शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
2
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
3
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
4
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
5
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
6
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
7
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
8
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
9
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
10
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
11
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
12
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
13
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
14
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
15
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
16
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!
17
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
18
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
19
संपादकीय : नामुष्कीचा बॉम्ब, १९ वर्षांनंतरही पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह
20
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर

शेतकऱ्यांच्या आडून राजकीय पोळी भाजण्याचे काम : गिरीश महाजन

By admin | Updated: June 4, 2017 02:12 IST

काही राजकीय पक्षाचे पुढारी संप सुरूच ठेवून पोळी भाजण्याचे काम करीत असल्याचा आरोप पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किसान क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून शेतकऱ्यांच्या जवळपास सर्वच मागण्या मान्य केल्या आहेत. शेतकरी आंदोलन संपल्याने आपले काय होणार या भावनेनेच काही राजकीय पक्षाचे पुढारी संप सुरूच ठेवून आपली पोळी भाजण्याचे काम करीत असल्याचा आरोप जलसंपदामंत्री तथा जिल्ह्णाचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना केला.शेतकरी संपाची सुरुवात पुणतांबा येथून झाली होती. तेथील किसान क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी सविस्तर चर्चा करून शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. अल्पभूधारक शेतकऱ्यांचे १ आॅक्टोबरपर्यंत कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात तत्काळ कृषी मूल्य आयोगाची स्थापना करण्यात येणार आहे. एका महिन्याच्या आत दुधाचे दर वाढविले जाणार आहेत. तसेच सरकारने ठरवून दिलेल्या हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. जवळपास शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्यानेच शेतकरी संप मागे घेण्यात आल्याची घोषणा केली आहे. नाशिकला मात्र काही राजकीय पुढाऱ्यांनी संपात शेतकरी म्हणून सहभाग घेतला असून, ते आम्हाला संप मागे घेण्याचा निर्णय मान्य नसल्याचे सांगत आहेत. मात्र हे खरे शेतकरी नसून ते सर्व राजकीय पक्षाचे पुढारी आहेत. नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत आपण स्थानिक आमदार व खासदारांना शेतकऱ्यांच्या चर्चेसाठी पाठविले होते. मात्र तेथे काही स्थानिक पुढारीच शेतकरी असल्याचे सांगून संप मागे न घेण्याचे सांगत होते. वस्तुत: आपणही शेतकऱ्यांच्या चर्चेसाठी तयार होतो. शेतकरी संपाची सुरुवात ज्या पुणतांबा येथून झाली होती त्यांनी संप मागे घेतला असून, आता सर्व शेतकऱ्यांनी त्यांचा माल विक्रीसाठी बाजार समित्यांमध्ये आणावा, त्यांना पोलीस बंदोबस्त हवा असल्यास प्रशासन मदत करेल, असे आवाहन गिरीश महाजन यांनी केले. नाशिकसह ज्या काही ठिकाणी संप सुरू ठेवण्याचा प्रकार घडत आहे, त्यात सर्व राजकीय पक्षांचे पुढारी घुसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. याप्रसंगी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार सीमा हिरे, बाळासाहेब सानप, उपमहापौर प्रथमेश गिते, वसंत गिते, लक्ष्मण सावजी, सुनील बागुल, सुनील खोडे, प्रशांत जाधव आदी उपस्थित होते.