शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

धोका पत्कारण्याचे धाडस केल्याशिवाय वन्यजीव छायाचित्रण शक्य नाही - बैजू पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 22:10 IST

नाशिक : धोका पत्कारण्याचे धाडस केल्याशिवाय वन्यजीव छायाचित्रण शक्य नाही. निसर्गाविषयी मनात आपुलकी जर नसेल तर धोका पत्कारण्याचा अन् वन्यजीवांचे हावभाव टिपण्याचा प्रश्न उद्भवत नाही. त्यामुळे निसर्गाशी मैत्री व अभ्यासपूर्ण पध्दतीचा अवलंब छायाचित्रणासाठी गरजेचा ठरतो, असे मत प्रसिध्द वन्यजीव छायाचित्रकार बैजू पाटील यांनी व्यक्त केले.शहरातील काही निसर्गप्रेमींनी एकत्र येत मागील ...

ठळक मुद्देप्राणी-पक्ष्यांची जीवनशैली माहित करुन घेतल्याशिवाय त्यांचे क्रियाशिल छायाचित्र टिपणे अशक्य गोष्ट आहे. वन्यजीव व निसर्गाच्या छायाचित्रणासाठी भारतासारखा दुसरा सुंदर देश नाही. कारण या देशात जंगल, वाळवंट, हिमालयासारखा बर्फाळ प्रदेश, समुद्र सर्व काही उपलब्ध आहे

नाशिक : धोका पत्कारण्याचे धाडस केल्याशिवाय वन्यजीव छायाचित्रण शक्य नाही. निसर्गाविषयी मनात आपुलकी जर नसेल तर धोका पत्कारण्याचा अन् वन्यजीवांचे हावभाव टिपण्याचा प्रश्न उद्भवत नाही. त्यामुळे निसर्गाशी मैत्री व अभ्यासपूर्ण पध्दतीचा अवलंब छायाचित्रणासाठी गरजेचा ठरतो, असे मत प्रसिध्द वन्यजीव छायाचित्रकार बैजू पाटील यांनी व्यक्त केले.शहरातील काही निसर्गप्रेमींनी एकत्र येत मागील दोन वर्षांपासून ‘गाथा जंगलाची’ हा आगळावेगळा व निसर्गाची ओळख व अस्तित्वाची जाणीव करुन देणारा उपक्रम सुरू केला आहे. याअंतर्गत रविवारी (दि.१) परशुराम सायखेडकर सभागृहात पाटील यांची प्रकट मुलाखत पत्रकार वैशाली बालाजीवाले यांनी घेत विविध प्रश्नांच्या माध्यमातून नाशिककर निसर्गप्रेमींना जंगलाची अद्भूत सफर घडविली. यावेळी वन्यजीव छायाचित्रकार बिभास अमोणकर, अतुल धामणकर, भास भामरे, सारंग पाठक, मविप्रच्या सरचिटणीस नीलीमा पवार आदि मान्यवर उपस्थित होते.यावेळी पाटील यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले, औरंगाबाद हा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या शहरात लहानाचा मोठा झालो. लहानपणी येथे पर्यटनासाठी येणाºया परदेशी पाहुण्यांचे कॅमेºयांचे कुतुहल वाटत होते. या कुतुहूलापोटी आक र्षण निर्माण झाले आणि छायाचित्रणाकडे वळलो. निसर्ग हाच आपला गुरू मानत प्रवास सुरू केला आणि माझ्या छायाचित्रांना नागरिकांनी पसंत केले हे मी माझे भाग्य समजतो; मात्र पंचवीस वर्षांच्या या प्रवासात अद्यापही एक चांगले उत्कृष्ट छायाचित्र मिळण्याची प्रतीक्षा कायम आहे.

वन्यजीव छायाचित्रण करण्यासाठी संयम, प्रसांवधान, कौशल्य हे गुण विकसीत करावेच लागतात; मात्र त्यासोबत विविध पक्षी, प्राणी व जंगलांचा सुक्ष्म अभ्यासही महत्त्वाचा ठरतो. कारण प्राणी-पक्ष्यांची जीवनशैली माहित करुन घेतल्याशिवाय त्यांचे क्रियाशिल छायाचित्र टिपणे अशक्य गोष्ट आहे. वन्यजीव व निसर्गाच्या छायाचित्रणासाठी भारतासारखा दुसरा सुंदर देश नाही. कारण या देशात जंगल, वाळवंट, हिमालयासारखा बर्फाळ प्रदेश, समुद्र सर्व काही उपलब्ध आहे, असे पाटील यांनी यावेळी सांगितले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. दरम्यान, स्लाईड-शोच्या माध्यमातून जंगलाचा प्रवास उपस्थितांनी अनुभवला.