शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
5
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
6
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
7
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
8
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
9
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
10
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
11
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
12
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
13
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
14
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
15
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
16
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
17
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
18
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
19
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
20
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा

अनावश्यक बॅरिकेट्स हटविणार : महाजन

By admin | Updated: August 10, 2015 23:43 IST

दखल : नागरिकांनी केली होती तक्रार

नाशिक : पोलिसांच्या अतिदक्षतेच्या कारभारामुळे साधुग्राम आणि रामकुंड परिसरात मोठ्या प्रमाणात बॅरिकेट्स लावण्यात आले असून, त्याचा सर्वसामान्य नागरिकांना मात्र त्रास होत आहे. हा प्रकार पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनीही साधुग्राममध्ये पोलीस प्रशासनाकडून लावण्यात आलेले अनावश्यक ठिकाणची बॅरिकेट्स काढण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.नाशिकमध्ये कुंभमेळ्यासाठी अद्याप साधू-महंत पूर्ण संख्येने दाखल झालेले नाहीत, किंबहुना साधुग्राममध्ये अद्याप ध्वजारोहण झालेले नाही, तोच पोलिसांनी साधुग्राम आणि रामकुंड परिसरात बॅरिकेट्स टाकण्यात आले असून, अनेक भागात वाहतूक वळविण्यात आली आहे. बॅरेकेडिंगमुळे तर सर्वसामान्य नागरिकांनाही त्रास सहन करावा लागत आहे. विशेषत: रामकुंड पसिरात राहणाऱ्या नागरिकांना आपल्याच घरी जाताना किंवा बाहेर पडताना बंदोबस्तास नियुक्त केलेल्या पोलिसांशी वाद घालावा लागतो. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने स्थानिक नागरिक, व्यावसायिक अशा अनेक घटकांच्या भावनाही मांडल्या आहेत. यासंदर्भात नाशिक दौऱ्यावर असलेले पालकमंत्री गिरीश महाजन यांनी ठिकाणी बॅरिकेट्सची आवश्यकता नाही, रहदारीला अडथळा निर्माण होत असेल साधुग्रामसह अन्य भागातील अनावश्यक बॅरिकेट्स त्वरित हटविण्याबाबत विचार होईल, असे सांगितले. अर्थात, सुरक्षेचा विषयही महत्त्वाचा असून, त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. साधू-महंतांसह भाविकांच्या सुरक्षेसाठीच व्यवस्था असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्याअनुषंगाने पालकमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केली.