शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

शेतकऱ्यांच्या आडून राजकीय पोळी भाजण्याचे काम : गिरीश महाजन

By admin | Updated: June 4, 2017 02:12 IST

काही राजकीय पक्षाचे पुढारी संप सुरूच ठेवून पोळी भाजण्याचे काम करीत असल्याचा आरोप पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किसान क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून शेतकऱ्यांच्या जवळपास सर्वच मागण्या मान्य केल्या आहेत. शेतकरी आंदोलन संपल्याने आपले काय होणार या भावनेनेच काही राजकीय पक्षाचे पुढारी संप सुरूच ठेवून आपली पोळी भाजण्याचे काम करीत असल्याचा आरोप जलसंपदामंत्री तथा जिल्ह्णाचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना केला.शेतकरी संपाची सुरुवात पुणतांबा येथून झाली होती. तेथील किसान क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी सविस्तर चर्चा करून शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. अल्पभूधारक शेतकऱ्यांचे १ आॅक्टोबरपर्यंत कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात तत्काळ कृषी मूल्य आयोगाची स्थापना करण्यात येणार आहे. एका महिन्याच्या आत दुधाचे दर वाढविले जाणार आहेत. तसेच सरकारने ठरवून दिलेल्या हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. जवळपास शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्यानेच शेतकरी संप मागे घेण्यात आल्याची घोषणा केली आहे. नाशिकला मात्र काही राजकीय पुढाऱ्यांनी संपात शेतकरी म्हणून सहभाग घेतला असून, ते आम्हाला संप मागे घेण्याचा निर्णय मान्य नसल्याचे सांगत आहेत. मात्र हे खरे शेतकरी नसून ते सर्व राजकीय पक्षाचे पुढारी आहेत. नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत आपण स्थानिक आमदार व खासदारांना शेतकऱ्यांच्या चर्चेसाठी पाठविले होते. मात्र तेथे काही स्थानिक पुढारीच शेतकरी असल्याचे सांगून संप मागे न घेण्याचे सांगत होते. वस्तुत: आपणही शेतकऱ्यांच्या चर्चेसाठी तयार होतो. शेतकरी संपाची सुरुवात ज्या पुणतांबा येथून झाली होती त्यांनी संप मागे घेतला असून, आता सर्व शेतकऱ्यांनी त्यांचा माल विक्रीसाठी बाजार समित्यांमध्ये आणावा, त्यांना पोलीस बंदोबस्त हवा असल्यास प्रशासन मदत करेल, असे आवाहन गिरीश महाजन यांनी केले. नाशिकसह ज्या काही ठिकाणी संप सुरू ठेवण्याचा प्रकार घडत आहे, त्यात सर्व राजकीय पक्षांचे पुढारी घुसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. याप्रसंगी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार सीमा हिरे, बाळासाहेब सानप, उपमहापौर प्रथमेश गिते, वसंत गिते, लक्ष्मण सावजी, सुनील बागुल, सुनील खोडे, प्रशांत जाधव आदी उपस्थित होते.