शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
3
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
4
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
5
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
6
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
7
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
9
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
10
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
11
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
12
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
13
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
14
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
15
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
16
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
17
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
18
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
19
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
20
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा

वारीतून मिळते नवसमाज निर्मितीची ऊर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 01:57 IST

संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि अखिल विश्वाची माउली संत ज्ञानेश्वर महाराज या तिन्ही पालख्यांसमवेत असलेल्या दिंड्यांमध्ये मी सहभागी झालेलो आहे. बालपणापासून माझ्या मनावर वारकरी सांप्रदायाचे संस्कार झाल्याने पावले आपोआप विठ्ठल मंदिराकडे वळाली. विठूनामाचा गजर झाला की माझे मन हरकून जाते. वयाच्या १८व्या वर्षांपासून मी वारीत सहभागी होत आहे. गेल्या ५० वर्षांपासून ही वारी सुरू आहे. लोकसंस्कृती, लोकपरंपरा म्हणजे ‘वारी’ होय. आपल्या वैदिक संस्कृतीचा विकास म्हणजे वारकरी सांप्रदाय म्हणता येईल.

डॉ.रामकृष्ण महाराज लहवितकरसंतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि अखिल विश्वाची माउली संत ज्ञानेश्वर महाराज या तिन्ही पालख्यांसमवेत असलेल्या दिंड्यांमध्ये मी सहभागी झालेलो आहे. बालपणापासून माझ्या मनावर वारकरी सांप्रदायाचे संस्कार झाल्याने पावले आपोआप विठ्ठल मंदिराकडे वळाली. विठूनामाचा गजर झाला की माझे मन हरकून जाते. वयाच्या १८व्या वर्षांपासून मी वारीत सहभागी होत आहे. गेल्या ५० वर्षांपासून ही वारी सुरू आहे. लोकसंस्कृती, लोकपरंपरा म्हणजे ‘वारी’ होय. आपल्या वैदिक संस्कृतीचा विकास म्हणजे वारकरी सांप्रदाय म्हणता येईल.‘बैसू जिवे एके ठायी’ असे संत ज्ञानेश्वर माउली म्हणतात. प्रत्येकाची काया, वाचा, मती म्हणजेच शरीर, मन आणि बुद्धी यांची शुद्धी या वारीमुळे घडून येते. सध्याच्या काळात चंगळवाद वाढला आहे. परंतु वारीमध्ये सहभागी झालेला प्रत्येक वारकरी हा भौतिक सुखापासून दूर असतो.त्याला ओढ असते ती अध्यात्माची. त्यामुळे त्याच्या गरजा कमी असतात. प्रतिकूल परिस्थितीतही तो राहू शकतो. ऊन, वारा, पाऊस, थंडी याची पर्वा न करता शेकडो मैल अंतर चालत राहतो. पंढरीच्या वारीत सहभागी झालेला झोपडीतील गरीब माणूस आणि बंगल्यातील श्रीमंतदेखील येथे समान असतो. दोघेही भाजी-भाकरीत समाधान मानतात. सर्व जाती-जमातींचे लोक एकत्र येतात. ‘वर्णाभिमान विसरली सारी, एकमेकां लोटांगणी जाती’ असा हा सोहळा असतो. केवळ महाराष्ट्रातून नव्हे तर आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक या राज्यांतूनदेखील दिंड्या येतात. अनेक सांप्रदायाचे एकत्रिकरण म्हणजे वारकरी संप्रदाय होय.‘उच्च निच नाही कोणी,कर्म धर्म झाला नारायण’असा भाव वारकऱ्यांच्या ठायी मला दिसतो. वारी म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक. आज देशात जाती-जातीमध्ये भांडणे दिसतात. सांप्रदाय धर्मात तणाव दिसतो. परंतु वारीत सर्व जातींचे लोक असतात. श्रीगोंद्याहून शेख महंमदांची पालखी येते.विष्णुमय जग हाच वारकºयांचा धर्म असून पंढरीची वारी हा उपासना मार्ग आहे, असे म्हणता येईल. संध्याकाळात वारीमध्ये मोठ्या प्रमाणात तरुणवर्गदेखील सहभागी झालेला दिसतो. चंगळवादाला दूर सारून नवसमाज निर्मितीची आणि राष्ट्रीय एकात्मतेचीशक्ती आणि ऊर्जा वारीतून मिळते, असे मला वाटते.(लेखक, पुणे विद्यापीठातीलसंत तुकाराम अध्यासनाचे प्रमुख)

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रम