शहरं
Join us  
Trending Stories
1
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
2
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
3
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
4
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
5
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
6
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
7
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
8
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
9
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
10
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
11
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
12
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
13
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ
14
स्टार प्रवाहनंतर तेजश्री प्रधानचा 'झी मराठी'कडे यू-टर्न, यावर सतीश राजवाडे म्हणाले....
15
मालमत्तेवरून वाद विकोपाला, धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या कुटुंबाच्या अंगावर घातली गाडी, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
16
निमिषा प्रिया प्रकरण : फाशी टळली, पण दिलासा नाहीच! अता तलालचा भाऊ म्हणाला, "खून खरीद नहीं सकते, अल्लाह...!"
17
१० वर्षांच्या मुलाने चालवला ट्रक, लोकांचा जीव धोक्यात; Video पाहून चुकेल काळजाचा ठोका
18
“भाजपात संघटन चांगले, शिंदेसेनेत पक्षांतर्गत शिस्त नाही, त्यामुळे...”; हेमंत गोडसे थेट बोलले
19
"मुलींपासून दूर केलं, मला न सांगता..."; गुहेत सापडलेल्या रशियन महिलेच्या पतीने मांडली व्यथा
20
२४० km रेंज अन् स्टायलिश लूक; लॉन्च झाली दमदार EV क्रूझर बाईक, किंमत फक्त सव्वा लाख...

पावसाळ्यात महिलांची पाण्यासाठी वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:17 IST

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे गेल्या पाच ते सहा दिवसांपासून नळपाणी पुरवठा योजनेत बिघाड झाल्याने कृत्रिम पाणीटंचाई निर्माण ...

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे गेल्या पाच ते सहा दिवसांपासून नळपाणी पुरवठा योजनेत बिघाड झाल्याने कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. तसेच धरण परिसरातील वीजपुरवठा कमी दाबाने होत असल्याने पाणीपुरवठा करताना अडचणी निर्माण होत आहेत.

कणकोरीसह पाच गाव प्रादेशिक नळपाणी योजनेतून नांदूरशिंगोटे गावाला पाणीपुरवठा केला जातो. भोजापूर धरणातून पाच गावांसाठी पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली आहे. नांदूरशिंगोटे येथे मोठी बाजारपेठ तसेच बहुतांश नागरिक हे गावातच वास्तव्य करतात. त्यामुळे गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी एकमेव योजनेतील पाण्याचा स्रोत आहे. गेल्या आठ वर्षांपासून गावात व वस्तीवर दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. वारंवार योजनेत बिघाड होत असल्याने ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. गेल्या महिन्यापासून पाणीपुरवठा करताना मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत असल्याने आठवड्यातून एकदा किंवा दोनदा पाणीपुरवठा होत आहे. प्रामुख्याने धरण परिसरात योजनेची विहीर असून पाणी उपसा करताना अडचणी येत असल्याचे पदाधिकारी यांचे म्हणणे आहे. धरणात पाणी आहे तर वेळेवर वीजपुरवठा नाही. वीजपुरवठा सुरळीत सुरू झाला तर विद्युतपंप पाणी उपसा करीत नाही, तर काही ठिकाणी जलवाहिनी नादुरुस्त होते. त्यामुळे पाणीपुरवठा करताना अडचणी येत आहेत. परंतु ग्रामस्थांना तसेच व्यावसायिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अन्यत्र स्रोत नसल्याने पाण्यासाठी वणवण होत असून, विकत पाणी घ्यावे लागत आहे. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून गावात पाणीपुरवठा न झाल्याने कृत्रीम पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

-------------------

विद्युतपंप पाण्यात कोसळला

कणकोरीसह पाचगाव प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेची उद्भव विहीर भोजापूर धरणात आहे. विहिरीतून पाणी उपसा करून पाणीपुरवठा केला जातो. धरण परिसरात कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने विद्युतपंप सुरू होण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे दोन दिवस पाण्यास विलंब झाला. वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतर विद्युतपंपच विहिरीत खाली कोसळल्याचे समजते. विहिरीत अंदाजे १०० फुटांपर्यंत पाणी असून मोठ्या प्रमाणात गाळसुद्धा आहे. विद्युतपंप काढल्याशिवाय पाणीपुरवठा सुरळीत होणार नसल्याचे चित्र आहे. सुमारे दीड वर्षापूर्वी सदरची योजना दुरुस्तीसाठी ४० लाख रुपये जिल्हा परिषदेने खर्च केला आहे.