शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

पॅसेंजर रेेल्वे अद्यापही लॉक का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:20 IST

नाशिकरोड : कोरोनामुळे रेल्वे प्रशासनाने फक्त एक्स्प्रेस व लांब पल्ल्याच्या रेल्वे या स्पेशल रेल्वे म्हणून सुरू केल्या असून, कन्फर्म ...

नाशिकरोड : कोरोनामुळे रेल्वे प्रशासनाने फक्त एक्स्प्रेस व लांब पल्ल्याच्या रेल्वे या स्पेशल रेल्वे म्हणून सुरू केल्या असून, कन्फर्म आरक्षण तिकिटाशिवाय प्रवास करता येत नाही. रेल्वे प्रशासनाने सर्वसाधारण तिकीट असलेल्या पॅसेजर दर्जाच्या रेल्वे अद्याप लॉक करून ठेवल्याने सर्वसामान्य प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.

दीड वर्षापूर्वी कोरोना संसर्गाची भारतात लागण सुरू झाल्यानंतर प्रारंभीचे चार महिने सर्व प्रवासी रेल्वेगाड्या बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यानंतर परराज्यातील प्रवाशांना आपापल्या गावी जाण्यासाठी काही प्रमाणात रेल्वे सुरू करण्यात आल्या. गेल्या वर्षभरात रेल्वे प्रशासनाने हळूहळू करत सर्वच एक्स्प्रेस व लांब पल्ल्याच्या रेल्वे सुरू केल्या आहेत. पूर्वीचे रेल्वे क्रमांक बदलून त्याच रेल्वेना नवीन क्रमांक देऊन स्पेशल रेल्वे म्हणून चालविल्या जात आहेत. रेल्वेमध्ये प्रवास करताना कन्फर्म आरक्षण तिकीट असल्याशिवाय प्रवास करता येत नाही.

कोरोना संसर्ग सुरू झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने सर्वसाधारण तिकीट बंद करून टाकले आहे. त्यामुळे पॅसेजर दर्जाच्या सर्व रेल्वे गेल्या दीड वर्षापासून बंद आहे. नाशिक जिल्ह्यातील प्रवाशांसाठी महत्त्वाची असलेली मनमाड - इगतपुरी शटल तसेच देवळाली - भुसावळ शटल, मुंबई - भुसावळ पॅसेंजर या तीनही पॅसेंजर दर्जाच्या रेल्वे बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्हांतर्गत व नाशिक, मुंबई जिल्ह्यातून भुसावळ, जळगाव मार्गावर जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. सर्वसाधारण तिकिटाच्या पॅसेंजर रेल्वे बंद असल्याने प्रवाशांना लांब पल्ल्याच्या रेल्वेने आरक्षण कन्फर्म तिकीट काढून जावे लागत आहे. त्यामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. कोरोना संसर्गातून सर्वत्र परिस्थिती बऱ्यापैकी आटोक्यात आली असतानासुद्धा रेल्वे प्रशासन पॅसेंजर गाड्यांना गर्दी होते म्हणून पॅसेंजर दर्जाच्या गाड्या सुरू करत नाही. मात्र दुसरीकडे लांब पल्ल्याच्या रेल्वेला कन्फर्म आरक्षण तिकीट देऊन संपूर्ण बोगी भरून प्रवासी प्रवास करत आहेत. तेव्हा कोरोनाच्या नियमापैकी एकमेकांत सुरक्षित अंतर ठेवणे गरजेचे असताना लांब पल्ल्याच्या रेल्वेमध्ये तो नियम सर्रासपणे पायदळी तुडवला जात आहे. फक्त पॅसेंजर रेल्वेला गर्दी होते म्हणून पॅसेंजर बंद ठेवण्यात आल्या आहेत. यामुळे गोरगरीब व सर्वसामान्य प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.

बंद असलेल्या पॅसेंजर रेल्वे

नाशिकरोड रेल्वेस्थानक व नाशिक जिल्हामार्गे धावणाऱ्या मनमाड-इगतपुरी शटल, देवळाली-भुसावळ शटल व भुसावळ-मुंबई पॅसेंजर बंद आहेत.