब केल्याने नियमानुसार ते कामावर असल्याचे चित्र निर्माण करण्यात ते यशस्वी झाले. या संपाची शासनाला यापूर्वीच कल्पना देण्यात आलेली असल्याने सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर्मचाºयांनी जोरदार निदर्शने केले. महसूल कर्मचारी संघटनेच्या अनेक मागण्या शासनाकडे प्रलंबित असून, त्यात महत्त्वाचे म्हणजे अन्न व नागरी पुरवठा विभागाने अलीकडेच पुरवठा निरीक्षकांची पदे सरळसेवेने भरण्याचा निर्णय घेतला आहे. तसे झाल्यास अव्वल कारकुनांवर अन्याय होणार असल्याने ही भरती स्थगित करावी ही प्रमुख मागणी संपकरी कर्मचाºयांची असून, त्यापाठोपाठ महसूल कर्मचाºयांचा महसूल सहायक म्हणून नेमणूक देण्यात यावी, नायब तहसीलदारांच्या वेतनातील तफावत दूर करावी, सातवा वेतन आयोग लागू करावा, पाच दिवसांचा आठवडा करावा आदी मागण्यांसाठी दि. ३ आॅक्टोबरपासूनच महसूल कर्मचाºयांनी पुरवठा खात्याच्या कामकाजावर बहिष्कार टाकून आंदोलन छेडले आहे. तरीही शासनाने दखल न घेतल्याने अखेर मंगळवारपासून जिल्ह्यातील ८३४ कर्मचारी बेमुदत संपावर रवाना झाले. सकाळी पावणे दहा वाजता या कर्मचाºयांनी कार्यालयात नियमित हजेरी लावत रजिष्टरवर उपस्थितीची स्वाक्षरी केली. त्यानंतर यंत्रावर थम्ब करून हजर असल्याची नोंद घेतली व कामकाज बंद केले. त्यानंतर सर्वांनी एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर जोरदार निदर्शने केली. सकाळी कार्यालयात आलेल्या अधिकाºयांना त्यांचे स्वत:चे दालन उघडावे लागले. त्यानंतर स्वत:च्या हातानेच कामकाज करावे लागले. दरम्यान, या संपाची कल्पना नसल्याने शासकीय कामकाजासाठी जिल्हाभरातून आलेल्या अभ्यागतांना आल्या पावलीच माघारी फिरावे लागले.