शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

अन्न पाण्याच्या शोधार्थ वन्यप्राणी गावकुसाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 17:47 IST

खामखेडा : चालू वर्षी अल्पशा पावसामुळे डोंगरातील जलाशय पावसाअभावी भरले नसल्याने व दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत असल्याने या वाढत्या उन्हामुळे जंगलातील जलस्रोत कोरडे पडल्याने वास्तव्यास असलेले बिबटे, तरस, लांडगे, वानर आदी हिंस्र प्राणी डोंगर पायथ्याशी असलेल्या मळ्यामधील शिवारात येऊ लागले आहेत.

ठळक मुद्देआता तरी वनविभागाकडून या वन्यप्राण्यांसाठी डोंगरात पाण्यासाठी वनतळे किंवा पुरातन शिवकालीन बुटीच्या विहिरीची दुरुस्ती करण्यात येऊन त्या विहिरीतील पडलेला गाळ काढल्यास यामुळे वन्यप्राण्यांची पाण्याची व्यवस्था होण्यास मदत होणार आहे.

खामखेडा : चालू वर्षी अल्पशा पावसामुळे डोंगरातील जलाशय पावसाअभावी भरले नसल्याने व दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत असल्याने या वाढत्या उन्हामुळे जंगलातील जलस्रोत कोरडे पडल्याने वास्तव्यास असलेले बिबटे, तरस, लांडगे, वानर आदी हिंस्र प्राणी डोंगर पायथ्याशी असलेल्या मळ्यामधील शिवारात येऊ लागले आहेत.खामखेडा गावच्या उत्तरेकडील भागामध्ये सावकी शिवार ते कळवण तालुक्यातील मोकभणगीपर्यंत डोंगरांच्या पर्वत रांगा आहेत. या डोंगरांच्या पर्वतरागांमध्ये तिळवण किल्ला आहे. त्या किल्ल्याजवळ खामखेडा गावाचे बुटीचे रान आहे. या रानात बुटीची विहीर राजेशाही काळात पाण्यासाठी प्रसिद्ध होती. या विहिरीला गेल्या सात-आठ वर्षांपर्यंत भरपूर पाणी होते. या विहिरीत खाली उतरण्यासाठी पायऱ्या होत्या, त्यामुळे जंगली प्राणी पाणी पिण्यासाठी विहिरीत उतरून पाणी पित असे; परंतु या विहिरीचे कठडे पडल्यामुळे विहीर दगड मातीने भरल्यामुळे डोंगरात पाणी नाही. तसेच या पर्वत रांगांमध्ये बिबट्यासह अन्य जंगली प्राण्यांचे प्रभावक्षेत्र आहे. या उन्हाच्या तडाख्यामुळे डोंगर-दऱ्यांमधील पाण्याचे जलस्रोत आटल्याने डोंगरामध्ये पाणी नसल्याने वन्यप्राणी पाण्याच्या शोधार्थ डोंगर पायथ्याजवळील मळ्यातील वस्तीवर रात्रीच्या वेळेस येत असल्याचे चित्र दिसून येत आहे. वनविभागाने या वन्यप्राण्यांसाठी डोंगरामध्ये कोणत्याही प्रकारचे वनतळे तयार केली नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळेस हे वन्यप्राणी अंधारात परिसरात भक्ष्याच्या व पाण्याच्या शोधार्थ फिरतात व सकाळी उजाडण्यापूर्वी पुन्हा डोंगराच्या कडेकपारीत विश्रांती साठी निघून जातात.मागबारी घाटातून सतरा नंबरचा राज्य महामार्ग असल्याने या घाट परिसरात बºयाच दिवसांपासून बिबट्यांचे वास्तव्य असल्याने या घाटातून रात्रीच्या वेळेस प्रवास करणाºया वाहनधारकांना या बिबट्याचे दर्शन होते. या घाटातून वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. गेल्या दोन वर्षांपूर्वी मांगबारी घाटात रात्रीच्या वेळेस अन्न पाण्याच्या शोधात फिरत असलेल्या बिबट्याच्या मादीला रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने बिबट्याच्या मादीच्या कानाजवळ मार लागून जागीच ठार झाली होती. त्यामुळे वन्य प्राणिमित्रांकडून हळहळ व्यक्त करण्यात आली होती. या बुटीच्या विहिरीला उन्हाळ्यात पाणी असते. या विहिरीत खाली उतरण्यासाठी पायºयांची सोय असल्याने जनावरे खालपर्यंत जाऊन पाणी पिऊन आपली तहान भागवित असे; परंतु या बुटीच्या विहिरीचे कठडे ढासळल्याने विहीर दगड-मातीने भरली आहे. तेव्हा वनविभागाने वन्यप्राण्यांसाठी जंगलात वनतळे व बुटीच्या विहिरींची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे .(२५अ‍ॅनिमल मंकी)