शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
2
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
3
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
4
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
5
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
6
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
7
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
8
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
9
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
10
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
11
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
12
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
13
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
14
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
15
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
16
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
17
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
19
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
20
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!

पुलाचे काम युद्धपातळीवर

By admin | Updated: January 30, 2016 22:51 IST

विंचूर-लासलगाव रस्ता : वाहतुकीचा प्रश्न लागणार मार्गी

विंचूर : विंचूर-लासलगामार्गावरील सुरू असलेल्या नवीन पुलाचे काम प्रगतिपथावर असून, पूल वाहतुकीसाठी लवकरच खुला होणार आहे. वर्षभरापासून कठडे नसणाऱ्या या धोकादायक पुलाच्या दुरुस्तीसह नवीन पुलामुळे विंचूर-लासलगाव मार्गावरील वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागणार असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.विंचूरसह पंचक्र ोशीतील गावे व लासलगाव या गावांमधील वाहतुकीसाठी महत्त्वाचा दुवा असणाऱ्या येथील स्मशन-भूमीजवळील ब्रिटिशकालीन पुलाचे कठडे तुटल्याने रहदारीच्या व नागरिकांच्या दृष्टीने पूल धोकादायक परिस्थितीत आहे. वर्षभरापासून कठडे नसलेल्या अरूंद पुलावरून प्रवास करावा लागत असल्याने वाहनधारकांसह ग्रामस्थांमध्ये नाराजी होती. याबाबत नागरिकांनी वेळोवेळी संबंधित विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. पुलावर दिवसभर वर्दळ असते. पुलाचे कठडे तुटलेले असल्याने दोन्ही बाजूने वाहने आल्यास वाहनधारकांना पूल पार करण्यासाठी कसरत करावी लागत होती. यामुळे वाहनधारकात नाराजीचा सूर होता. विंचूरसह पंचक्रोशीतील गावांसाठी प्रमुख बाजारपेठ असलेल्या लासलगावला जोडणारा हा प्रमुख मार्ग आहे. परिसरातील शेतकरी लासलगाव बाजार समितीच्या शेतमालाची वाहतूक याच रस्त्याने करीत असल्याने नेहमी वर्दळ असणाऱ्या या पुलाची दुरूस्ती करण्याबरोबरच रुंदी वाढविण्याची जुनी मागणी होती. अरूंद पुलावरून प्रवास करताना वाहनांचा अपघात होऊन जखमी होण्याच्या घटनांचे प्रमाण वाढले होते. पुलाची अवस्था बिकट झाल्याने वाहनधारकात नाराजी व्यक्त करण्यात येत होती.याबाबत प्रथम ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध करण्यात आले. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने कामास प्रारंभ करण्यात आला. दिवाळीदरम्यान दहा-बारा दिवस काम बंद होते. त्यानंतर मात्र युद्धपातळीवर पुलाचे व रस्त्याचे सपाटीकरण करण्याचे काम सुरू झाले. प्रथम जेसीबी, पोकलॅण्ड मशीनच्या साह्याने पुलानजीक असलेला गाळ व माती हटविण्याचे काम करण्यात आले. पुलाखाली पाणी असल्याने आठ ते दहा दिवसांपर्यंत गाळ काढणे व फाउंडेशनचे काम सुरू होते.(वार्ताहर)