शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ रिंगरोडवर पालिक ा ‘दिवे लावणार’?

By admin | Updated: September 29, 2015 22:57 IST

अपघातांना निमंत्रण : दिव्याखाली अंधार कायम

नाशिक : कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून शहराबाहेरून जाणारे रिंगरोड विकसित केले. याअंतर्गत अर्धवट का होईना श्रीश्री रविशंकर दिव्य मार्ग विकसित करण्यात आला. पुणे महामार्गापासून कॅनॉलरोडपर्यंत रस्ता विकसित झाला आहे; मात्र वडाळागावातून इंदिरानगरपर्यंत रस्त्याचे रुंदीकरण अर्धवट स्थितीत पडून आहे. तसेच म्हसोबा महाराज चौफुली ते इंदिरानगरपर्यंत रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य असल्यामुळे पालिका प्रशासनाकडून ‘दिवे लावले’ जातील का, असा प्रश्न संतप्त नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.श्रीश्री रविशंकर दिव्य मार्ग हा औरंगाबाद, पुणे, मुंबई अशा तिन्ही महामार्गांना शहराबाहेरून जोडणारा अतिमहत्त्वाचा रस्ता आहे. त्यामुळे पालिकेने या रस्त्याचे पुणे महामार्गापासून तर वडाळागाव सावित्रीबाई फुले झोपडपट्टीपर्यंत रुंदीकरण केले. येथून पुढे काही मीटरपर्यंत रस्त्याचे रुंदीकरण अतिक्रमणाच्या विळख्यात अडकले आहे. मांगीरबाबा मंदिरापासून पुढे थेट इंदिरानगरपर्यंत रस्त्यावर पथदीप पूर्णपणे लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे हा संपूर्ण रस्ता रात्री अंधारात हरविलेला असतो. अंधारामुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे. कॅनॉलरोडपर्यंत रविशंकर रस्त्यावर पथदीपांचा लखलखाट पहावयास मिळतो, तर तेथून पुढे इंदिरानगरकडे जाणारा मार्ग मात्र वाहनचालकांना ‘शोधावा’ लागत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)बंद पथदीपांमुळे अंधाराचे साम्राज्यरखडलेल्या रस्त्याचे रुंदीकरण-डांबरीकरण अद्याप पालिकेने सुरू केले नसून, कुंभमेळा आटोपूनदेखील या रस्त्याच्या कामाला ‘मुहूर्त’ लागला नसल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. तसेच घरकुल प्रकल्पापासून पुढे शेतमळ्याच्या अडथळ्यामध्ये रस्त्याचे रुंदीकरण खोळंबले आहे. या रस्त्यावर कॅनॉलरोडपासून पुढे पथदीप बंद असल्याने अंधाराचे साम्राज्य कायम आहे.