शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
3
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
4
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
5
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
9
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
11
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
12
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
13
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
14
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
15
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
16
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
17
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
18
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
19
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
20
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड

करवा चौथद्वारे महिलांनी केली पतीच्या दीर्घायुष्याची कामना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 00:37 IST

शहरातील उत्तर भारतीयांसह विविध महिलांनी दिवसभर ‘करवा चौथ’ व्रत करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी कामना केली. कोजागरी पौर्णिमेनंतर येणाऱ्या चतुर्थीला म्हणजेच शनिवारी (दि.२७) हे व्रत करण्यात आले. त्यानुसार महिलांनी दिवसभर निर्जली उपवास केला. चंद्रदर्शन झाल्यानंतर चंद्र आणि मग पतीचे औक्षण करून व्रताची सांगता करण्यात आली.

नाशिक : शहरातील उत्तर भारतीयांसह विविध महिलांनी दिवसभर ‘करवा चौथ’ व्रत करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी कामना केली. कोजागरी पौर्णिमेनंतर येणाऱ्या चतुर्थीला म्हणजेच शनिवारी (दि.२७) हे व्रत करण्यात आले. त्यानुसार महिलांनी दिवसभर निर्जली उपवास केला. चंद्रदर्शन झाल्यानंतर चंद्र आणि मग पतीचे औक्षण करून व्रताची सांगता करण्यात आली.  मुख्यत्वे उत्तर भारतातील असलेल्या आणि सध्या नाशिकस्थित महिलांनी श्रद्धेने आणि उत्साहाने हे व्रत केले. या उपवासाच्या आदल्या दिवशी हातावर मेहंदी रेखाटली. लाल रंगाच्या साड्या किंवा ड्रेस परिधान केले. नवी वस्त्रे आणि सोळाशृंगार हे या व्रताचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. यासाठी महिलांनी शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत खरेदी पूर्ण केली  होती.  रात्री चंद्रदर्शन झाल्यानंतर चाळणीतून चंद्राचे आणि पतीचे दर्शन घेत, त्यांचे औक्षण केले व नंतर उपवास सोडला. करवा चौथच्या दिवशी पुरी, भाजी, शिरा असा स्वयंपाक केला जातो. भात शिजवला जात नाही. त्याचे पालन करत स्वयंपाक करण्यात आला होता.म्हणून केली जाते ‘करवा चौथ’ची पूजासात भावांची आवडती आणि एकुलती एक बहीण वीरावती ही आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी निर्जली उपवास ठेवते. चंद्राचे दर्शन होत नसल्याने तिला आपला उपवास सोडता येत नाही. त्यामुळे अन्न पाण्यावाचून तिष्ठत असलेल्या आपल्या बहिणीला पाहून या सातही भावांना दु:ख होते. जोपर्यंत चंद्रदर्शन होणार नाही तोपर्यंत वीरावती अन्न ग्रहण करणार नाही हे त्यांना चांगलेच ठाऊक होते. त्यामुळे शक्कल लढवून ते वीरावतीला उपवास सोडायला भाग पाडतात. घराशेजारी असणाºया झाडावर गोलाकार आरसा ठेवून तो चंद्र आहे असे सांगत तिचे सातही भाऊ तिला उपवास सोडायला भाग पाडतात. भावांच्या सांगण्यावर विश्वास ठेवत वीरावतीदेखील आपला उपवास सोडते. पण खºया चंद्राचे दर्शन न घेता व्रताचा नियम मोडल्यामुळे तिचा पती मरण पावतो. भावांकडून फसवले गेल्यामुळे आणि पतीचा मृत्यू झाल्यामुळे दु:खी झालेली वीरावती अश्रू ढाळत बसते. अशावेळी देवी तिथे प्रगट होते. रडणाºया वीरावतीला दु:खाचे कारण विचारते. तेव्हा वीरावती सगळी कहाणी सांगते. वीरावती आणि तिच्या भावाकडून अनावधानाने झालेली चूक लक्षात घेता देवी तिला पुन्हा उपवास करायला सांगते आणि वीरावतीचा पती पुन्हा जिवंत होतो. अशी ही दंतकथा या व्रतामागे आहे. इतरही अनेक कथा प्रचलित आहेत.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमcultureसांस्कृतिक