पाटोदा : चार वर्षांपासून निसर्गाच्या अवकृपेने येवला तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे ठाणगाव परिसरातील वन विभागाच्या जंगलातील सर्वच जलस्रोत कोरडेठाक पडल्याने या जंगलातील पशुपक्षी तहानेने व्याकूळ होत असून, त्यांनी पाण्यासाठी मानवी वस्त्यांकडे आपला मोर्चा वळविला आहे. या पशू-पक्ष्यांची होणारी गैरसोय पाहून पाटोदा येथील तरुणाई सरसावली आहे.येथील विलास शांताराम पगारे, अहमद शेख, समाधान पगारे, ग्रामपंचायत सदस्य दिलीप बोराडे, योगेश ठाकरे या तरुणांनी या मुक्या प्राण्यांसाठी माणुसकीचा झरा वाहता केला आहे. याकामी त्यांना दत्तात्रय जगताप उत्तम पाचपुते, अशोक बोनाटे, बिंदू पंडित यांनी सहकार्य केले. याबाबत लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित झाले होते. त्यात या पशू- पक्ष्यांसाठी पाण्याची सोय करावी, असे आवाहन करण्यात आले होते.एक-दीड महिन्यपिंासून उष्णतेत वाढ झाली असून, सूर्य आग ओकत आहे. कडक उन्हामुळे अंगाची लाही लाही होत असतानाच ग्रामीण भागातील गाव, वाड्य-वस्त्यांवर निर्माण झालेल्या भीषण पाणीटंचाईमुळे सर्वसामान्य माणसाची झोप उडाली आहे. अशा गंभीर परिस्थितीत जंगलात कुठेच पिण्याचे पाणी उपलब्ध होत नसल्याने पशुपक्षी, वन्यप्राणी गावाकडे धाव घेत आहेत. जंगल परिसरातच या पशुपक्ष्यांची पाण्याची सोय होऊन त्यांची तहान भागावी, या उद्देशानेच या तरु णांनी पुढाकार घेतला आहे. या जोपर्यंत पाऊस पडत नाही व या पशुपक्ष्यांची पाण्याची सोय होत नाही तोपर्यंत आम्ही या जंगलातील प्राण्यांसाठी पाणीपुरवठा करणार असल्याचे या तरु णांनी सांगितले. याप्रसंगी मारु ती नेहरे, रवींद्र शेळके उत्तम पाचपुते, दत्तात्रय जगताप,बिंदू पंडित, अशोक बोनाटे, योगेश ठाकरे, सत्यजित घुसळे आदि उपस्थित होते
वन्य पशुपक्ष्यांसाठी सरसावली पाटोद्यातील तरु णाई
By admin | Updated: May 8, 2016 00:51 IST