शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

... तर गोवंश हत्येचा गुन्हा का दाखल करू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 01:00 IST

नांदगाव येथील चारा छावण्यांमध्ये चाऱ्याअभावी ५० ते ५५ गुरे दगावली असून, त्यामध्ये ४० ते ४५ गायींचाच समावेश होता. या गायी वाचविण्यात प्रशासनाला अपयश आल्याने मुख्यमंत्र्यांवर गोवंश हत्येचा गुन्हा का दाखल करू नये, असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

ठळक मुद्देराजू शेट्टी यांचा सवाल : जिल्हा बॅँकेच्या वसुलीवरही नाराजी

नाशिक : नांदगाव येथील चारा छावण्यांमध्ये चाऱ्याअभावी ५० ते ५५ गुरे दगावली असून, त्यामध्ये ४० ते ४५ गायींचाच समावेश होता. या गायी वाचविण्यात प्रशासनाला अपयश आल्याने मुख्यमंत्र्यांवर गोवंश हत्येचा गुन्हा का दाखल करू नये, असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.जिल्ह्णातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात शेट्टी यांनी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांची भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत राज्य शासनावर गंभीर आरोप केले. नांदगाव येथे सुरू करण्यात आलेल्या चारा छावणीत १६०० जनावरे आहेत, मात्र त्यातील जवळपास अनेक गुरे दगावली आहेत. त्यामध्ये गायींची संख्या मोठी आहे. गोवंश वाचविण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून प्रयत्न केले जात असताना चारा छावण्यांमध्ये अशाप्रकारे जर गायी मृत्युमुखी पडत असतील तर याला जबाबदार कोण? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.गुरे वाचविण्यासाठी चारा छावण्या आहेत मात्र त्यातच चाºयाअभावी गायी-गुरे मृत्युमुखी पडत असतील तर त्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांवर असून, त्यांच्यावरच गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी आपण करणार असल्याचेही शेट्टी यांनी यावेळी सांगितले. राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्हा बॅँकांनी शेतकºयांकडून सक्तीची वसुली करू नये, असे मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनानंतर जिल्हाधिकाºयांनीदेखील सक्तवसुली करण्यास मनाई केली होती, असे असतानाही नाशिक जिल्हा मध्यवर्ती बॅँकेकडून सक्तीच्या वसुलीसाठी नोटिसा बजावत असतील तर मुख्यमंत्र्यांचे कुणी ऐकत नाही का? असा सवाल त्यांनी केला.जिल्ह्णात द्राक्ष उत्पादक शेतकºयांची कोट्यवधींची फसवणूक झालेली आहे. असे असतानाही याकडे सरकारने लक्ष दिलेले नाही. या संदर्भात आपण पोलीस अधीक्षकांशीदेखील चर्चा केल्याचे ते म्हणाले.ऊस उत्पादक पट्टातील कारखान्यांनी शेतकºयांनी एकही पैसा दिलेला नाही. त्यांचा आरआरसी (रिव्हन्यू रिकव्हरी सर्टिफिकेट)करून शेतकºयांना पैसा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली. या पत्रकार परिषदेप्रसंगी हंसराज वडघुले पाटील, संदीप जगताप, नानासाहेब बच्छाव, सुधाकर मोगल, नितीन रोटे पाटील, रतन मटाले, निवृत्ती गारे, भाऊसाहेब तासकर, अण्णा निकम, साहेबराव काका मोरे आदी उपस्थित होते.जनआंदोलनाचा इशाराकांदा उत्पादकांसाठी १० टक्के निर्यात आणि प्रोत्साहन भत्ता राज्य शासनाने जाहीर केले होते. त्याची मुदत ही ३० जून इतकी होती. अद्याप ही मुदत संपण्यास विलंब असताना राज्य शासनाने या योजनेचे अनुदानच बंद करून टाकले. त्यामळे जिल्ह्णात २०० ते अडीचे भावाने कांदाचे बाजार पडले. अशाप्रकारे सरकार वागणार असेल तर प्रसंगी जनआंदोलन छडावे लागेल, असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला.

टॅग्स :NashikनाशिकRaju Shettyराजू शेट्टीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस