शहरं
Join us  
Trending Stories
1
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
2
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
3
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
4
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
5
आजचे राशीभविष्य- २ जुलै २०२५: 'या' राशीतील लोकांनी अवैध कृत्यांपासून दूर राहा, वाणीवर संयम ठेवा
6
मुलींचे लैंगिक शोषण; नराधमांना सोडणार नाही; बीड कोचिंग क्लास प्रकरणात एसआयटी
7
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", फातिमा सना शेखसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती
9
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
10
‘खरे सुख श्रमाच्या पोटीच जन्म घेते; विसरू नका!’
11
शालार्थ आयडी, ३ महिन्यांत होणार एसआयटी चौकशी, शिक्षणमंत्री दादा भुसेंची माहिती
12
कोण खरे बोलते आहे? आणि कोणाचे दावे झूठ आहेत?
13
विधिमंडळाची ही आचारसंहिता; पण आमदार तसे वागतात का?
14
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
15
बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या
16
वसई-विरारमध्ये १६ ठिकाणी ईडीची धाड; अनधिकृत इमारती प्रकरणी आर्किटेक्ट, अभियंते रडारवर
17
मराठी सक्तीचीच, पण हिंदीचाही अभिमान, मराठी माणसाला मुंबईतून कोणी घालविले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
18
डेटिंगवरून वाद विकोपाला, मुलीने जीव गमावला; सीसीटीव्ही, साक्षीदारांमुळे तपासाला दिशा
19
टायर-ट्यूबमधून जीवघेणा प्रवास, जव्हार तालुक्यातील प्रकार : पूल तर नाहीच, पण होडीसुद्धा उपलब्ध नाही
20
जहाजाच्या पुढील प्रवासाला ना हरकत देण्यासाठी लाचखोरी ; पोर्ट विभागाच्या ३ कॅप्टनसह दोघे सीबीआयच्या जाळ्यात

मविप्र संस्थेच्या कारभाराची चौकशीची वेळ का यावी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:10 IST

नाशिक : ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ असे ब्रीद घेऊन बहुजन समाजाला शिक्षणाचे कवाडे खुले करणाऱ्या मराठा विद्याप्रसारक समाज शिक्षण ...

नाशिक : ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ असे ब्रीद घेऊन बहुजन समाजाला शिक्षणाचे कवाडे खुले करणाऱ्या मराठा विद्याप्रसारक समाज शिक्षण संस्थेच्या सभासदांनी राज्यात ज्या पक्षाची सत्ता ज्याच्याकडे त्याच्याकडेच नेहमीच मराठा विद्याप्रसारक शिक्षण संस्थेच्या सभासदांनी संस्थेची सूत्रे सोपविल्याचा आजवरचा इतिहास राहिला आहे. अपवाद संस्थेच्या गेल्या निवडणुकीचा मानला तरी, मराठा विद्याप्रसारक संस्थेचे बहुतांशी सभासद व समस्त मराठा समाजाने आजवर शरद पवार यांनाच आपला नेता मानल्यामुळे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संस्थेच्या आजवरच्या जडणघडणीत पवार यांचे योगदान निश्चितच राहिले आहे. मात्र दोन वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभा व पाठोपाठच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या काळात संस्थेच्या धुरिणांनी घेतलेली भूमिका बहुधा पवार यांच्या पचनी पडली नाही. त्यातूनच लोकसभा निवडणुकीत समीर भुजबळ यांच्या पराभवाची मिमांसा करताना राष्ट्रवादीने काढलेल्या निष्कर्षातून ही बाब प्रखरपणे उघड झाली व त्यातूनच संस्थेकडे विद्यमान सत्ताधाऱ्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलल्याचे ठळकपणे समोर येऊ लागले आहे, तसे नसते तर संस्थेच्याच व्यासपीठावर येऊन छगन भुजबळ यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढ्यात संस्थेच्या धुरिणांना चार खडे बोल सुनावण्याची संधी तरी कशी मिळू शकली असती?

मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या विद्यमान संचालक मंडळाचा कार्यभार संपुष्टात येण्यासाठी अवघा वर्षभराचा जेमतेम कार्यकाळ शिल्लक राहिला आहे. त्यामुळे साहजिकच या निवडणुकीची तयारी आत्तापासून करणे विद्यमान पदाधिकाऱ्यांना क्रमप्राप्त असल्यामुळे दोन दिवसांपूर्वी राजश्री शाहू महाराज पॉलिटेक्निक कॉलेजची नवीन इमारतीचे उद्घाटन, आर्किटेक्चर महाविद्यालयाला शरद पवार यांचे नामकरण व मविप्र संस्थेच्या भारती शैक्षणिक वारसा संग्रहालयाचे उद्घाटन असे पाव डझन कार्यक्रम उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत घेण्यात आले. साहजिकच अशा कार्यक्रमांमध्ये संस्थेच्या आजवरच्या प्रगतीचा व त्या अनुषंगाने समाज धुरिणांनी दिलेल्या योगदानाविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते, तशी ती या कार्यक्रमातही झाली. संस्थेला आगामी काळातही मदतीची भूमिका घेण्याची ग्वाही अजित पवार यांनी दिली इथपर्यंत सारे ठीक असले तरी, तत्पूर्वी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी संस्थेला उद्देशून केलेले मार्गदर्शन पाहता, संस्थेच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारेच राहिले आहे. संस्थेची गेल्या सहा-सात वर्षांतील वाटचाल एका जातीयवादी विचार प्रणालीच्या पक्षाकडे होत असल्याचे सांगून भुजबळ यांनी, सत्ता व पदे येत राहतात, परंतु बहुजन समाज एकसंघ ठेवायचा असेल तर संस्थेने सत्यशोधक विचारापासून फारकत घेऊ नये, असे खडे बोल सुनावले. भुजबळ यांच्या बोलण्यातून अनेक अर्थ आता निघू लागले आहेत, गेल्या दोन लोकसभा निवडणुकीपासून व त्यातल्या त्यात सहा वर्षांपूर्वी सत्तेवर आलेल्या फडणवीस सरकारच्या काळापासून संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा काहीसा कल बदलला व उपरोक्त कथन केल्याप्रमाणे जिकडे सत्ता तिकडे पळण्याचा खटाटोप केला गेला. कधी तो उघडपणे स्पष्ट दिसू लागला तर कधी तो गोपनीयही राहिला. गेल्या विधानसभा निवडणुकीत तर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी उघड उघड भाजपाच्या उमेदवाराच्या प्रचाराची धुराच अंगा-खांद्यावर घेतल्याची उघड झालेली चर्चादेखील लपून राहिलेली नाही. परंतु पुन्हा सत्तेवर येता येता जसे फडणवीस राहून गेले व संस्था धुरिणांचे मनसुबेही त्या प्रमाणात उधळले गेले. त्यामुळे पुन्हा सत्ता जिकडे तिकडे धावण्याची वेळ आली. त्यातूनच आर्किटेक्चर महाविद्यालयाला शरद पवार यांचे नाव देण्याचा प्रयत्न केला गेला. मुळात आठ वर्षांपूर्वी कार्यकारी मंडळाच्या बैठकीत या नामांतराचा ठराव केला गेला असताना त्यासाठी संस्थेला इतका कालावधी का लागावा? संस्थेच्या प्रगतीत मानाचा तुरा खोवणारा हा सोहळा कोरोना कालावधी लोटल्यानंतर समाजाच्या सर्व सभासदांच्या उपस्थितीतही पार पाडता आला असता, परंतु मोजक्याच व्यक्तींच्या उपस्थितीत सोहळा घेऊन संस्थेने काय साध्य केले? छगन भुजबळ यांनी नेमक्या या विषयाला हात घालून संस्था बहुजन हितापासून दूर जात असल्याचे एकीकडे सांगतानाच संस्थेच्या विद्यमान कारभाऱ्यांनी कोणत्याही चौकशी संस्थांना न घाबरता विचारापासून फारकत घेऊ नये असे सुतोवाच केल्याने संस्थेने असे कोणते कृत्य केले, ज्याची चौकशी करण्याची वेळ येऊन ठेपली?