शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याच्या शोधासाठी वन्यप्राणी गावकुसाकडे

By admin | Updated: April 4, 2016 23:50 IST

उन्हाचा तडाखा : पाणीटंचाईचा परिणाम; डोंगरही पडले उघडे

 सिन्नर : वाढत्या उन्हामुळे जंगलातील जलस्रोत, पाणवठे कोरडे पडल्याने पाणी व भक्ष्यांच्या शोधासाठी अनेक जंगली श्वापदे गावांच्या शिवारात येऊ लागले आहेत. त्यामुळे गावकुसाला आता डरकाळ्या ऐकू येऊ लागल्या आहेत. सिन्नर तालुक्याच्या पश्चिम व नैऋत्य भागातील चास-भोजापूर खोरे व सह्याद्रीच्या पर्वतरांगामधील ठाणगाव तसेच गोदातीरीचा नायगाव परिसर बिबट्यांचे प्रभावक्षेत्र आहे. उन्हाच्या झळा वाढल्याने डोंगरही उघडे बोडके झाले आहेत. डोंगरांच्या पायथ्याशी असलेले जलस्रोत आटल्याने दिवसा विश्रांतीसाठी बिबटे व अन्य वन्यप्राणी डोंगर-कपारीचा आधार घेतात व रात्रीच्या वेळी गाव परिसरात भक्ष्याच्या शोधात फिरतात, असा त्यांचा दिनक्रम असतो. तथापि, अंगाची लाही लाही करणारे तप्त उन्ह व जलसाठ्यांमध्ये पिण्यासाठी पाणी नसल्याने वन्यजिवांचीही घालमेल होत आहे. बिबटे, तरस, लांडगे आदि हिंस्र प्राणी पाणी व अन्नाच्या शोधासाठी गावकुसाकडे वळले असल्याचे चित्र आहे. पश्चिम भागातील ठाणगावजवळील उंबरदरी, पांढुर्ली परिसरातील बोरखिंड, कोनांबे, चासजवळील भोजापूर व सरदवाडी या धरणांमध्ये उशिराच्या पावसामुळे पाणी आले असल्याने शेतकऱ्यांना जसा दिलासा मिळाला तसाच वन्यप्राण्यांनाही मिळाला आहे. या जलस्रोतांमुळे याच भागात बिबट्यांचा नेहमी वावर असतो. त्यामुळे रात्रीच्या वेळी पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी येणारे हिंस्रप्राणी गावपरिसरातील वाड्या-वस्त्यांवरील शेळ्या, वासरे यांचा फडशा पाडतात व सकाळ उजाडण्यापूर्वी पुन्हा डोंगरांच्या कडेकपारीत विश्रांतीसाठी धूम ठोकत असल्याचे चित्र आहे. पश्चिम पट्ट्यात रात्रीच्या सुमारास आजही बिबट्यांच्या डरकाळ्या ऐकू येत असल्याचे ग्रामस्थ व शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. (वार्ताहर)