शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

हेमंत अप्पांना रेल्वे इंजिनचे वावडे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:12 IST

आपल्या राजकारणाला गतीच ज्या रेल्वेच्या इंजिनमुळे मिळाली, त्या रेल्वेच्या विस्तारित होणाऱ्या मार्गासाठी हेमंत अप्पांनी अचानक विरोधाचा सूर का आळवावा ...

आपल्या राजकारणाला गतीच ज्या रेल्वेच्या इंजिनमुळे मिळाली, त्या रेल्वेच्या विस्तारित होणाऱ्या मार्गासाठी हेमंत अप्पांनी अचानक विरोधाचा सूर का आळवावा असा प्रश्न अजूनही रेल्वे इंजिन या निवडणूक चिन्हावर विश्वास ठेवून असलेल्यांना जसा पडला तसाच तो अप्पांच्या स्वकियांनाही पडला असेल. वर्षानुवर्षे भिजत पडलेला नाशिक-पुणे रेल्वेचा प्रश्न आजवरच्या सत्ताधाऱ्यांनी कधीच सोडविला नाही, त्यामुळे अप्पा आपल्या कारकिर्दीच्या सात वर्षात ‘एकच ध्यास नाशिकचा विकास’ असा धोशा लावत नाशिक-पुणे रेल्वे मार्गाच्या मंजुरीसाठी प्रयत्नशील होते. अप्पांच्या पूर्वसुरींनी त्यापूर्वीच या मार्गासाठी देखील आपली खासदारकी पणाला लावली होती. त्यामुळे सामूहिक पाठपुराव्याचे फळ म्हणून अखेर केंद्र व राज्य सरकारलाही नाशिक-पुणे मार्गाला मंजुरी द्यावी लागली व सद्यस्थितीत रेल्वेच्या मार्गीकेसाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेला गती देण्याचे आदेश अलीकडेच पालकमंत्री भुजबळ यांनी प्रशासकीय यंत्रणेला दिले. त्यामुळे अप्पांच्या कारकिर्दीतील पहिलाच एकमेव प्रकल्प दृष्टिपथात येण्याचा योग घडून येत असताना प्रत्यक्षात मात्र अप्पांनीच आता इंजिनासह रेल्वेलाही अप्रत्यक्ष विरोध करण्याची भूमिका का घ्यावी याचे कोडे अजूनही अनेकांना उलगडलेले नाही. रेल्वेचा मार्ग बागायती जमिनीतून जात असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होणार म्हणून रेल्वेचा मार्ग बदलावा किंवा बागायती जमिनीचे संपादन करू नये अशा सार्वत्रिक मागण्यांच्या बाजूने अप्पा आता उभे राहिले आहेत. मुळात रेल्वे आणायची म्हणजे त्यासाठी रूळ टाकावे लागतील व रुळ टाकायला कुठली तरी जमीन लागेलच हे अभियांत्रिकीचे विद्यार्थी राहिलेल्या अप्पांना कळू नये यावर कोणाचा विश्वास कसा बसू शकतो? शिवाय स्वत: रेल्वेमार्गासाठी पाठपुरावा करायचा व मंजुरीनंतर त्याला विरोध करण्याचा नतद्रष्टपणा अप्पा कसे करू शकतात? नाही ना, मग विरोधात जाऊन शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहण्याच्या कारणामागे राजकारण तर नसावे? अप्पांना दोन्ही निवडणुकीत रेल्वेच्या इंजिनाने विरोध केला तर अप्पांची लढाई दोन्ही वेळेस भुजबळ कुटुंबीयांशीच झाली. त्यामुळे नाशिक-पुणे रेल्वे मार्ग राजकीय प्रगतीला अडथळा ठरू शकतो? अशी अंधश्रद्ध भावना तर अप्पांच्या मनात येत नसावी? असो. मात्र रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाची पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक बोलवावी आणि खासदार असलेल्या अप्पांना साधे निमंत्रणही प्रशासनाने देऊ नये म्हणून तर नव्हे अप्पा नाराज झाले नसावेत?

-----

अभामफुसपचे अनाकलनीय मौन !

अभामफुसप म्हणजे काही बाराखडी नव्हे. नुसता ओबीसी आरक्षणाचा मुद्दा उपस्थितीत झाला रे झाला तर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने त्यावर आपले मत व्यक्त केले नाही असे आजवर कधीच झाले नाही. ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर एरव्ही नुसते गावच नव्हे तर थेट दिल्लीच्या तख्ताला धडक देण्याचे बळ राखून असलेल्या समता परिषदेने आजवर देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातील ओबीसी समाजाला एका झेंड्याखाली आणण्याचे काम केले. त्यातून बऱ्यापैकी जागृतीही झाली आणि ओबीसींना न्याय मिळाल्याचा दावाही केला गेला. परंतु सर्वाेच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण सरसकट रद्द करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर या समाजावर झालेल्या राजकीय अन्यायाच्या विरोधात समता परिषदेने बाळगलेले मौन अनाकलनीय आहे. एरव्ही सात महिन्यांपूर्वी ओबीसी आरक्षण व जनगणनेच्या प्रश्नावर राज्यभर आंदोलन करून जनजागरण केले गेले. मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा पुढे रेटण्यात आल्यानंतर ओबीसी समाजाची जनगणनेची मागणी समता परिषदेच्या वतीने करण्यात आली. हा सारा इतिहास ताजा असताना आता थेट ओबीसी समाजाचे राजकीय भवितव्यच धोक्यात आलेले असताना समता परिषदेने मौन बाळगणे खुद्द समता सैनिकांच्याही पचनी कसे पडेल हा देखील प्रश्न आहे.

-(श्याम बागुल)