शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
3
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
4
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
5
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
6
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
7
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
8
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
9
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
10
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
11
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
12
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
13
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
14
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
15
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
16
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
17
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
18
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
19
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
20
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?

बिनविरोध निवडणुकीचे प्रयत्न विफल ठरणार?

By admin | Updated: September 23, 2015 23:02 IST

जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्था निवडणूक

नाशिक : जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेची होणारी पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कर्मचारी युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी सुरू केलेले परिश्रम वाया जाण्याची चिन्हे असून या निवडणुकीत दोन पॅनलची निर्मिती होण्याची चिन्हे आहेत.जुन्या चेहऱ्यांनाच वारंवार संधी दिली जात असल्याच्या कारणावरून जिल्हा परिषदेतील नव्यानेच भरती झालेल्या व तरुण कर्मचारी पतसंस्था निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असून त्यादृष्टीने रोजच अनौपचारिक बैठका घेण्यात येत आहेत; मात्र जुन्या व अनुभवी पदाधिकाऱ्यांनी पतसंस्था निवडणूक बिनविरोध करण्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी त्यांनी जिल्हा परिषदेत कार्यरत असलेल्या सर्वच संवर्गाच्या संघटना पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केल्याचे समजते. काही ठरावीक संवर्गातील कर्मचाऱ्यांसाठी संचालक पदाचा ‘कोटा’ ही निश्चित करण्यात आला असून त्यानुसार त्या संवर्गातून संबंधित कर्मचारी संघटनेने कोणत्याही एखाद-दुसऱ्या नावाची शिफारस करण्यास सांगण्यात आले आहे. मुळातच काही संवर्गातील सभासद कर्मचाऱ्यांची संख्या बोटावर मोजण्याइतपत असतानाही त्यांना सरसकट जागांचा कोटा बहाल केल्याने बहुसंख्य सभासद कर्मचारी असलेल्या संवर्गातील इच्छुकांचा त्यामुळे हिरमोड झाल्याची चर्चा आहे. त्यातूनच जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेच्या बिनविरोध निवडणुकीला खो बसल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांमध्ये आहे. गुरुवारी (दि. २४) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असून त्यानंतरच खऱ्या अर्थाने निवडणूक बिनविरोध होते की दुरंगी होते? याबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे. (प्रतिनिधी)