शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

...मंत्र्यांना फिरू देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 00:38 IST

जायखेडा : सरकारने त्वरित दुष्काळ जाहीर न केल्यास आणि कांद्याची नुकसानभरपाई न दिल्यास एकाही मंत्र्याला राज्यात फिरू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

ठळक मुद्दे राजू शेट्टी : उत्राणे येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे मेळावा

जायखेडा : सरकारने त्वरित दुष्काळ जाहीर न केल्यास आणि कांद्याची नुकसानभरपाई न दिल्यास एकाही मंत्र्याला राज्यात फिरू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी दिला.बागलाण तालुक्यातील उत्राणे येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद पगार, महिला आघाडी अध्यक्ष रसिका ढगे, उपाध्यक्ष डोंगर पगार, राज्य प्रवक्ते संदीप जगताप, तालुकाध्यक्ष पंढरीनाथ अहिरे, उत्राणेच्या सरपंच सुवर्णा पगार आदी उपस्थित होते.याप्रसंगी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांवर सडकून टीका करीत शेट्टी यांनी राज्य व केंद्र सरकारचा समाचार घेतला. देशातील २०३ संघटना एकत्र येऊन अखिल भारतीय किसान संघर्ष समिती स्थापन करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना कायदेशीर संरक्षण देणारे दोन विधेयक तयार करण्यात आले असून, विशेष अधिवेशन बोलावून त्यांचे कायद्यात रूपांतर करावे या मागणीसाठी २८, २९ व ३० नोव्हेंबरला दिल्ली येथे आंदोलन केले जाणार असल्याचेही शेट्टी यांनी सांगितले. उपस्थित मान्यवरांनी शेतकºयांचे प्रश्न व त्यावरील उपाय योजनांसंदर्भात मार्गदर्शन केले.निफाड, रानवडसाठी पॅकेजची मागणीसायखेडा: निफाड आणि रानवड कारखान्याला स्वतंत्र पॅकेज द्यावे, सभासद आणि कामगारांचे थकीत पैसे सरकारने त्वरीत द्यावेत. तसेच कांद्याला दोन हजार रुपये हमीभाव देण्याची मागणी खासदार राजू शेट्टी यांनी केली. करंजगाव येथे कांदा, ऊस,द्राक्ष परिषद गुरूवारी शेट्टी यांच्या उपस्थितीत झाली.यावेळी व्यासपीठावर प्रदेश अध्यक्ष रवींद्र पोकळे, युवा आघाडीचे प्रदेश अध्यक्ष हंसराज वडघुले, महिला आघाडीच्या अध्यक्ष रसिका ढगे, करंजगावच्या सरपंच सोनाली राजोळे उपस्थित होते.विधान सभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी चालविण्यासाठी घेतलेल्या रानवड साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकरी आणि सभासद, कामगार यांचे कोटी रु पये थकवले आहेत.त्यांना जाब कोण विचारणार? असा प्रश्नही शेट्टी यांनी उपस्थित केला.परिषदेतील ठरावकांद्याच्या निर्यातीबाबत सकारात्मक धोरण अवलंबावे.पणन महामंडळाने द्राक्ष उत्पादक शेतकºयांना दिलासा देण्यासाठी व्यापाºयांवर बंधने घालावीत.जगातील बहुतांशी देशात द्राक्ष निर्यात खुली करावी. द्राक्षावर आधारित पूरक व्यवसाय सुरू करावे.