शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

अन्न पाण्याच्या शोधार्थ वन्यप्राणी गावकुसाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 17:47 IST

खामखेडा : चालू वर्षी अल्पशा पावसामुळे डोंगरातील जलाशय पावसाअभावी भरले नसल्याने व दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत असल्याने या वाढत्या उन्हामुळे जंगलातील जलस्रोत कोरडे पडल्याने वास्तव्यास असलेले बिबटे, तरस, लांडगे, वानर आदी हिंस्र प्राणी डोंगर पायथ्याशी असलेल्या मळ्यामधील शिवारात येऊ लागले आहेत.

ठळक मुद्देआता तरी वनविभागाकडून या वन्यप्राण्यांसाठी डोंगरात पाण्यासाठी वनतळे किंवा पुरातन शिवकालीन बुटीच्या विहिरीची दुरुस्ती करण्यात येऊन त्या विहिरीतील पडलेला गाळ काढल्यास यामुळे वन्यप्राण्यांची पाण्याची व्यवस्था होण्यास मदत होणार आहे.

खामखेडा : चालू वर्षी अल्पशा पावसामुळे डोंगरातील जलाशय पावसाअभावी भरले नसल्याने व दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत असल्याने या वाढत्या उन्हामुळे जंगलातील जलस्रोत कोरडे पडल्याने वास्तव्यास असलेले बिबटे, तरस, लांडगे, वानर आदी हिंस्र प्राणी डोंगर पायथ्याशी असलेल्या मळ्यामधील शिवारात येऊ लागले आहेत.खामखेडा गावच्या उत्तरेकडील भागामध्ये सावकी शिवार ते कळवण तालुक्यातील मोकभणगीपर्यंत डोंगरांच्या पर्वत रांगा आहेत. या डोंगरांच्या पर्वतरागांमध्ये तिळवण किल्ला आहे. त्या किल्ल्याजवळ खामखेडा गावाचे बुटीचे रान आहे. या रानात बुटीची विहीर राजेशाही काळात पाण्यासाठी प्रसिद्ध होती. या विहिरीला गेल्या सात-आठ वर्षांपर्यंत भरपूर पाणी होते. या विहिरीत खाली उतरण्यासाठी पायऱ्या होत्या, त्यामुळे जंगली प्राणी पाणी पिण्यासाठी विहिरीत उतरून पाणी पित असे; परंतु या विहिरीचे कठडे पडल्यामुळे विहीर दगड मातीने भरल्यामुळे डोंगरात पाणी नाही. तसेच या पर्वत रांगांमध्ये बिबट्यासह अन्य जंगली प्राण्यांचे प्रभावक्षेत्र आहे. या उन्हाच्या तडाख्यामुळे डोंगर-दऱ्यांमधील पाण्याचे जलस्रोत आटल्याने डोंगरामध्ये पाणी नसल्याने वन्यप्राणी पाण्याच्या शोधार्थ डोंगर पायथ्याजवळील मळ्यातील वस्तीवर रात्रीच्या वेळेस येत असल्याचे चित्र दिसून येत आहे. वनविभागाने या वन्यप्राण्यांसाठी डोंगरामध्ये कोणत्याही प्रकारचे वनतळे तयार केली नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळेस हे वन्यप्राणी अंधारात परिसरात भक्ष्याच्या व पाण्याच्या शोधार्थ फिरतात व सकाळी उजाडण्यापूर्वी पुन्हा डोंगराच्या कडेकपारीत विश्रांती साठी निघून जातात.मागबारी घाटातून सतरा नंबरचा राज्य महामार्ग असल्याने या घाट परिसरात बºयाच दिवसांपासून बिबट्यांचे वास्तव्य असल्याने या घाटातून रात्रीच्या वेळेस प्रवास करणाºया वाहनधारकांना या बिबट्याचे दर्शन होते. या घाटातून वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. गेल्या दोन वर्षांपूर्वी मांगबारी घाटात रात्रीच्या वेळेस अन्न पाण्याच्या शोधात फिरत असलेल्या बिबट्याच्या मादीला रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने बिबट्याच्या मादीच्या कानाजवळ मार लागून जागीच ठार झाली होती. त्यामुळे वन्य प्राणिमित्रांकडून हळहळ व्यक्त करण्यात आली होती. या बुटीच्या विहिरीला उन्हाळ्यात पाणी असते. या विहिरीत खाली उतरण्यासाठी पायºयांची सोय असल्याने जनावरे खालपर्यंत जाऊन पाणी पिऊन आपली तहान भागवित असे; परंतु या बुटीच्या विहिरीचे कठडे ढासळल्याने विहीर दगड-मातीने भरली आहे. तेव्हा वनविभागाने वन्यप्राण्यांसाठी जंगलात वनतळे व बुटीच्या विहिरींची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे .(२५अ‍ॅनिमल मंकी)