शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
4
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
5
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
6
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
7
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
8
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
9
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
10
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
11
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
12
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
13
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
14
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
15
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
16
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
17
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
18
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
19
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
20
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या आडून राजकीय पोळी भाजण्याचे काम : गिरीश महाजन

By admin | Updated: June 4, 2017 02:12 IST

काही राजकीय पक्षाचे पुढारी संप सुरूच ठेवून पोळी भाजण्याचे काम करीत असल्याचा आरोप पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किसान क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून शेतकऱ्यांच्या जवळपास सर्वच मागण्या मान्य केल्या आहेत. शेतकरी आंदोलन संपल्याने आपले काय होणार या भावनेनेच काही राजकीय पक्षाचे पुढारी संप सुरूच ठेवून आपली पोळी भाजण्याचे काम करीत असल्याचा आरोप जलसंपदामंत्री तथा जिल्ह्णाचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना केला.शेतकरी संपाची सुरुवात पुणतांबा येथून झाली होती. तेथील किसान क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी सविस्तर चर्चा करून शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. अल्पभूधारक शेतकऱ्यांचे १ आॅक्टोबरपर्यंत कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात तत्काळ कृषी मूल्य आयोगाची स्थापना करण्यात येणार आहे. एका महिन्याच्या आत दुधाचे दर वाढविले जाणार आहेत. तसेच सरकारने ठरवून दिलेल्या हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. जवळपास शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्यानेच शेतकरी संप मागे घेण्यात आल्याची घोषणा केली आहे. नाशिकला मात्र काही राजकीय पुढाऱ्यांनी संपात शेतकरी म्हणून सहभाग घेतला असून, ते आम्हाला संप मागे घेण्याचा निर्णय मान्य नसल्याचे सांगत आहेत. मात्र हे खरे शेतकरी नसून ते सर्व राजकीय पक्षाचे पुढारी आहेत. नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत आपण स्थानिक आमदार व खासदारांना शेतकऱ्यांच्या चर्चेसाठी पाठविले होते. मात्र तेथे काही स्थानिक पुढारीच शेतकरी असल्याचे सांगून संप मागे न घेण्याचे सांगत होते. वस्तुत: आपणही शेतकऱ्यांच्या चर्चेसाठी तयार होतो. शेतकरी संपाची सुरुवात ज्या पुणतांबा येथून झाली होती त्यांनी संप मागे घेतला असून, आता सर्व शेतकऱ्यांनी त्यांचा माल विक्रीसाठी बाजार समित्यांमध्ये आणावा, त्यांना पोलीस बंदोबस्त हवा असल्यास प्रशासन मदत करेल, असे आवाहन गिरीश महाजन यांनी केले. नाशिकसह ज्या काही ठिकाणी संप सुरू ठेवण्याचा प्रकार घडत आहे, त्यात सर्व राजकीय पक्षांचे पुढारी घुसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. याप्रसंगी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार सीमा हिरे, बाळासाहेब सानप, उपमहापौर प्रथमेश गिते, वसंत गिते, लक्ष्मण सावजी, सुनील बागुल, सुनील खोडे, प्रशांत जाधव आदी उपस्थित होते.