शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
5
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
6
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
7
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
8
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
9
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
10
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
11
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
12
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
13
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
14
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
15
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
16
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
17
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
18
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
19
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
20
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल

धोका पत्कारण्याचे धाडस केल्याशिवाय वन्यजीव छायाचित्रण शक्य नाही - बैजू पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 22:10 IST

नाशिक : धोका पत्कारण्याचे धाडस केल्याशिवाय वन्यजीव छायाचित्रण शक्य नाही. निसर्गाविषयी मनात आपुलकी जर नसेल तर धोका पत्कारण्याचा अन् वन्यजीवांचे हावभाव टिपण्याचा प्रश्न उद्भवत नाही. त्यामुळे निसर्गाशी मैत्री व अभ्यासपूर्ण पध्दतीचा अवलंब छायाचित्रणासाठी गरजेचा ठरतो, असे मत प्रसिध्द वन्यजीव छायाचित्रकार बैजू पाटील यांनी व्यक्त केले.शहरातील काही निसर्गप्रेमींनी एकत्र येत मागील ...

ठळक मुद्देप्राणी-पक्ष्यांची जीवनशैली माहित करुन घेतल्याशिवाय त्यांचे क्रियाशिल छायाचित्र टिपणे अशक्य गोष्ट आहे. वन्यजीव व निसर्गाच्या छायाचित्रणासाठी भारतासारखा दुसरा सुंदर देश नाही. कारण या देशात जंगल, वाळवंट, हिमालयासारखा बर्फाळ प्रदेश, समुद्र सर्व काही उपलब्ध आहे

नाशिक : धोका पत्कारण्याचे धाडस केल्याशिवाय वन्यजीव छायाचित्रण शक्य नाही. निसर्गाविषयी मनात आपुलकी जर नसेल तर धोका पत्कारण्याचा अन् वन्यजीवांचे हावभाव टिपण्याचा प्रश्न उद्भवत नाही. त्यामुळे निसर्गाशी मैत्री व अभ्यासपूर्ण पध्दतीचा अवलंब छायाचित्रणासाठी गरजेचा ठरतो, असे मत प्रसिध्द वन्यजीव छायाचित्रकार बैजू पाटील यांनी व्यक्त केले.शहरातील काही निसर्गप्रेमींनी एकत्र येत मागील दोन वर्षांपासून ‘गाथा जंगलाची’ हा आगळावेगळा व निसर्गाची ओळख व अस्तित्वाची जाणीव करुन देणारा उपक्रम सुरू केला आहे. याअंतर्गत रविवारी (दि.१) परशुराम सायखेडकर सभागृहात पाटील यांची प्रकट मुलाखत पत्रकार वैशाली बालाजीवाले यांनी घेत विविध प्रश्नांच्या माध्यमातून नाशिककर निसर्गप्रेमींना जंगलाची अद्भूत सफर घडविली. यावेळी वन्यजीव छायाचित्रकार बिभास अमोणकर, अतुल धामणकर, भास भामरे, सारंग पाठक, मविप्रच्या सरचिटणीस नीलीमा पवार आदि मान्यवर उपस्थित होते.यावेळी पाटील यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले, औरंगाबाद हा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या शहरात लहानाचा मोठा झालो. लहानपणी येथे पर्यटनासाठी येणाºया परदेशी पाहुण्यांचे कॅमेºयांचे कुतुहल वाटत होते. या कुतुहूलापोटी आक र्षण निर्माण झाले आणि छायाचित्रणाकडे वळलो. निसर्ग हाच आपला गुरू मानत प्रवास सुरू केला आणि माझ्या छायाचित्रांना नागरिकांनी पसंत केले हे मी माझे भाग्य समजतो; मात्र पंचवीस वर्षांच्या या प्रवासात अद्यापही एक चांगले उत्कृष्ट छायाचित्र मिळण्याची प्रतीक्षा कायम आहे.

वन्यजीव छायाचित्रण करण्यासाठी संयम, प्रसांवधान, कौशल्य हे गुण विकसीत करावेच लागतात; मात्र त्यासोबत विविध पक्षी, प्राणी व जंगलांचा सुक्ष्म अभ्यासही महत्त्वाचा ठरतो. कारण प्राणी-पक्ष्यांची जीवनशैली माहित करुन घेतल्याशिवाय त्यांचे क्रियाशिल छायाचित्र टिपणे अशक्य गोष्ट आहे. वन्यजीव व निसर्गाच्या छायाचित्रणासाठी भारतासारखा दुसरा सुंदर देश नाही. कारण या देशात जंगल, वाळवंट, हिमालयासारखा बर्फाळ प्रदेश, समुद्र सर्व काही उपलब्ध आहे, असे पाटील यांनी यावेळी सांगितले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. दरम्यान, स्लाईड-शोच्या माध्यमातून जंगलाचा प्रवास उपस्थितांनी अनुभवला.