शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

कौन सच्चा और कौन झूठा...!

By admin | Updated: December 18, 2015 00:12 IST

महासभेला पडले कोडे : पाणीप्रश्नी प्रशासनावर ताशेरे

नाशिक : शहरात पाणीकपात असावी की नसावी, यावरून भाजपाविरुद्ध महापालिकेतील अन्य सारे पक्ष यांच्यातील वाद विकोपाला गेला असतानाच गुरुवारी झालेल्या महापालिकेच्या महासभेत प्रशासनाने १८० दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक असल्याने पाण्याच्या फेरनियोजनाची निकड दर्शविली आणि भाजपासह अवघ्या सभागृहाला ‘कौन सच्चा और कौन झूठा’ असा प्रश्न पडला. अखेर प्रशासनाचे म्हणणे रेकॉर्डवर नोंदवून महासभेने सदर वस्तुस्थिती सरकारला कळविण्याचा निर्णय घेऊन पाणीप्रश्नी राजकारण करणाऱ्यांना ‘तोंडघशी’ पाडल्याचा आनंद घेतला. गंगापूर धरणातील उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेऊन मागील महासभेत महापौरांनी दोन महिन्यांसाठी आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र, या निर्णयाला भाजपाने विरोध दर्शवित त्यात शासनाला हस्तक्षेप करणे भाग पाडले. त्यानुसार, पालकमंत्री गिरीश महाजन यांनी महापालिका आयुक्तांना पत्र पाठवत एक दिवस पाणी बंद ठेवण्याचा निर्णय रद्दबातल ठरविण्याचे आदेशित केले. त्यामुळे प्रशासनाची कोंडी होऊन कुणाचे ऐकावे अशी स्थिती बनली. प्रशासनानेही पालकमंत्र्यांच्या पत्राला प्राधान्य देत महासभेच्या निर्णयाला बगल दिली आणि एकवेळ पाणीपुरवठाच कायम ठेवला. मात्र, महापौर महासभेत घेतलेल्या निर्णयावर ठाम राहिले आणि पालकमंत्र्यांनीच नाशिकला येऊन पाण्याचे नियोजन करून द्यावे, असे आव्हान दिले. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी पाणीपुरवठा विभागाने अचानक पत्रक प्रसिद्ध करून पाणीकपात १५ वरून ३० टक्क्यांवर नेण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी आयुक्तांच्या बैठकीचाही हवाला दिला. महासभेला आणि पदाधिकाऱ्यांना डावलून प्रशासनाने पाणीकपातीचा निर्णय घेतल्याने लोकप्रतिनिधींचे पित्त खवळले आणि महापौरांनी लगोलग सर्व गटनेत्यांना पाचारण करत आयुक्तांसह पाणीपुरवठा विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांना जाब विचारला. यावेळी आयुक्तांनी सदर निर्णयाची माहिती नसल्याचे सांगत सर्वसंमतीनेच निर्णय घेण्याची सारवासारव केली. याच वाढीव पाणीकपातीच्या निर्णयाचे पडसाद गुरुवारी झालेल्या महासभेत उमटले. सदस्यांनी विषयपत्रिकेवरील प्रस्तावांना विनाचर्चा मंजुरी देत पाणीप्रश्नी प्रशासनाला घेरले. यावेळी वस्तुस्थिती नेमकी जनतेसमोर मांडण्याची आग्रही भूमिका घेतली गेली आणि प्रशासनाकडून १८० दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा असल्याचे आणि उर्वरित ४७ दिवसांसाठी पाणीनियोजन करणे भाग असल्याचे स्पष्ट केल्यानंतर सभागृहापुढे ‘कौन सच्चा और कौन झूठा’ असा प्रश्न निर्माण झाला. पालकमंत्री खरे की महापालिका प्रशासन, असा सवाल करत सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले आणि सरकार व सभागृहाची दिशाभूल करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही हल्ला चढविला. त्याचबरोबर, महासभेचाच निर्णय कसा योग्य होता आणि पालकमंत्र्यांना चुकीची माहिती देऊन दिशाभूल करणाऱ्यांनी शहराला कसे वेठीस धरले, याची चर्चाही यावेळी भाजपाचे नाव न घेता सदस्यांनी केली. भाजपाला तोंडघशी पाडल्याचा आनंदही सभागृहातील सदस्यांनी यानिमित्ताने लुटला. (प्रतिनिधी)