शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

याद्यांच्या पडताळणीशिवाय नाशिक जिल्ह्यातील  शेतक-यांच्या खात्यावर पैसे नाहीच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 15:06 IST

सध्या राज्याच्या माहिती व तंत्रज्ञान खात्याच्या कारभार अतिशय संथपणे सुरू असून, त्यावर शासनाने वेळोवेळी नाराजीही व्यक्त केली आहे, दुसरीकडे शासनाने नोव्हेंबर अखेर सर्व शेतक-यांच्या खात्यावर पैसे जमा होतील असे आश्वासनही दिले आहे. परंतु सध्याची परिस्थिती पाहता नोव्हेंबर अखेर हे काम होणे शक्य नसून, सहकार खात्याच्या अधिका-यांच्या मते अजुन किमान २० दिवसांचा कालावधी त्यासाठी लागू शकतो.

ठळक मुद्देशेतकरी कर्जमाफी : फक्त एक टक्केच काम अद्याप पुर्ण

नाशिक : राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गंत जिल्ह्यातील शेतक-यांनी आॅनलाईन भरलेल्या माहितीची संपुर्ण पडताळणी झाल्याशिवाय एकाही शेतक-याच्या खात्यावर पैसे वर्ग केले जाणार नसल्याचे स्पष्ट झाले असून, नाशिक जिल्ह्यातील ८७९ शेतक-यांच्या कर्जमाफी अर्जांची आजपावेतो पडताळणी झाली असल्याने अजुन ९९ टक्के काम अपुर्ण असल्याने शेतक-यांना नोव्हेंबर अखेर कर्जमाफी मिळण्याची शक्यता तशी कमीच आहे.कर्जबाजारी शेतक-यांचे कर्जमाफ करण्याच्या मागणीसाठी शेतक-यांनी केलेल्या आंदोलनाची दखल घेत शासनाने जून महिन्यात शेतकरी कर्जमाफीची घोषणा करून त्यासाठी तीन टप्पे जाहीर केले होते. दिड लाख रूपयांपर्यंतचे संपुर्ण कर्ज माफ करण्याबरोबरच त्यापुढील कर्जदार शेतक-याने उर्वरित कर्जाचा भरणा केल्यास त्यालाही या दिड लाख कर्जमाफीचा लाभ देण्याचा व ज्यांनी संपुर्ण कर्जफेड केली त्यांना २५ हजार रूपये प्रोत्साहन अनुदान देण्याचे जाहीर केले होते. त्यासाठी शेतक-यांनी आॅनलाईन कर्जमाफीचा अर्ज सादर करण्याची तरतूद केली होती. नाशिक जिल्ह्यातील सुमारे एक लाख ८० हजार शेतक-यांनी आॅनलाईन अर्ज दाखल केले असून, त्यांनी कर्ज घेतलेल्या जिल्हा व राष्टÑीयकृत बॅँकांनी देखील आपल्याकडील शेतकरी कर्जाची माहिती शासनाकडे सादर केली होती. शेतक-यांनी सादर केलेली आॅनलाईन माहिती व बॅँकांची माहिती या दोघांची पडताळणी करणारे सॉफ्टवेअर शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने तयार केले असून, त्याच्या आधारे जिल्ह्यातील फक्त ८७९ शेतक-यांच्या माहितीची आजपावेतो पडताळणी केली आहे. एकूण शेतक-यांच्या अर्जांचा विचार करता हे प्रमाण फक्त एक टक्के इतके आहे. ज्या शेतक-यांच्या अर्जांची पडताळणी करण्यात आली, त्यांच्या कर्जाचे पैसे जिल्हा बॅँकेला प्राप्त झालेले असले तरी, कर्जदार शेतक-यांच्या अर्जाची पडताळणी करण्यासाठी तालुकास्तरीय समित्यांकडून अहवाल आल्याशिवाय शेतक-यांच्या खात्यावर पैसे टाकणे शाासनाच्या नियमांमुळे शक्य नाही.सध्या राज्याच्या माहिती व तंत्रज्ञान खात्याच्या कारभार अतिशय संथपणे सुरू असून, त्यावर शासनाने वेळोवेळी नाराजीही व्यक्त केली आहे, दुसरीकडे शासनाने नोव्हेंबर अखेर सर्व शेतक-यांच्या खात्यावर पैसे जमा होतील असे आश्वासनही दिले आहे. परंतु सध्याची परिस्थिती पाहता नोव्हेंबर अखेर हे काम होणे शक्य नसून, सहकार खात्याच्या अधिका-यांच्या मते अजुन किमान २० दिवसांचा कालावधी त्यासाठी लागू शकतो.

टॅग्स :agricultureशेतीbankबँक