शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
5
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
6
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
7
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
8
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
9
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
10
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
11
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
12
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
13
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
14
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
15
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
16
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
17
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
18
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
19
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
20
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
Daily Top 2Weekly Top 5

मद्य विक्रेत्यांचा धीर सुटला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 01:24 IST

शहरातून जाणाºया राष्टÑीय व राज्य महामार्गावरील मद्य विक्रीच्या दुकानांना डिसेंबर महिन्यात दिलेला निकाल लागू नाही, असे स्पष्टीकरण सर्वोच्च न्यायालयाने देऊन आठ दिवसांचा कालावधी उलटला तरी, शासन पातळीवर त्याची अंमलबजावणी करण्याबाबत कोणतीही पावले उचलली जात नसल्याने मद्य विक्रेत्यांचा धीर सुटत चालला असून, न्यायालयीन आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी शासनाविरुद्ध अवमान याचिका दाखल करण्याची तयारी त्यांनी चालविली आहे.

नाशिक : शहरातून जाणाºया राष्टÑीय व राज्य महामार्गावरील मद्य विक्रीच्या दुकानांना डिसेंबर महिन्यात दिलेला निकाल लागू नाही, असे स्पष्टीकरण सर्वोच्च न्यायालयाने देऊन आठ दिवसांचा कालावधी उलटला तरी, शासन पातळीवर त्याची अंमलबजावणी करण्याबाबत कोणतीही पावले उचलली जात नसल्याने मद्य विक्रेत्यांचा धीर सुटत चालला असून, न्यायालयीन आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी शासनाविरुद्ध अवमान याचिका दाखल करण्याची तयारी त्यांनी चालविली आहे.सर्वोच्च न्यायालयाने डिसेंबर १६ मध्ये एका जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान राष्टÑीय व राज्य महामार्गावर पाचशे मीटर अंतरावर असलेल्या सर्व प्रकारच्या मद्य विक्रीचे परवाने १ एप्रिलनंतर नूतनीकरण न करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाची अंमलबजावणी १ एप्रिल २०१७ पासून देशपातळीवर करण्यात आली. त्यात नाशिक जिल्ह्यातील जवळपास ७० टक्के मद्य विक्रेत्यांवर गंडांतर आले. या निर्णयामुळे हॉटेल्स, रेस्टॉरंट, परमिट रूम बिअर बारवर केलेली कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक मातीमोल होऊन हजारो कारागीर बेरोजगार झाले. त्यामुळे मद्य विक्रेत्यांनी राष्टÑीय व राज्य महामार्गावर असलेले परवाने शहराच्या मध्यवस्तीत स्थलांतर करण्याचे प्रयत्न सुरू केले असता जागोजागी नागरिकांनी केलेल्या विरोधाने हा प्रयत्नही बारगळला. दरम्यान, यासंदर्भात चंदीगढच्या व्यावसायिकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्याने त्या संदर्भात झालेल्या सुनावणीत न्यायालयाने शहरातून जाणाºया राष्टÑीय व राज्य महामार्गासाठी न्यायालयाचा डिसेंबरचा आदेश लागू राहणार नाही, असे निर्देश ११ जुलै रोजी दिले. यासंदर्भात सोमवारीच नाशिकच्या हॉटेल्स अ‍ॅण्ड बार असोसिएशनने उत्पादन शुल्क अधीक्षकांना निवेदन देऊन न्यायालय आदेशाची अंमलबजावणी करण्याची विनंती केली. तथापि, हा सर्वस्वी अधिकार शासनाचा असल्याचे सांगून राज्य उत्पादन शुल्क विभागाने हतबलता व्यक्त केली. एकीकडे दररोज लाखो रुपयांचे होत असलेले व्यावसायिक नुकसान तर दुसरीकडे शासनाकडून केल्या जात असलेल्या दुर्लक्षामुळे मद्य विक्रेते हैराण झाल्याने त्यावर अखेरचा पर्याय म्हणून आता त्यांनी शासनाविरुद्ध अवमान याचिका दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे.