शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

उत्पादन घटल्याने द्राक्षांना मिळणार यावर्षी उच्चांकी दर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2022 22:16 IST

चांदोरी : निफाड तालुक्यातील ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस व कडाक्याची थंडी या नैसर्गिक संकटांमुळे निर्यात द्राक्षांचे उत्पादन घटले. निर्यात द्राक्षांचे उत्पादन घटल्यामुळे यावर्षी द्राक्षांना उच्चांकी दर मिळण्याची शक्यता असल्याने बागायतदार वर्गामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देनिफाड : कडाक्याची थंडी, ढगाळ वातावरणामुळे नुकसान

चांदोरी : निफाड तालुक्यातील ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस व कडाक्याची थंडी या नैसर्गिक संकटांमुळे निर्यात द्राक्षांचे उत्पादन घटले. निर्यात द्राक्षांचे उत्पादन घटल्यामुळे यावर्षी द्राक्षांना उच्चांकी दर मिळण्याची शक्यता असल्याने बागायतदार वर्गामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.गोदाकाठ भागात मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात द्राक्षबागांची लागवड करण्यात आली. त्यात शेकडो हेक्टरवर द्राक्षाचे उत्पादन घेतले जाते. यातील बहुतांश बागायतदार हे द्राक्ष निर्यात करण्याच्या उद्देशानेच द्राक्षांचे उत्पादन घेत आहेत.साधारण १२० ते १३० दिवसांमध्ये द्राक्षे पूर्ण परिपक्व होतात. यावर्षी उशिरापर्यंत पाऊस चालल्यामुळे ऑक्टोबर महिन्यामध्ये बाग छाटणीला सुरुवात झाली व साधारणत: आता ८० ते ९० दिवसांच्या रेंजमध्ये द्राक्षफळे आली आहेत. या द्राक्षांच्या घडांमधून पाणी उतरण्याची प्रक्रिया सुरू असल्याने पुढील १० ते १५ दिवसांमध्ये द्राक्षे निर्यातयोग्य होऊन द्राक्ष निर्यात सुरू होईल.निफाड तालुक्याच्या पट्ट्यामध्ये प्रतिवर्षी पडणारा पाऊस यावर्षी उशिरा सुरू झाला. तसेच सरासरीपेक्षा तो अधिक झाला. अधिक दिवस ढगाळ वातावरण असल्यामुळे द्राक्षांच्या झाडावर रोगराई आली. तसेच कडाक्याची थंडी व अवकाळी पाऊस यामुळे द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच २३ जानेवारीपासून थंडी वाढत गेल्याने द्राक्षमण्यांना तडे जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने अधिक नुकसान होण्याची चिन्हे आहेत. यामुळे निर्यातक्षम द्राक्षांचे उत्पादन घटल्याने द्राक्षांना उच्चांकी दर मिळण्याची शक्यता आहे.कोरोना असल्याचे कारण पुढे करून अनेक व्यापारी कमी दराने द्राक्षबागांचे बुकिंग करीत आहेत. बागायतदारांनी कमी दरात द्राक्षबागांचे बुकिंग करू नये. तसेच अशा व्यापाऱ्यांपासून द्राक्ष बागायतदारांनी सावध राहण्याची गरज आहे.- कुलदीप गडाख, द्राक्ष उत्पादक, शेतकरी.सध्या द्राक्षे मऊ पडण्याची प्रक्रिया सुरू आहे. द्राक्षांची गोडी, आकार वाढून पुढील ५ ते १० दिवसांमध्ये म्हणजेच जानेवारीच्या शेवटच्या व फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये परिसरातील द्राक्ष निर्यातयोग्य होतील. द्राक्षांना उच्चांकी दर मिळण्याची शक्यता अधिक आहे.- नितीन डोखरे, द्राक्ष उत्पादक, शेतकरी