शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

याद्यांच्या पडताळणीशिवाय नाशिक जिल्ह्यातील  शेतक-यांच्या खात्यावर पैसे नाहीच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 15:06 IST

सध्या राज्याच्या माहिती व तंत्रज्ञान खात्याच्या कारभार अतिशय संथपणे सुरू असून, त्यावर शासनाने वेळोवेळी नाराजीही व्यक्त केली आहे, दुसरीकडे शासनाने नोव्हेंबर अखेर सर्व शेतक-यांच्या खात्यावर पैसे जमा होतील असे आश्वासनही दिले आहे. परंतु सध्याची परिस्थिती पाहता नोव्हेंबर अखेर हे काम होणे शक्य नसून, सहकार खात्याच्या अधिका-यांच्या मते अजुन किमान २० दिवसांचा कालावधी त्यासाठी लागू शकतो.

ठळक मुद्देशेतकरी कर्जमाफी : फक्त एक टक्केच काम अद्याप पुर्ण

नाशिक : राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गंत जिल्ह्यातील शेतक-यांनी आॅनलाईन भरलेल्या माहितीची संपुर्ण पडताळणी झाल्याशिवाय एकाही शेतक-याच्या खात्यावर पैसे वर्ग केले जाणार नसल्याचे स्पष्ट झाले असून, नाशिक जिल्ह्यातील ८७९ शेतक-यांच्या कर्जमाफी अर्जांची आजपावेतो पडताळणी झाली असल्याने अजुन ९९ टक्के काम अपुर्ण असल्याने शेतक-यांना नोव्हेंबर अखेर कर्जमाफी मिळण्याची शक्यता तशी कमीच आहे.कर्जबाजारी शेतक-यांचे कर्जमाफ करण्याच्या मागणीसाठी शेतक-यांनी केलेल्या आंदोलनाची दखल घेत शासनाने जून महिन्यात शेतकरी कर्जमाफीची घोषणा करून त्यासाठी तीन टप्पे जाहीर केले होते. दिड लाख रूपयांपर्यंतचे संपुर्ण कर्ज माफ करण्याबरोबरच त्यापुढील कर्जदार शेतक-याने उर्वरित कर्जाचा भरणा केल्यास त्यालाही या दिड लाख कर्जमाफीचा लाभ देण्याचा व ज्यांनी संपुर्ण कर्जफेड केली त्यांना २५ हजार रूपये प्रोत्साहन अनुदान देण्याचे जाहीर केले होते. त्यासाठी शेतक-यांनी आॅनलाईन कर्जमाफीचा अर्ज सादर करण्याची तरतूद केली होती. नाशिक जिल्ह्यातील सुमारे एक लाख ८० हजार शेतक-यांनी आॅनलाईन अर्ज दाखल केले असून, त्यांनी कर्ज घेतलेल्या जिल्हा व राष्टÑीयकृत बॅँकांनी देखील आपल्याकडील शेतकरी कर्जाची माहिती शासनाकडे सादर केली होती. शेतक-यांनी सादर केलेली आॅनलाईन माहिती व बॅँकांची माहिती या दोघांची पडताळणी करणारे सॉफ्टवेअर शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने तयार केले असून, त्याच्या आधारे जिल्ह्यातील फक्त ८७९ शेतक-यांच्या माहितीची आजपावेतो पडताळणी केली आहे. एकूण शेतक-यांच्या अर्जांचा विचार करता हे प्रमाण फक्त एक टक्के इतके आहे. ज्या शेतक-यांच्या अर्जांची पडताळणी करण्यात आली, त्यांच्या कर्जाचे पैसे जिल्हा बॅँकेला प्राप्त झालेले असले तरी, कर्जदार शेतक-यांच्या अर्जाची पडताळणी करण्यासाठी तालुकास्तरीय समित्यांकडून अहवाल आल्याशिवाय शेतक-यांच्या खात्यावर पैसे टाकणे शाासनाच्या नियमांमुळे शक्य नाही.सध्या राज्याच्या माहिती व तंत्रज्ञान खात्याच्या कारभार अतिशय संथपणे सुरू असून, त्यावर शासनाने वेळोवेळी नाराजीही व्यक्त केली आहे, दुसरीकडे शासनाने नोव्हेंबर अखेर सर्व शेतक-यांच्या खात्यावर पैसे जमा होतील असे आश्वासनही दिले आहे. परंतु सध्याची परिस्थिती पाहता नोव्हेंबर अखेर हे काम होणे शक्य नसून, सहकार खात्याच्या अधिका-यांच्या मते अजुन किमान २० दिवसांचा कालावधी त्यासाठी लागू शकतो.

टॅग्स :agricultureशेतीbankबँक