शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
2
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
3
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
4
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
5
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
6
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
7
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
8
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
9
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
10
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
11
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
12
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
13
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
14
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
15
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
16
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
17
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
18
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
19
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
20
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...

पावसाळ्यात महिलांची पाण्यासाठी वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:17 IST

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे गेल्या पाच ते सहा दिवसांपासून नळपाणी पुरवठा योजनेत बिघाड झाल्याने कृत्रिम पाणीटंचाई निर्माण ...

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे गेल्या पाच ते सहा दिवसांपासून नळपाणी पुरवठा योजनेत बिघाड झाल्याने कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. तसेच धरण परिसरातील वीजपुरवठा कमी दाबाने होत असल्याने पाणीपुरवठा करताना अडचणी निर्माण होत आहेत.

कणकोरीसह पाच गाव प्रादेशिक नळपाणी योजनेतून नांदूरशिंगोटे गावाला पाणीपुरवठा केला जातो. भोजापूर धरणातून पाच गावांसाठी पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली आहे. नांदूरशिंगोटे येथे मोठी बाजारपेठ तसेच बहुतांश नागरिक हे गावातच वास्तव्य करतात. त्यामुळे गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी एकमेव योजनेतील पाण्याचा स्रोत आहे. गेल्या आठ वर्षांपासून गावात व वस्तीवर दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. वारंवार योजनेत बिघाड होत असल्याने ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. गेल्या महिन्यापासून पाणीपुरवठा करताना मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत असल्याने आठवड्यातून एकदा किंवा दोनदा पाणीपुरवठा होत आहे. प्रामुख्याने धरण परिसरात योजनेची विहीर असून पाणी उपसा करताना अडचणी येत असल्याचे पदाधिकारी यांचे म्हणणे आहे. धरणात पाणी आहे तर वेळेवर वीजपुरवठा नाही. वीजपुरवठा सुरळीत सुरू झाला तर विद्युतपंप पाणी उपसा करीत नाही, तर काही ठिकाणी जलवाहिनी नादुरुस्त होते. त्यामुळे पाणीपुरवठा करताना अडचणी येत आहेत. परंतु ग्रामस्थांना तसेच व्यावसायिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अन्यत्र स्रोत नसल्याने पाण्यासाठी वणवण होत असून, विकत पाणी घ्यावे लागत आहे. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून गावात पाणीपुरवठा न झाल्याने कृत्रीम पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

-------------------

विद्युतपंप पाण्यात कोसळला

कणकोरीसह पाचगाव प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेची उद्भव विहीर भोजापूर धरणात आहे. विहिरीतून पाणी उपसा करून पाणीपुरवठा केला जातो. धरण परिसरात कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने विद्युतपंप सुरू होण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे दोन दिवस पाण्यास विलंब झाला. वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतर विद्युतपंपच विहिरीत खाली कोसळल्याचे समजते. विहिरीत अंदाजे १०० फुटांपर्यंत पाणी असून मोठ्या प्रमाणात गाळसुद्धा आहे. विद्युतपंप काढल्याशिवाय पाणीपुरवठा सुरळीत होणार नसल्याचे चित्र आहे. सुमारे दीड वर्षापूर्वी सदरची योजना दुरुस्तीसाठी ४० लाख रुपये जिल्हा परिषदेने खर्च केला आहे.