शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
5
'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
6
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
7
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
8
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
9
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
10
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
11
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
12
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
13
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
14
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
15
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
16
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
17
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
18
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
19
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
20
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी

महाजन, रावल यांच्यात भांडणे लावण्याचा उद्योग कुणाचा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 00:24 IST

भाजप व शिवसेनेमध्ये कलगीतुरा रंगणे स्वाभाविक असले तरी भाजपमध्ये अंतर्गत गटबाजीचे चित्र दिसू लागले आहे.

ठळक मुद्देमहापालिकेतील सत्ता या बळावर भाजप ही निवडणूक पुन्हा जिंकण्यासाठी प्रयत्न करेल.नाशिककरांनी त्या आवाहनाला प्रतिसाद दिला. जळगाव महापालिकेत बहुमत असूनही भाजपचे नगरसेवक शिवसेनेला जाऊन मिळाले आणि सेनेचा महापौर झाला.

मिलिंद कुलकर्णीनाशिक महापालिकेची निवडणूक पुढील वर्षी होणार आहे. तीन आमदार आणि महापालिकेतील सत्ता या बळावर भाजप ही निवडणूक पुन्हा जिंकण्यासाठी प्रयत्न करेल. महापालिकेच्या माध्यमातून सुरू असलेली विकासकामे लवकर पूर्ण करणे आणि नव्या कामांचा शुभारंभ करण्याचे मोठे आव्हान महापौर सतीश कुलकर्णी यांच्यासह भाजपच्या लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांपुढे आहे. राज्य सरकार सहकार्य करीत नाही, अशी कैफियत महापौरांनी मांडली आहे. महापौरांनी त्यासाठी काय प्रयत्न केले, हे जाहीर सांगावे, असे आव्हान शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी दिले आहे. भाजप व शिवसेनेमध्ये कलगीतुरा रंगणे स्वाभाविक असले तरी भाजपमध्ये अंतर्गत गटबाजीचे चित्र दिसू लागले आहे. गिरीश महाजन हे पालकमंत्री असल्याने त्यांनी महापालिका व विधानसभा निवडणूक एकहाती लढवली. सर्वपक्षीयांना भाजपमध्ये प्रवेश देऊन महापालिकेत सत्ता आणली. केंद्र, राज्य व महापालिकेत एकाच पक्षाची सत्ता आली तर शहराचा विकास होईल, असे आवाहन त्यावेळी भाजपने केले होते. नाशिककरांनी त्या आवाहनाला प्रतिसाद दिला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक दत्तक घेतले. मेट्रो प्रकल्प, स्मार्ट सिटी प्रकल्प मंजूर झाले; मात्र या कामांचा वेग आणि गुणवत्ता याविषयी आता तक्रारी येऊ लागल्या आहेत. महापौर किंवा भाजपचे पदाधिकारी याविषयी ठोस भूमिका घेताना दिसत नाहीत. दुसरीकडे पक्षांतर्गत भाकरी फिरवली गेली. गिरीश महाजन यांच्याबरोबरच नाशिकची जबाबदारी माजी मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे सोपविण्यात आली. महाजन आणि रावल असे दोन गट तयार झाल्याचे चित्र रंगविण्यात येऊ लागले. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या भेटीसाठी दोन शिष्टमंडळे गेल्याने या गटबाजीला पुष्टी मिळाल्याचे सांगितले जात आहे. मुळात या वादात तथ्य आहे काय? हे बघायला हवे. महाजन आणि रावल हे दोघे खान्देशातील नेते आहेत. दोघेही फडणवीस यांच्या विश्वासातील सहकारी आहेत. महाजन यांनी जळगाव पाठोपाठ धुळ्याची महापालिकादेखील ताब्यात घेतली, त्यावेळी रावल त्यांच्यासोबत होते.भाजपमधील विसंवादमहाजन यांच्यापुढे आव्हाने उभी राहिली आहेत, हे खरे आहे. संकटमोचक अशी प्रतिमा असलेल्या महाजन यांच्या गृह जिल्ह्यात दीड वर्षात स्वत: त्यांच्यावर व पक्षावर मोठी संकटे आली. पक्षातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडला आणि त्यांचा सर्वाधिक राग हा फडणवीस व महाजन यांच्यावर असल्याचे वेळोवेळी दिसून आले. जळगाव महापालिकेत बहुमत असूनही भाजपचे नगरसेवक शिवसेनेला जाऊन मिळाले आणि सेनेचा महापौर झाला. बीएचआर पतसंस्थेतील गैरव्यवहार प्रकरणात महाजन यांच्या काही निकटवर्तीयांविरुद्ध गुन्हे दाखल झाले. सध्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे दोन वर्षे जळगावचे पालकमंत्री होते, त्यांना महाजन यांची बलस्थाने व कमकुवत दुवे माहीत आहेत. नाशिकमध्ये भाकरी फिरविण्यात पाटील यांची भूमिका असू शकते. महाजन आक्रमक आहेत, तर रावल हे शांत व संयमी आहेत. नाशिकमधील स्थिती पाहता रावल यांच्यासारख्या नेत्याची आवश्यकता पक्षश्रेष्ठींना वाटली असावी. पण म्हणून पक्षात दोन गट तयार झाले, असे म्हणणे धाडसाचे ठरेल. महापालिकेत सत्ता आणत असताना सर्व पक्षातील मातब्बरांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. राज्यातील सत्ता गेल्याने भाजपच्या ताब्यातील महापालिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशा स्थितीत पाच वर्षांपूर्वी भाजपमध्ये आलेले नगरसेवक राज्याचे राजकीय चित्र बदलताच घरवापसी वा नवा घरोबा करणार नाही, असे कसे म्हणता येईल. त्यामुळे सत्ता मिळविण्यासोबत हे नगरसेवक टिकवून ठेवण्याचे भाजपपुढे आव्हान आहे. महाजन व रावल हे एकदिलाने हे आव्हान पेलतात काय, हे नजीकच्या काळात कळेल.

शिवसेनेचा धोरणीपणाभाजपने पाच वर्षांपूर्वी केले, तेच आता शिवसेना करीत आहे. राज्यात पक्षप्रमुख हेच मुख्यमंत्री आहेत. नगरविकास, उद्योग, पर्यटन अशी महत्त्वाची खाती सेनेकडे आहे. नाशिक शहराचा ठोस विकास आराखडा घेऊन मंत्र्यांकडे जाऊन मंजुरी आणायची, असा प्रयत्न महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर आणि महापालिकेतील नेते अजय बोरस्ते, विलास शिंदे यांचा सुरु आहे. निवडणुकीपूर्वी हे झाले, तर सेना नव्या जोमाने व दमाने मतदारांपुढे जाऊ शकेल.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाElectionनिवडणूक