शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

मद्य विक्रेत्यांचा धीर सुटला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 01:24 IST

शहरातून जाणाºया राष्टÑीय व राज्य महामार्गावरील मद्य विक्रीच्या दुकानांना डिसेंबर महिन्यात दिलेला निकाल लागू नाही, असे स्पष्टीकरण सर्वोच्च न्यायालयाने देऊन आठ दिवसांचा कालावधी उलटला तरी, शासन पातळीवर त्याची अंमलबजावणी करण्याबाबत कोणतीही पावले उचलली जात नसल्याने मद्य विक्रेत्यांचा धीर सुटत चालला असून, न्यायालयीन आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी शासनाविरुद्ध अवमान याचिका दाखल करण्याची तयारी त्यांनी चालविली आहे.

नाशिक : शहरातून जाणाºया राष्टÑीय व राज्य महामार्गावरील मद्य विक्रीच्या दुकानांना डिसेंबर महिन्यात दिलेला निकाल लागू नाही, असे स्पष्टीकरण सर्वोच्च न्यायालयाने देऊन आठ दिवसांचा कालावधी उलटला तरी, शासन पातळीवर त्याची अंमलबजावणी करण्याबाबत कोणतीही पावले उचलली जात नसल्याने मद्य विक्रेत्यांचा धीर सुटत चालला असून, न्यायालयीन आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी शासनाविरुद्ध अवमान याचिका दाखल करण्याची तयारी त्यांनी चालविली आहे.सर्वोच्च न्यायालयाने डिसेंबर १६ मध्ये एका जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान राष्टÑीय व राज्य महामार्गावर पाचशे मीटर अंतरावर असलेल्या सर्व प्रकारच्या मद्य विक्रीचे परवाने १ एप्रिलनंतर नूतनीकरण न करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाची अंमलबजावणी १ एप्रिल २०१७ पासून देशपातळीवर करण्यात आली. त्यात नाशिक जिल्ह्यातील जवळपास ७० टक्के मद्य विक्रेत्यांवर गंडांतर आले. या निर्णयामुळे हॉटेल्स, रेस्टॉरंट, परमिट रूम बिअर बारवर केलेली कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक मातीमोल होऊन हजारो कारागीर बेरोजगार झाले. त्यामुळे मद्य विक्रेत्यांनी राष्टÑीय व राज्य महामार्गावर असलेले परवाने शहराच्या मध्यवस्तीत स्थलांतर करण्याचे प्रयत्न सुरू केले असता जागोजागी नागरिकांनी केलेल्या विरोधाने हा प्रयत्नही बारगळला. दरम्यान, यासंदर्भात चंदीगढच्या व्यावसायिकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्याने त्या संदर्भात झालेल्या सुनावणीत न्यायालयाने शहरातून जाणाºया राष्टÑीय व राज्य महामार्गासाठी न्यायालयाचा डिसेंबरचा आदेश लागू राहणार नाही, असे निर्देश ११ जुलै रोजी दिले. यासंदर्भात सोमवारीच नाशिकच्या हॉटेल्स अ‍ॅण्ड बार असोसिएशनने उत्पादन शुल्क अधीक्षकांना निवेदन देऊन न्यायालय आदेशाची अंमलबजावणी करण्याची विनंती केली. तथापि, हा सर्वस्वी अधिकार शासनाचा असल्याचे सांगून राज्य उत्पादन शुल्क विभागाने हतबलता व्यक्त केली. एकीकडे दररोज लाखो रुपयांचे होत असलेले व्यावसायिक नुकसान तर दुसरीकडे शासनाकडून केल्या जात असलेल्या दुर्लक्षामुळे मद्य विक्रेते हैराण झाल्याने त्यावर अखेरचा पर्याय म्हणून आता त्यांनी शासनाविरुद्ध अवमान याचिका दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे.