शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
5
'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
6
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
7
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
8
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
9
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
10
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
11
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
12
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
13
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
14
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
15
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
16
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
17
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
18
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
19
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
20
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी

पुन्हा येईल... झेडपीत सेनेचाच अध्यक्ष!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 01:06 IST

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजप-सेना युती झाल्यामुळे नाशिक जिल्हा परिषदेवर युती निर्विवाद वर्चस्व निर्माण करेल अशी कालपरवापर्यंत असलेली परिस्थिती राज्यातील सत्तांतरानंतर पूर्णपणे बदलून गेली आहे. राज्यात महाराष्टÑ विकास आघाडीचे समीकरण जुळून आल्याने नाशिक जिल्हा परिषदेत पुन्हा सेनेचाच अध्यक्ष असेल, तर कॉँग्रेस किंवा राष्टÑवादीकडे उपाध्यक्षपद जाऊ शकते असे राजकीय चित्र निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देपोटनिवडणुकांकडेही लक्ष : राज्यातील सत्तांतरानंतर बदलले समीकरण

संदीप भालेराव।लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजप-सेना युती झाल्यामुळे नाशिक जिल्हा परिषदेवर युती निर्विवाद वर्चस्व निर्माण करेल अशी कालपरवापर्यंत असलेली परिस्थिती राज्यातील सत्तांतरानंतर पूर्णपणे बदलून गेली आहे. राज्यात महाराष्टÑ विकास आघाडीचे समीकरण जुळून आल्याने नाशिक जिल्हा परिषदेत पुन्हा सेनेचाच अध्यक्ष असेल, तर कॉँग्रेस किंवा राष्टÑवादीकडे उपाध्यक्षपद जाऊ शकते असे राजकीय चित्र निर्माण झाले आहे.राज्याच्या राजकारणात नव्या आघाडीचे समीकरण निर्माण झाले असले तरी आॅक्टोबर २०१७ मध्ये अशाच प्रकारच्या आघाडीतून जिल्हा परिषदेत शिवसेनेने कॉँग्रेस आणि अपक्षांच्या पाठिंब्यावर अध्यक्षपद मिळविले होते. राज्यात युती असताना जिल्हा परिषदेत शिवसेनेचा अध्यक्ष, तर कॉँग्रेसला उपाध्यक्षपद असे राजकीय गणित जुळविण्यात आले होते. तर विषय समित्यांमध्ये राष्टÑवादी आणि भाजपने सभापतिपदे मिळविली होती. येत्या दोन महिन्यांत होऊ घातलेल्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी जुळून येणारे समीकरण लक्षात घेतले आणि जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीचे पूर्णपणे वर्चस्व राहिले तर शिवसनेलाच पुन्हा अध्यक्षपदाचीसंधी मिळण्याची शक्यता अधिक आहे.राज्याच्या राजकारणात तीन भिन्न विचारांचे पक्ष आणि एकमेकांविरुद्ध निवडणूक लढणारे पक्ष सत्ताकारणात एकत्र आल्याने भाजपकडून त्यावर टीका केली जात आहे. तीन चाकांची आघाडी तीन विरुद्ध दिशेने धावेल, अशी टिप्पणीदेखील माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे; मात्र अशाच परस्परविरोधी विचारांची आघाडी यशस्वी होऊ शकते आणि कार्यकाळही पूर्ण करू शकते असे नाशिक जि.प.ने दाखवून दिले आहे. त्यामुळे आगामी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सेना, कॉँग्रेस आणि राष्टÑवादी हे तीनही पक्ष महाराष्टÑ विकास आघाडीचा झेंडा फडकवतील अशी अनुकूल परिस्थिती दिसून येते.७३ सदस्य संख्या असलेल्या जिल्हा परिषदेत शिवसेनेचे-२५, भाजप-१५, राष्टÑवादी-१९ , कॉँग्रेस-८, माकपा-३ आणि अपक्ष-३ असे बलाबल होते. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील राजकीय घडमोडीनंतर सद्यस्थितीत शिवसेनेकडे २४, भाजपकडे १५, राष्टÑवादी-१६, कॉँग्रेस-८, माकपा-३, तर अपक्ष-३ असे बलाबल आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढविल्यामुळे चार सदस्यांनी राजीनामे दिल्याने जिल्हा परिषदेची एकूण सदस्य संख्या ६९ इतकी झाली आहे. उर्वरित जागांसाठी पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू असल्याने यातून कोणत्या पक्षाचे उमेदवार निवडून येतात यावर जिल्हा परिषदेतील राजकीय पक्षांची ताकद काही प्रमाणात ठरणार आहे.राज्यातील समीकरण जिल्ह्यातही जुळून आले तर सध्याच्या संख्याबळानुसार शिवसेनेचे २४, राष्टÑवादी १६, काँग्रेस ८ आणि माकपा ३ असे संख्याबळ होऊन शिवसेनेकडे अध्यक्षपद आणि राष्टÑवादीकडे उपाध्यक्षपद जाऊ शकते. हे समीकरण जुळविण्यासाठी राष्टÑवादीची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याने कदाचित राष्टÑवादीकडूनही अध्यक्षपदासाठी आग्रह धरला जाऊ शकतो.तथापि, शिवसेनेचे संख्याबळ अधिक असल्याने सेनेचा दावा प्रबळ असेल. एकाकी पडलेल्या भाजपकडे १५ सदस्य असल्याने त्यांच्याकडून ३७ हा जादुई आकडा जुळविणे अशक्य आहे. फोडाफोडीच्या राजकारणतही भाजपच्या हाती काही लागेल असे राजकीय वातावरण नसल्याने जि.प.मध्ये महाविकास आघाडीकडे एकहाती सत्ता येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.अनेकांची नावे चर्चेत :जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे खुल्या प्रवर्गासाठी असल्यामुळे इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी आहे. प्रत्येक राजकीय पक्षाकडून यासाठी मोर्चेबांधणी केली जाऊ शकते. विद्यमान अध्यक्ष शीतल सांगळे, बाळासाहेब क्षीरसागर, मंदाकिनी बनकर, संजय बनकर, महेंद्रकुमार काले तसेच नयना गावित, सीमंतिनी कोकाटे, नूतन अहेर, सभापती अर्पणा खोसकर, मनीषा पवार, किरण थोरे यांची नावे चर्चेत असून, त्यांनी रणनीती आखण्यासही सुरुवात केलेली आहे.चारही रिक्त पदे महत्त्वाची :लोकसभा निवडणूक लढविलेले धनराज महाले यांनी शिवसेनेचा राजीनामा देऊन राष्टÑवादीकडून निवडणूक लढविली आहे. राष्ट्रवादीत असलेल्या भारती पवार, हिरामण खोसकर आणि नितीन पवार यांनी पक्ष बदल करून निवडणूक लढविल्याने त्यांनीही राजीनामे दिले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेचे चार पदे सध्या रिक्त आहेत. या पदांच्या निवडणुका येत्या १२ डिसेंबरला होत असल्याने कोणत्या राजकीय पक्षांचे बळ या निवडणुकीनंतर वाढते हे पाहणेदेखील महत्त्वाचे ठरणार आहे.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद