शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

वारीतून मिळते नवसमाज निर्मितीची ऊर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 01:57 IST

संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि अखिल विश्वाची माउली संत ज्ञानेश्वर महाराज या तिन्ही पालख्यांसमवेत असलेल्या दिंड्यांमध्ये मी सहभागी झालेलो आहे. बालपणापासून माझ्या मनावर वारकरी सांप्रदायाचे संस्कार झाल्याने पावले आपोआप विठ्ठल मंदिराकडे वळाली. विठूनामाचा गजर झाला की माझे मन हरकून जाते. वयाच्या १८व्या वर्षांपासून मी वारीत सहभागी होत आहे. गेल्या ५० वर्षांपासून ही वारी सुरू आहे. लोकसंस्कृती, लोकपरंपरा म्हणजे ‘वारी’ होय. आपल्या वैदिक संस्कृतीचा विकास म्हणजे वारकरी सांप्रदाय म्हणता येईल.

डॉ.रामकृष्ण महाराज लहवितकरसंतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि अखिल विश्वाची माउली संत ज्ञानेश्वर महाराज या तिन्ही पालख्यांसमवेत असलेल्या दिंड्यांमध्ये मी सहभागी झालेलो आहे. बालपणापासून माझ्या मनावर वारकरी सांप्रदायाचे संस्कार झाल्याने पावले आपोआप विठ्ठल मंदिराकडे वळाली. विठूनामाचा गजर झाला की माझे मन हरकून जाते. वयाच्या १८व्या वर्षांपासून मी वारीत सहभागी होत आहे. गेल्या ५० वर्षांपासून ही वारी सुरू आहे. लोकसंस्कृती, लोकपरंपरा म्हणजे ‘वारी’ होय. आपल्या वैदिक संस्कृतीचा विकास म्हणजे वारकरी सांप्रदाय म्हणता येईल.‘बैसू जिवे एके ठायी’ असे संत ज्ञानेश्वर माउली म्हणतात. प्रत्येकाची काया, वाचा, मती म्हणजेच शरीर, मन आणि बुद्धी यांची शुद्धी या वारीमुळे घडून येते. सध्याच्या काळात चंगळवाद वाढला आहे. परंतु वारीमध्ये सहभागी झालेला प्रत्येक वारकरी हा भौतिक सुखापासून दूर असतो.त्याला ओढ असते ती अध्यात्माची. त्यामुळे त्याच्या गरजा कमी असतात. प्रतिकूल परिस्थितीतही तो राहू शकतो. ऊन, वारा, पाऊस, थंडी याची पर्वा न करता शेकडो मैल अंतर चालत राहतो. पंढरीच्या वारीत सहभागी झालेला झोपडीतील गरीब माणूस आणि बंगल्यातील श्रीमंतदेखील येथे समान असतो. दोघेही भाजी-भाकरीत समाधान मानतात. सर्व जाती-जमातींचे लोक एकत्र येतात. ‘वर्णाभिमान विसरली सारी, एकमेकां लोटांगणी जाती’ असा हा सोहळा असतो. केवळ महाराष्ट्रातून नव्हे तर आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक या राज्यांतूनदेखील दिंड्या येतात. अनेक सांप्रदायाचे एकत्रिकरण म्हणजे वारकरी संप्रदाय होय.‘उच्च निच नाही कोणी,कर्म धर्म झाला नारायण’असा भाव वारकऱ्यांच्या ठायी मला दिसतो. वारी म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक. आज देशात जाती-जातीमध्ये भांडणे दिसतात. सांप्रदाय धर्मात तणाव दिसतो. परंतु वारीत सर्व जातींचे लोक असतात. श्रीगोंद्याहून शेख महंमदांची पालखी येते.विष्णुमय जग हाच वारकºयांचा धर्म असून पंढरीची वारी हा उपासना मार्ग आहे, असे म्हणता येईल. संध्याकाळात वारीमध्ये मोठ्या प्रमाणात तरुणवर्गदेखील सहभागी झालेला दिसतो. चंगळवादाला दूर सारून नवसमाज निर्मितीची आणि राष्ट्रीय एकात्मतेचीशक्ती आणि ऊर्जा वारीतून मिळते, असे मला वाटते.(लेखक, पुणे विद्यापीठातीलसंत तुकाराम अध्यासनाचे प्रमुख)

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रम