शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वाढीव पाणीकपातीचे संकट टळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2016 00:25 IST

धरणसाठ्यात वाढ : दारणामधून पुन्हा उपसा शक्य

 नाशिक : गेल्या दोन दिवसांपासून शहर व परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे गंगापूर आणि दारणा या धरणांतील पाणीसाठ्यात वाढ झाली असून, त्यामुळे नाशिककरांवरील वाढीव पाणीकपातीचे संकट टळण्याची शक्यता आहे. पावसाने दडी मारल्याने महापालिका प्रशासनाने आणखी पाणीकपातीसंबंधी फेरनियोजन करण्याचे सूतोवाच केले होते. दरम्यान, दारणा धरणात सुमारे ८०० दलघफूने पाणीसाठा वाढल्याने नाशिकरोड विभागासाठी महापालिकेकडून आरक्षित पाण्याचा पुन्हा उपसा केला जाण्याची शक्यता आहे. आर्द्रा नक्षत्राच्या अंतिम चरणात शहर व परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून दडी मारलेल्या पावसाची प्रतीक्षा संपुष्टात आली. शहरात १ जून ते ४ जुलै २०१६ या कालावधीत शहरात १३७ मि.मी. पावसाची नोंद झाली. त्यापैकी, रविवारी झालेल्या पावसाची आकडेवारी ११२ मि.मी. नोंदविली गेली. त्र्यंबकेश्वर व इगतपुरी तालुक्यात झालेल्या पावसाने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर आणि दारणा या धरणांतील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे गंगापूर धरणातील पाणीसाठ्यात २८ दलघफूने वाढ झाली. त्यामुळे गंगापूरमध्ये ९३३ दलघफू पाणीसाठा जाऊन पोहोचला आहे.दारणा धरणात दोन दिवसांपूर्वी ३४० दलघफू पाणीसाठा शिल्लक होता. पावसामुळे त्यात ७६२ दलघफूने वाढ होऊन पाणीसाठा ११०२ दलघफूपर्यंत जाऊन पोहोचला आहे. मागील वर्षी गंगापूर धरणात ४ जुलै रोजी ३३५६ दलघफू म्हणजे ६० टक्के, तर दारणा धरणात ३७६१ दलघफू म्हणजे ५३ टक्के पाणीसाठा शिल्लक होता.