शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

केंद्र सरकार कांदा निर्यात खुली करण्यासाठी तत्परता दाखवेल का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:24 IST

लासलगाव : कांद्याचे दर वाढताच केंद्र सरकारने तत्परता दाखवत निर्यातबंदी लागू केली. आता कांद्याचे दर २ हजार रुपयांच्या ...

लासलगाव : कांद्याचे दर वाढताच केंद्र सरकारने तत्परता दाखवत निर्यातबंदी लागू केली. आता कांद्याचे दर २ हजार रुपयांच्या घरात आलेले असताना केंद्र सरकार कांदा निर्यात खुली करण्यासाठी तत्परता दाखवणार का, असा सवाल मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर यांनी केला आहे. दरम्यान, कांदा निर्यात तातडीने खुली न झाल्यास राज्यभरातील बाजार समित्यांशी संपर्क साधून बाजार समित्या बेमुदत बंद करण्याचा निर्णय घेतला जाईल, असेही होळकर यांनी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व पालकमंत्री भुजबळ यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

कांदा निर्यात तातडीने खुली करावी यासाठी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला जात असूनही याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने शरद पवार, छगन भुजबळ यांनी निर्यात खुली होण्यासाठी केंद्राकडे हस्तक्षेप करावा, असेही निवेदनात म्हटले आहे. दि. १४ सप्टेंबर रोजी कांद्याचे दर ५ हजार रुपयांपर्यंत गेल्याने केंद्र सरकारने अत्यंत तातडीने निर्यातबंदी लागू केली. त्यानंतर कांद्याचे दर वाढू नये म्हणून व्यापारी वर्गावर प्राप्तिकर विभागाची छापेमारी, तसेच साठवणुकीवर मर्यादा व कांद्याचे दर आणखी कमी करण्यासाठी कांदा आयात करण्याचा निर्णय घेतल्याने त्याचा परिणाम सध्या नाशिक जिल्ह्यातील कांद्याच्या बाजारभावावर झाला असून, कांद्याचे दर आता २ हजार रुपयांच्या आसपास आले आहेत.

परतीच्या पावसाने लाल कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असल्याने कांद्याला समाधानकारक दर मिळणे गरजेचे आहे. कांद्याचे घसरलेले दर लक्षात घेता तातडीने कांदा निर्यात खुली करण्याची गरज असून, केंद्राने तातडीने निर्यात खुली करावी यासाठी पवार व भुजबळ या द्वयींनी हस्तक्षेप करण्याची मागणी होळकर यांनी केली आहे.