शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

करवा चौथद्वारे महिलांनी केली पतीच्या दीर्घायुष्याची कामना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 00:37 IST

शहरातील उत्तर भारतीयांसह विविध महिलांनी दिवसभर ‘करवा चौथ’ व्रत करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी कामना केली. कोजागरी पौर्णिमेनंतर येणाऱ्या चतुर्थीला म्हणजेच शनिवारी (दि.२७) हे व्रत करण्यात आले. त्यानुसार महिलांनी दिवसभर निर्जली उपवास केला. चंद्रदर्शन झाल्यानंतर चंद्र आणि मग पतीचे औक्षण करून व्रताची सांगता करण्यात आली.

नाशिक : शहरातील उत्तर भारतीयांसह विविध महिलांनी दिवसभर ‘करवा चौथ’ व्रत करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी कामना केली. कोजागरी पौर्णिमेनंतर येणाऱ्या चतुर्थीला म्हणजेच शनिवारी (दि.२७) हे व्रत करण्यात आले. त्यानुसार महिलांनी दिवसभर निर्जली उपवास केला. चंद्रदर्शन झाल्यानंतर चंद्र आणि मग पतीचे औक्षण करून व्रताची सांगता करण्यात आली.  मुख्यत्वे उत्तर भारतातील असलेल्या आणि सध्या नाशिकस्थित महिलांनी श्रद्धेने आणि उत्साहाने हे व्रत केले. या उपवासाच्या आदल्या दिवशी हातावर मेहंदी रेखाटली. लाल रंगाच्या साड्या किंवा ड्रेस परिधान केले. नवी वस्त्रे आणि सोळाशृंगार हे या व्रताचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. यासाठी महिलांनी शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत खरेदी पूर्ण केली  होती.  रात्री चंद्रदर्शन झाल्यानंतर चाळणीतून चंद्राचे आणि पतीचे दर्शन घेत, त्यांचे औक्षण केले व नंतर उपवास सोडला. करवा चौथच्या दिवशी पुरी, भाजी, शिरा असा स्वयंपाक केला जातो. भात शिजवला जात नाही. त्याचे पालन करत स्वयंपाक करण्यात आला होता.म्हणून केली जाते ‘करवा चौथ’ची पूजासात भावांची आवडती आणि एकुलती एक बहीण वीरावती ही आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी निर्जली उपवास ठेवते. चंद्राचे दर्शन होत नसल्याने तिला आपला उपवास सोडता येत नाही. त्यामुळे अन्न पाण्यावाचून तिष्ठत असलेल्या आपल्या बहिणीला पाहून या सातही भावांना दु:ख होते. जोपर्यंत चंद्रदर्शन होणार नाही तोपर्यंत वीरावती अन्न ग्रहण करणार नाही हे त्यांना चांगलेच ठाऊक होते. त्यामुळे शक्कल लढवून ते वीरावतीला उपवास सोडायला भाग पाडतात. घराशेजारी असणाºया झाडावर गोलाकार आरसा ठेवून तो चंद्र आहे असे सांगत तिचे सातही भाऊ तिला उपवास सोडायला भाग पाडतात. भावांच्या सांगण्यावर विश्वास ठेवत वीरावतीदेखील आपला उपवास सोडते. पण खºया चंद्राचे दर्शन न घेता व्रताचा नियम मोडल्यामुळे तिचा पती मरण पावतो. भावांकडून फसवले गेल्यामुळे आणि पतीचा मृत्यू झाल्यामुळे दु:खी झालेली वीरावती अश्रू ढाळत बसते. अशावेळी देवी तिथे प्रगट होते. रडणाºया वीरावतीला दु:खाचे कारण विचारते. तेव्हा वीरावती सगळी कहाणी सांगते. वीरावती आणि तिच्या भावाकडून अनावधानाने झालेली चूक लक्षात घेता देवी तिला पुन्हा उपवास करायला सांगते आणि वीरावतीचा पती पुन्हा जिवंत होतो. अशी ही दंतकथा या व्रतामागे आहे. इतरही अनेक कथा प्रचलित आहेत.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमcultureसांस्कृतिक