शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

... तर गोवंश हत्येचा गुन्हा का दाखल करू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 01:00 IST

नांदगाव येथील चारा छावण्यांमध्ये चाऱ्याअभावी ५० ते ५५ गुरे दगावली असून, त्यामध्ये ४० ते ४५ गायींचाच समावेश होता. या गायी वाचविण्यात प्रशासनाला अपयश आल्याने मुख्यमंत्र्यांवर गोवंश हत्येचा गुन्हा का दाखल करू नये, असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

ठळक मुद्देराजू शेट्टी यांचा सवाल : जिल्हा बॅँकेच्या वसुलीवरही नाराजी

नाशिक : नांदगाव येथील चारा छावण्यांमध्ये चाऱ्याअभावी ५० ते ५५ गुरे दगावली असून, त्यामध्ये ४० ते ४५ गायींचाच समावेश होता. या गायी वाचविण्यात प्रशासनाला अपयश आल्याने मुख्यमंत्र्यांवर गोवंश हत्येचा गुन्हा का दाखल करू नये, असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.जिल्ह्णातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात शेट्टी यांनी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांची भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत राज्य शासनावर गंभीर आरोप केले. नांदगाव येथे सुरू करण्यात आलेल्या चारा छावणीत १६०० जनावरे आहेत, मात्र त्यातील जवळपास अनेक गुरे दगावली आहेत. त्यामध्ये गायींची संख्या मोठी आहे. गोवंश वाचविण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून प्रयत्न केले जात असताना चारा छावण्यांमध्ये अशाप्रकारे जर गायी मृत्युमुखी पडत असतील तर याला जबाबदार कोण? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.गुरे वाचविण्यासाठी चारा छावण्या आहेत मात्र त्यातच चाºयाअभावी गायी-गुरे मृत्युमुखी पडत असतील तर त्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांवर असून, त्यांच्यावरच गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी आपण करणार असल्याचेही शेट्टी यांनी यावेळी सांगितले. राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्हा बॅँकांनी शेतकºयांकडून सक्तीची वसुली करू नये, असे मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनानंतर जिल्हाधिकाºयांनीदेखील सक्तवसुली करण्यास मनाई केली होती, असे असतानाही नाशिक जिल्हा मध्यवर्ती बॅँकेकडून सक्तीच्या वसुलीसाठी नोटिसा बजावत असतील तर मुख्यमंत्र्यांचे कुणी ऐकत नाही का? असा सवाल त्यांनी केला.जिल्ह्णात द्राक्ष उत्पादक शेतकºयांची कोट्यवधींची फसवणूक झालेली आहे. असे असतानाही याकडे सरकारने लक्ष दिलेले नाही. या संदर्भात आपण पोलीस अधीक्षकांशीदेखील चर्चा केल्याचे ते म्हणाले.ऊस उत्पादक पट्टातील कारखान्यांनी शेतकºयांनी एकही पैसा दिलेला नाही. त्यांचा आरआरसी (रिव्हन्यू रिकव्हरी सर्टिफिकेट)करून शेतकºयांना पैसा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली. या पत्रकार परिषदेप्रसंगी हंसराज वडघुले पाटील, संदीप जगताप, नानासाहेब बच्छाव, सुधाकर मोगल, नितीन रोटे पाटील, रतन मटाले, निवृत्ती गारे, भाऊसाहेब तासकर, अण्णा निकम, साहेबराव काका मोरे आदी उपस्थित होते.जनआंदोलनाचा इशाराकांदा उत्पादकांसाठी १० टक्के निर्यात आणि प्रोत्साहन भत्ता राज्य शासनाने जाहीर केले होते. त्याची मुदत ही ३० जून इतकी होती. अद्याप ही मुदत संपण्यास विलंब असताना राज्य शासनाने या योजनेचे अनुदानच बंद करून टाकले. त्यामळे जिल्ह्णात २०० ते अडीचे भावाने कांदाचे बाजार पडले. अशाप्रकारे सरकार वागणार असेल तर प्रसंगी जनआंदोलन छडावे लागेल, असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला.

टॅग्स :NashikनाशिकRaju Shettyराजू शेट्टीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस