शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

मतविभागणीवर विजयाचे गणित

By admin | Updated: February 12, 2017 00:35 IST

मतविभागणीवर विजयाचे गणित

 मनोज मालपाणी नाशिकरोडजेलरोड प्रभाग १८ मध्ये शिवसेना, भाजपामध्ये झालेली बंडाळी, आघाडी व मनसेचे पूर्ण होऊ न शकलेले पॅनल अशाही परिस्थितीत पारंपरिक प्रतिस्पर्धी आमने-सामने आल्याने प्रभागाच्या सर्व जागांवर चुरस कायम आहे. प्रभाग ३२ आणि ३५ चा परिसर मिळून प्रभाग १८ तयार झाल्याने जुन्या प्रभागाचे अशोक सातभाई, रंजना बोराडे, पवन पवार, शोभना शिंदे यांचा प्रभावक्षेत्र नव्या प्रभागात आहे. पोटनिवडणुकीत मंदाबाई ढिकले या विजयी झाल्या आहेत, तर दुसरीकडे सलग २५ वर्ष प्रकाश व रंजना बोराडे दाम्पत्य या भागातून विविध पक्षाच्या झेेंड्याखाली प्रतिनिधित्व करीत आहेत. पंचक गावठाण, कॅनॉलरोड झोपडपट्टी व्यतिरिक्त सर्व परिसर सोसायटी, कॉलनीचा आहे. या भागात सर्वच पक्षाचे कमी अधिक प्राबल्य असले तरी येथून जातीपातीचे राजकाराण नेहमीच वरचढ ठरले आहे. पक्षाचे प्राबल्य असले तरी शिवसेना, भाजपाला बंडखोरीचा काही प्रमाणात सामना करावा लागणार आहे, तर आघाडी, मनसेचे पॅनल पूर्ण होऊ शकले नाही.‘अ’ अनुसूचित गटातून सेनेकडून माजी नगरसेविका शोभना संजय शिंदे, भाजपा-शरद मोरे, अपक्ष पवन पवार, आघाडीचे मनोजकुमार रोकडे, सेनेच्या बंडखोर शांताबाई शेजवळ निवडणूक रिंगणात आहेत. भाजपावासी झालेले अपक्ष नगरसेवक पवन पवार यांच्यावरील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या आरोपांमुळे भाजपाने पवार यांना उमेदवारी दिली नाही. त्यामुळे पवार अपक्ष म्हणून रिंगणात आहे. असे असले तरी भाजपाची अंतर्गत भूमिका असल्याचीही चर्चा लपून राहिलेली नाही. मनसेकडून पोटनिवडणूक लढविलेल्या शांताबाई शेजवळ यांचे नाव सेनेत मागे पडले. त्यामुळे शेजवळ यांनीदेखील बंडाचे निशाण फडकवले. मनसेला या गटात उमेदवार नाही, तर आघाडीकडून कॉँग्रेसचे मनोजकुमार रोकडे आपल्या परीने खिंड लढवत आहे. ‘ब’ इतर मागासवर्ग महिला प्रवर्गातून रंजना बोराडे, भाजपा मंदा फड, आघाडी कडून राष्ट्रवादीच्या संगीता तुपे, सुशीला खरोटे, लता ढिकले रिंगणात आहे. आघाडीच्या तुपे यांना स्वत:लाच यंत्रणा उभी करावी लागत आहे. ‘क’ सर्वसाधारण महिला गटात भाजपाच्या मीराबाई हांडगे, शिवसेना शीतल ताकाटे, मनसे रोहिणी संतोष पिल्ले, भाजपा बंडखोर मंदाबाई ढिकले, गेल्या निवडणुकीत भाजपाकडून निवडणूक लढविलेल्या सुलोचना बोराडे, केतकी बोराडे या निवडणूक रिंगणात आहेत. भाजपाचा जुना कार्यकर्ता सचिन हांडगे याला स्वत:ची उमेदवारी मिळविण्यासाठी शेवटपर्यंत झगडावे लागले तर मातोश्री मीराबाई यांना उमेदवारी मिळाली. पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या मंदाबाई ढिकले यांची उमेदवारी कापल्याने बंडखोरी करावी लागली आहे.