शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
3
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
4
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
5
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
6
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
7
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
8
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
9
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
10
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
11
Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!
12
जळगाव: 13 वर्षाच्या तेजसचा कुणी चिरला गळा, का केला खून? 'त्या' दोघांनी काय सांगितले?
13
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
14
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
15
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
16
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?
17
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
18
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण: मिडकॅप, स्मॉलकॅपला मोठा फटका; 'या' क्षेत्रात मात्र तेजी!
19
मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत अन् झाली फरार, आता सपना देवी कुठे?
20
जुलै २०२५ वर खिळून आहेत इतिहास, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या नजरा; पण का?

कोणाला होईल कोणाचा फायदा व तोटा हे तर औत्सुक्याचे ठरावेच, पण अपक्ष उमेदवारीची जोखीम त्यापेक्षा अधिक कोकाटे ‘अटळ’ राहिल्याने नाशकात आता खरी चुरस...

By किरण अग्रवाल | Updated: April 14, 2019 01:36 IST

कोणत्याही परिस्थितीत लढायचेच या तयारीने कामास लागलेल्या माणिकराव कोकाटे यांनी आपली अपक्ष उमेदवारी कायम ठेवल्याने ते भुजबळांना लाभदायी ठरतात की गोडसे यांना, याची चर्चा होणे स्वाभाविक आहे. परंतु तशी ती करताना आतापर्यंत विविध राजकीय घरोबे बदलून पुन्हा अपक्ष लढण्याची त्यांनी पत्करलेली जोखीम दुर्लक्षता येऊ नये.

ठळक मुद्देप्रामुख्याने तिरंगी लढती होऊ घातल्या आहेत.अपक्ष लढणे सोपे नसते हेच स्पष्ट विधानसभेच्या वेळी काय समीकरणे घडून येतील हे आज सांगता येऊ नये.

सारांशमतविभाजनासाठी नव्हे, तर जिंकण्यासाठीच आपली उमेदवारी असल्याची गर्जना करीत माणिकराव कोकाटे यांनी आपली उमेदवारी अखेर कायम राखल्याने नाशिकच्या लढतीतील चुरस वाढून जाणे स्वाभाविक ठरले आहे. युती व आघाडी या दोघांच्या उमेदवारांना आपापल्या गणितांची फेरमांडणी करून बघणे त्यामुळेच गरजेचे बनले आहे.नाशिक व दिंडोरी या दोन्ही लोकसभा मतदारसंघांतील निवडणुकीचे चित्र अर्ज माघारीनंतर स्पष्ट झाले आहे. नाशकात १८, तर दिंडोरीत आठ उमेदवार रिंगणात असले तरी या दोन्ही ठिकाणी प्रामुख्याने तिरंगी लढती होऊ घातल्या आहेत. यात दिंडोरीमध्ये धनराज महाले, डॉ. भारती पवार व जे. पी. गावित हे तिघे पक्षीय उमेदवार आहेत, तर नाशकात हेमंत गोडसे व समीर भुजबळ या दोघा प्रमुख पक्षियात कोकाटे या अपक्ष उमेदवाराने रंग भरून दिले आहेत. जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकांचा पूर्वेतिहास पाहता पूर्वीच्या मालेगाव व नंतरच्या दिंडोरी आणि नाशिक या तीनही मतदारसंघांत आतापर्यंत तब्बल ११५ अपक्ष लढले असले तरी एकालाही विजय मिळविता आलेला नाही. कॉँग्रेस पक्षातर्फे निवडणूक लढवून १९८० मध्ये विजयी झालेले डॉ. प्रतापराव वाघ तद्नंतरच्या ८४च्या निवडणुकीत अपक्ष लढले असता अवघ्या २.१३ टक्के मतांचे धनी ठरले होते. यावरून अपक्ष लढणे सोपे नसते हेच स्पष्ट व्हावे. पण तरी कोकाटे यांच्यासारखी राजकारणातील अनुभवी व्यक्ती अपक्ष लढण्याचे धाडस दाखविते तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करता येत नाही.महत्त्वाचे म्हणजे, नाशकात तसे एकूण तब्बल दहा अपक्ष रिंगणात असले तरी कोकाटे यांची राजकीय मातब्बरी पाहता ते प्रारंभापासूनच चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले आहेत. शिवाय चर्चेला अधिक हवा देताना कोकाटे यांनी घेतलेल्या जाहीरसभेत त्यांच्यामुळे होणाऱ्या मतविभागणीच्या मुद्द्याला खोडून काढताना जी राजकीय फटकेबाजी केली त्यामुळे ते अधिक दखलपात्र ठरून गेले. मतविभागणीसाठी भुजबळांनी आपल्याला उभे केले असल्याचे बोलले जात असले तरी ते खरे नाही, उलट भुजबळांनी ‘मातोश्री’शी संधान बांधून मुद्दाम सोयीचा उमेदवार म्हणून गोडसे यांना शिवसेनेची उमेदवारी द्यायला लावली असे कोकाटे यांनी सांगितले. त्यामुळे मतदारांच्या संभ्रमात भरच पडून गेली आहे, पण कोकाटे हे जर गोडसे यांना भुजबळ यांच्या सोयीचे समजत असतील तर मग गैरसोयीचा कोण, असा प्रश्न आपसूकच उपस्थित व्हावा.निवडणुकीच्या राजकारणात जात फॅक्टर आणणे योग्य नसले तरी तो अलीकडे महत्त्वाचा मुद्दा ठरू लागला आहे. त्याअनुषंगाने ढोबळपणे विचार करता गोडसे व कोकाटे यांच्यात सजातीय मतांचे विभाजन होण्याचा कयास आहे. गेल्यावेळी गोडसे तशी कोरी पाटी घेऊन रिंगणात होते तरी मोदी लाटेमुळे छगन भुजबळ यांना मोठ्या मताधिक्याने पराभूत करून ते जाएंट किलर ठरले होते. यंदा गेल्या पंचवार्षिक काळातील प्रगतीपुस्तक त्यांच्या हाती आहे. त्यामुळे मोदी लाट ओसरल्याचा काही प्रमाणात परिणाम होणार असला तरी, गोडसे यांनी करून दाखविलेल्या कामांमुळे त्यांच्या मतांचे गणित सरासरीत राहण्याचे अंदाज अगदीच नाकारता येऊ नयेत. अशात भुजबळांसाठी गोडसे यांच्याऐवजी कोकाटे यांचीच उमेदवारी सोयीची ठरणे शक्य म्हणता यावे. भुजबळांची गैरसोय होणारच असेल तर ती वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने कदाचित होऊ शकेल. परंतु, ते गाठू शकणारी मतसंख्या निर्णयाचे पारडे फिरवू शकेल का हा पुन्हा प्रश्नच आहे.दुसरे म्हणजे, कोकाटे यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत सिन्नरमध्ये भाजपाकडून उमेदवारी करून पराभव पत्करला आहे. कॉँग्रेस, शिवसेना व भाजपा असे सारे प्रमुख पक्ष फिरून आता पुन्हा बंडखोरी करून ते लोकसभा निवडणूक लढवीत आहेत व तीदेखील अपक्ष. तेव्हा ते भुजबळांना लाभदायी ठरतील की गोडसेंना? या चर्चेपेक्षाही त्यांनी स्वत: पत्करलेली जोखीम महत्त्वाची म्हणायला हवी. अर्थात, राजकीय पक्षही आता केवळ सक्षमतेच्या निकषावर उमेदवाºया वाटप करीत असल्याने पुन्हा पुढच्या विधानसभेच्या वेळी काय समीकरणे घडून येतील हे आज सांगता येऊ नये. परंतु आज लोकसभेसाठी मागे न हटता आपली उमेदवारी कायम राखून कोकाटे यांनी अधिकृत पक्षीय उमेदवारांना त्यांच्या गणितांची फेरमांडणी करण्यास भाग पाडले आहे, हे मात्र नक्की !

टॅग्स :Politicsराजकारण