शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पुलाचे काम युद्धपातळीवर

By admin | Updated: January 30, 2016 22:51 IST

विंचूर-लासलगाव रस्ता : वाहतुकीचा प्रश्न लागणार मार्गी

विंचूर : विंचूर-लासलगामार्गावरील सुरू असलेल्या नवीन पुलाचे काम प्रगतिपथावर असून, पूल वाहतुकीसाठी लवकरच खुला होणार आहे. वर्षभरापासून कठडे नसणाऱ्या या धोकादायक पुलाच्या दुरुस्तीसह नवीन पुलामुळे विंचूर-लासलगाव मार्गावरील वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागणार असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.विंचूरसह पंचक्र ोशीतील गावे व लासलगाव या गावांमधील वाहतुकीसाठी महत्त्वाचा दुवा असणाऱ्या येथील स्मशन-भूमीजवळील ब्रिटिशकालीन पुलाचे कठडे तुटल्याने रहदारीच्या व नागरिकांच्या दृष्टीने पूल धोकादायक परिस्थितीत आहे. वर्षभरापासून कठडे नसलेल्या अरूंद पुलावरून प्रवास करावा लागत असल्याने वाहनधारकांसह ग्रामस्थांमध्ये नाराजी होती. याबाबत नागरिकांनी वेळोवेळी संबंधित विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. पुलावर दिवसभर वर्दळ असते. पुलाचे कठडे तुटलेले असल्याने दोन्ही बाजूने वाहने आल्यास वाहनधारकांना पूल पार करण्यासाठी कसरत करावी लागत होती. यामुळे वाहनधारकात नाराजीचा सूर होता. विंचूरसह पंचक्रोशीतील गावांसाठी प्रमुख बाजारपेठ असलेल्या लासलगावला जोडणारा हा प्रमुख मार्ग आहे. परिसरातील शेतकरी लासलगाव बाजार समितीच्या शेतमालाची वाहतूक याच रस्त्याने करीत असल्याने नेहमी वर्दळ असणाऱ्या या पुलाची दुरूस्ती करण्याबरोबरच रुंदी वाढविण्याची जुनी मागणी होती. अरूंद पुलावरून प्रवास करताना वाहनांचा अपघात होऊन जखमी होण्याच्या घटनांचे प्रमाण वाढले होते. पुलाची अवस्था बिकट झाल्याने वाहनधारकात नाराजी व्यक्त करण्यात येत होती.याबाबत प्रथम ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध करण्यात आले. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने कामास प्रारंभ करण्यात आला. दिवाळीदरम्यान दहा-बारा दिवस काम बंद होते. त्यानंतर मात्र युद्धपातळीवर पुलाचे व रस्त्याचे सपाटीकरण करण्याचे काम सुरू झाले. प्रथम जेसीबी, पोकलॅण्ड मशीनच्या साह्याने पुलानजीक असलेला गाळ व माती हटविण्याचे काम करण्यात आले. पुलाखाली पाणी असल्याने आठ ते दहा दिवसांपर्यंत गाळ काढणे व फाउंडेशनचे काम सुरू होते.(वार्ताहर)