शहरं
Join us  
Trending Stories
1
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
2
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
3
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
4
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
5
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
6
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
7
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
8
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
9
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
10
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
11
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
12
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
13
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
14
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
15
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
16
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
18
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
19
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
20
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!

महिलेला पंचांसमोर नग्न अंघोळीची शिक्षा!

By admin | Updated: February 2, 2016 23:59 IST

काळिमा : चारित्र्य सिद्ध करण्यासाठी नंदुरबारच्या जातपंचायतीचा फतवा

नाशिक : जातपंचायतीच्या अमानुष कारभाराची प्रचिती देणारी प्रकरणे दिवसेंदिवस समोर येत आहेत. नंदुरबार येथील कंजारभाट समाजाच्या जातपंचायतीने एका महिलेला चारित्र्य सिद्ध करण्यासाठी चक्क पंचांसमोर नग्न अंघोळ करण्याची, तर तिच्या बारा वर्षाच्या मुलाला तापवलेली कुऱ्हाड हातात ठेवण्याची शिक्षा सुनावली आहे. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या जातपंचायतीच्या या फतव्याने संताप व्यक्त होत असून, सदर महिलेने याबाबत नाशिक पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे. सदर तक्रार अर्जानुसार, मूळ ओझर (ता. निफाड, जि. नाशिक) येथील एका महिलेचा १७ डिसेंबर २००० रोजी नंदुरबार येथील युवकाशी विवाह झाला होता. या दाम्पत्याला दोन मुलेही झाली. सन २०१३ मध्ये तिच्या पतीचे अचानक निधन झाले. त्यानंतर ही महिला मुलांच्या मदतीने पतीचे दुकान चालवून उदरनिर्वाह करीत होती. याच दरम्यान महिलेच्या मावस दीराने तिच्याकडे लग्नाचा आग्रह धरला. तिने नकार देताच मावस दीराने सासू व दीराकडे खोटे आरोप केले. त्यातून या महिलेस मारहाण झाली. याच दरम्यान समाज पंचकमिटीचे दीपक तमायचेकर, ज्ञानेश्वर गुमाने व कांती नेतले यांनी तिच्या आई-वडिलांना बोलावून घेऊन या प्रकरणाचा निवाडा जातपंचायतीत करण्याचा सल्ला दिला. तिला जातपंचायतीत बोलावण्यात आले. सासरच्यांनी तिला स्वीकारण्यास नकार दिला, मारहाणही करण्यात आली. त्यामुळे ही महिला ओझर येथे माहेरी राहू लागली. या दरम्यान ज्या परपुरुषाशी या महिलेचे संबंध असल्याचा जातपंचायतीत आरोप झाला, त्याने आधी नकार दिला व नंतर घूमजाव केले आणि महिलेशी आपले संबंध असल्याचे तो सांगू लागला. त्यावर पंचकमिटीने या महिलेला सांगितले की, एक वर्षानंतर रात्रभर तीनशे गोवऱ्या जाळून त्यात तीन किलोची कुऱ्हाड तापवली जाईल. ही कुऱ्हाड तुझ्या बारा वर्षांच्या मुलाच्या हातावर ठेवून त्याला सात पावले चालण्यास सांगितले जाईल. कुऱ्हाडीमुळे मुलाचे हात भाजल्यास तुझ्यावरील कलंक सिद्ध होईल आणि हाताला फोड न आल्यास चारित्र्य शुद्ध असल्याचे सिद्ध होईलमात्र पंचांना न जुमानता ती महिला पुन्हा ओझरला निघून आली. त्यानंतरही पंच कमिटीकडून तिच्या वडिलांना सतत फोनवर धमक्या येऊ लागल्या. तुमची मुलगी कलंकित असून, कलंकाचे निवारण करण्यासाठी तिला पंचांसमोर संपूर्ण नग्न होऊन अंघोळ करावी लागेल, असा अघोरी उपाय सांगण्यात आला. हा प्रकार गेल्या २० सप्टेंबर २०१५ रोजीच होणार होता; मात्र त्या महिलेने पंचांना अद्याप जुमानलेले नाही. त्यामुळे तिला वारंवार धमक्या येत आहेत. नंदुरबार पोलिसांनी संबंधित पंचांकडून असा अमानुष प्रकार करणार नाही, असे प्रतिज्ञापत्र लिहून घेतले असले, तरी पंचांकडून आग्रह सुरू असल्याची तक्रार या महिलेने केली आहे. दरम्यान, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जातपंचायत मूठमाती अभियानाचे समन्वयक कृष्णा चांदगुडे यांनी सदर प्रकरण उघडकीस आणले असून, या प्रकरणी पंचांवर कारवाईची मागणी होत आहे.इन्फो : असा आहे फतवा...कथित कलंकित महिलेने पंचांसमोर संपूर्ण कपडे काढून पंचांनी दिलेल्या फक्त सव्वा मीटर कापडाने अंग झाकावे. अशा अवस्थेत तिने १०७ पावले चालावे. तिच्यासोबत दोन महिला असतील. त्यापैकी एक तिला गव्हाच्या पिठाचे गरम गोळे फेकून मारील, तर दुसरी तिला रुईच्या गरम लाकडाने बडवेल. यानंतर या महिलेला पंचांसमोरच दूध व पाण्याने अंघोळ करावी लागेल. इन्फो : कायदा होण्याची गरजजातपंचायतीच्या कारभाराविरोधात लोक स्वत:हून पुढे येत आहेत; मात्र नेमक्या कोणत्या कलमाखाली गुन्हा दाखल करावा, याबाबत पोलिसांमध्येच संभ्रम आहे. जातपंचायतीच्या अमानुष, क्रूर कारभाराला रोखण्यासाठी जातपंचायतविरोधी कायद्याची नितांत आवश्यकता आहे. त्या दृष्टीने सरकारने लवकरात लवकर पाऊले उचलावीत.- कृष्णा चांदगुडे, कार्यकर्ते, अंनिस