शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाड्यांमध्येही राबविणार ‘स्वच्छता अभियान’ महिला बालकल्याण समितीचा निर्णय

By admin | Updated: November 12, 2014 01:18 IST

अंगणवाड्यांमध्येही राबविणार ‘स्वच्छता अभियान’ महिला बालकल्याण समितीचा निर्णय

  नाशिक : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत राज्य शासनानेही आता ‘बाल स्वच्छता अभियान’ राबविण्याबाबत निर्णय घेतला असून, त्याची अंमलबजावणी १४ ते १९ नोव्हेंबरदरम्यान करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. महिला व बालकल्याण समितीची बैठक सभापती शोभा सुरेश डोखळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीत बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडून सर्वेक्षित बालके, पोषण आहार लाभार्थी, बालकांची वजने, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस यांच्या रिक्त पदांबाबत आढावा घेण्यात आला. त्याचप्रमाणे महिला व बालकल्याण विभागाचे आयुक्त यांनी ३ नोव्हेंबर २०१४ रोजी काढलेल्या आदेशानुसार १४ ते १९ नोव्हेंबरदरम्यान ‘बाल स्वच्छता अभियान’ राबविण्याचा निर्णय घेतला असून, त्यानुसार या सप्ताहाबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेश शोभा डोखळे यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी उद्धव खंदारे यांना दिले. या बाल स्वच्छता अभियानात अंगणवाडी केंद्र व परिसरात पत्रकानुसार दैनंदिन कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे आदेश प्रकल्प अधिकाऱ्यांना दिले आहेत. बैठकीस सदस्य कलावती चव्हाण, सुरेखा गोधडे, सुरेखा जिरे, सीमा बस्ते, शीला गवारे, सोनाली पवार, अलका साळुंखे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)