शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
2
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
3
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
4
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
5
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
6
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
7
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
8
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
9
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
10
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
11
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
12
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
13
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
15
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
16
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
17
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
18
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
19
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
20
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार

वारीतून मिळते नवसमाज निर्मितीची ऊर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 01:57 IST

संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि अखिल विश्वाची माउली संत ज्ञानेश्वर महाराज या तिन्ही पालख्यांसमवेत असलेल्या दिंड्यांमध्ये मी सहभागी झालेलो आहे. बालपणापासून माझ्या मनावर वारकरी सांप्रदायाचे संस्कार झाल्याने पावले आपोआप विठ्ठल मंदिराकडे वळाली. विठूनामाचा गजर झाला की माझे मन हरकून जाते. वयाच्या १८व्या वर्षांपासून मी वारीत सहभागी होत आहे. गेल्या ५० वर्षांपासून ही वारी सुरू आहे. लोकसंस्कृती, लोकपरंपरा म्हणजे ‘वारी’ होय. आपल्या वैदिक संस्कृतीचा विकास म्हणजे वारकरी सांप्रदाय म्हणता येईल.

डॉ.रामकृष्ण महाराज लहवितकरसंतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि अखिल विश्वाची माउली संत ज्ञानेश्वर महाराज या तिन्ही पालख्यांसमवेत असलेल्या दिंड्यांमध्ये मी सहभागी झालेलो आहे. बालपणापासून माझ्या मनावर वारकरी सांप्रदायाचे संस्कार झाल्याने पावले आपोआप विठ्ठल मंदिराकडे वळाली. विठूनामाचा गजर झाला की माझे मन हरकून जाते. वयाच्या १८व्या वर्षांपासून मी वारीत सहभागी होत आहे. गेल्या ५० वर्षांपासून ही वारी सुरू आहे. लोकसंस्कृती, लोकपरंपरा म्हणजे ‘वारी’ होय. आपल्या वैदिक संस्कृतीचा विकास म्हणजे वारकरी सांप्रदाय म्हणता येईल.‘बैसू जिवे एके ठायी’ असे संत ज्ञानेश्वर माउली म्हणतात. प्रत्येकाची काया, वाचा, मती म्हणजेच शरीर, मन आणि बुद्धी यांची शुद्धी या वारीमुळे घडून येते. सध्याच्या काळात चंगळवाद वाढला आहे. परंतु वारीमध्ये सहभागी झालेला प्रत्येक वारकरी हा भौतिक सुखापासून दूर असतो.त्याला ओढ असते ती अध्यात्माची. त्यामुळे त्याच्या गरजा कमी असतात. प्रतिकूल परिस्थितीतही तो राहू शकतो. ऊन, वारा, पाऊस, थंडी याची पर्वा न करता शेकडो मैल अंतर चालत राहतो. पंढरीच्या वारीत सहभागी झालेला झोपडीतील गरीब माणूस आणि बंगल्यातील श्रीमंतदेखील येथे समान असतो. दोघेही भाजी-भाकरीत समाधान मानतात. सर्व जाती-जमातींचे लोक एकत्र येतात. ‘वर्णाभिमान विसरली सारी, एकमेकां लोटांगणी जाती’ असा हा सोहळा असतो. केवळ महाराष्ट्रातून नव्हे तर आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक या राज्यांतूनदेखील दिंड्या येतात. अनेक सांप्रदायाचे एकत्रिकरण म्हणजे वारकरी संप्रदाय होय.‘उच्च निच नाही कोणी,कर्म धर्म झाला नारायण’असा भाव वारकऱ्यांच्या ठायी मला दिसतो. वारी म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक. आज देशात जाती-जातीमध्ये भांडणे दिसतात. सांप्रदाय धर्मात तणाव दिसतो. परंतु वारीत सर्व जातींचे लोक असतात. श्रीगोंद्याहून शेख महंमदांची पालखी येते.विष्णुमय जग हाच वारकºयांचा धर्म असून पंढरीची वारी हा उपासना मार्ग आहे, असे म्हणता येईल. संध्याकाळात वारीमध्ये मोठ्या प्रमाणात तरुणवर्गदेखील सहभागी झालेला दिसतो. चंगळवादाला दूर सारून नवसमाज निर्मितीची आणि राष्ट्रीय एकात्मतेचीशक्ती आणि ऊर्जा वारीतून मिळते, असे मला वाटते.(लेखक, पुणे विद्यापीठातीलसंत तुकाराम अध्यासनाचे प्रमुख)

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रम