शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
3
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
4
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
5
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
6
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
7
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
8
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
9
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
10
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
11
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
12
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
13
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
14
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
15
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
16
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
17
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
18
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
19
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
20
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...

येवल्यात युरियासाठी प्रहार करणार, अर्धनग्न ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:15 IST

प्रांताधिकारी कार्यालयात निवासी नायब तहसीलदार नवनाथ दाते यांना निवेदन देण्यात आले. तालुक्यातील शेतकरी गेल्या दीड महिन्यापासून युरियासाठी वणवण फिरत ...

प्रांताधिकारी कार्यालयात निवासी नायब तहसीलदार नवनाथ दाते यांना निवेदन देण्यात आले. तालुक्यातील शेतकरी गेल्या दीड महिन्यापासून युरियासाठी वणवण फिरत असून तालुका कृषी विभागाच्या दुर्लक्षामुळे उत्पादन घटण्याची भीती निर्माण झाली आहे. तालुक्यात मका, सोयाबीन, बाजरी, तूर ही पिके मोठ्या प्रमाणात घेतली जात असून सध्या सर्वच पिके वाढीच्या अवस्थेत असल्याने त्यांना नत्रयुक्त खतांची तातडीची गरज आहे. परंतु, कृषीविभागाच्या ढिसाळ धोरणामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही शेतक-यांची लूट होत असून २६६ रुपयांच्या एक गोणीबरोबर १४०० रुपये किमतीची दुसऱ्या खताची गोणी घेण्याची सक्ती दुकानदारांकडून केली जात असून ही शेतक-यांची दिवसाढवळ्या लूट सर्व शासकीय यंत्रणेच्या साक्षीने होत असल्याचे सदर निवेदनात म्हटले आहे.

कंपनीकडूनच लिंकिंग होत असून पुरेसा साठा मिळत नसल्याने टंचाई निर्माण होत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. कृषी अधिका-यांशी चर्चा केली असता शेतकऱ्यांनी युरिया जास्त न वापरता इतर खते वापरावी, युरिया वापरल्याने जमीन, पाणी दूषित होते, असे उपदेशाचे डोस पाजले जातात. वास्तविक, शेतकऱ्यासारखा उत्कृष्ट संशोधक दुसरा कुणी नसून अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना अक्कल न शिकविता आपणास नेमून दिलेली कामे करावीत, असेही सदर निवेदनात म्हटले आहे.

निवेदनावर प्रहारचे तालुकाध्यक्ष हरिभाऊ महाजन, वसंत झांबरे, किरण चरमळ, रामभाऊ नाईकवाडे, सुनील पाचपुते, जगदीश गायकवाड, पांडुरंग शेलार, भाऊसाहेब पाचपुते आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.