शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
3
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
4
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
5
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
6
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
7
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
8
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
9
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
10
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
11
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
12
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
14
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
15
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
16
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
17
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
18
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
19
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
20
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'

वि-किरण प्रकल्पातून आंब्याची निर्यात थांबणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 22:41 IST

कोरोनाच्या संकटामुळे येथील डॉ. भाभा अणुसंशोधन केंद्राच्या कृषक वि-किरण प्रकल्पातून कोकणचा राजा हापूस आंबा यावर्षी अमेरिका व आॅस्ट्रेलियाला रवाना होण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून या प्रकल्पात लॉकडाउनमुळे कामकाज बंद आहे.

ठळक मुद्देप्रश्नचिन्ह : कोरोनामुळे लासलगावी केंद्राचे कामकाज ठप्प

लासलगाव : कोरोनाच्या संकटामुळे येथील डॉ. भाभा अणुसंशोधन केंद्राच्या कृषक वि-किरण प्रकल्पातून कोकणचा राजा हापूस आंबा यावर्षी अमेरिका व आॅस्ट्रेलियाला रवाना होण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून या प्रकल्पात लॉकडाउनमुळे कामकाज बंद आहे.मागील वर्षी १० एप्रिलपाासून आंब्याची निर्यात लासलगावमार्गे सुरु झालेली होती. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चवीने अवघ्या जगावर अधिराज्य गाजवणाऱ्या आंब्याची अमेरिका त्यानंतर आॅस्ट्रेलियाला वारी सुरू झाली होती. लासलगाव येथील भाभा अणुसंशोधन केंद्राच्या वि-किरण प्रकल्पात प्रक्रिया करून गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेत आंब्याची निर्यात सुरू आहे. आॅस्ट्रेलियन मार्केटमध्येही त्याची सुरूवात झालेली होती. दरवर्षी साधारणत: एप्रिल ते जुलै या कालावधीत लासलगावच्या या केंद्रात वि-किरण प्रक्रि या केली जाते. गेल्या अनेक वर्षांपासून कृषकच्या माध्यमातून ही प्रक्रि या पार पाडली जात होती. भाभा अणुसंशोधन केंद्राशी केलेला करार संपुष्टात आल्यामुळे हा प्रकल्प मुंबईच्या अ‍ॅग्रो सर्च या कंपनीने भाडेतत्त्वावर घेतला आहे. फळमाशीच्या प्रादुर्भावाचे कारण सांगत युरोपीय महासंघाने भारताच्या हापूस आंब्यावर २०१३ मध्ये बंदी घातली होती. त्यानंतर अमेरिकेला पाठविण्यात येणाºया हापूस आंब्यावर लासलगाव येथे वि-किरण प्रक्रि या केली जाते. लासलगाव येथे ३१ आॅक्टोबर २००२ मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलिबहारी वाजपेयी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या कृषी उत्पादन संशोधन केंद्र येथे हा प्रकल्प कांद्यासाठी तयार करण्यात आला होता. मात्र, येथे आता फक्त आंब्यावर वि-किरण करून तो निर्यात केला जात आहे. अमेरिकेला जाणाºया आंब्यामध्ये हापूस, केशर, दशरा, बेंगणपल्ली, लंगडा या प्रमुख जातींचा समावेश आहे. गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेने ठरवून दिलेल्या मापदंडाचे काटेकोर पालन होत असल्याने भारतीय हापूस आंब्याने लासलगाव मार्गे अमेरिकेला पोहोचला होता. दरवर्षी साधारणत १८ एप्रिल ते २० जून या कालावधीत लासलगावच्या या केंद्रात विकिरण प्रक्रिया केली जाते. यंदा मात्र लॉकडाऊनमुळे कामकाजच बंद असल्याने यंदा हापूस आंबा अमेरिका, आॅस्ट्रेलिया वारी करणार की नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.वि-किरण प्रक्रिया म्हणजे ?लासलगावच्या केंद्रात गॅमा किरणांचा ४०० ते ७०० ग्रे मात्रा वि-किरण मारा करून आंब्याची साठवणूक क्षमता वाढवली जाते. यामुळे आंबा पिकण्याची क्रि या तर लांबतेच, शिवाय कोयीतील कीडही नष्ट होते. आंब्यातील साका (सफेद गाठ) निर्मितीची प्रक्रि याही थांबते. कीड रोखण्यास हा अतिशय चांगला उपाय मानला जातो. उष्णतेचा वापर न करता ही प्रक्रि या होत असल्याने आंब्याचा स्वाद व ताजेपणा टिकून राहण्यास मदत होते.

टॅग्स :MangoआंबाAgriculture Sectorशेती क्षेत्र