शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
2
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
3
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
4
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
5
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
6
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
7
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
8
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
9
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
10
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
11
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
12
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
13
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
14
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
15
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
16
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
17
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
18
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
19
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
20
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका

द्राक्षाच्या पंढरीत खासदारांच्या मानापमानाला जबाबदार कोण ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:12 IST

श्याम बागुल नाशिक : द्राक्ष उत्पादकांचे लोकसभा मतदारसंघनिहाय वर्गीकरण करायचे ठरले तर मोठी गंमतच आहे. नाशिक तालुक्याचा काही भाग ...

श्याम बागुल

नाशिक : द्राक्ष उत्पादकांचे लोकसभा मतदारसंघनिहाय वर्गीकरण करायचे ठरले तर मोठी गंमतच आहे. नाशिक तालुक्याचा काही भाग वगळता सिन्नर, इगतपुरी, त्र्यंबकेश्वरला तसेही तुरळक द्राक्षांचे उत्पादन घेतले जाते. दिंडोरी मतदार संघाचा विचार करायचा झाल्यास दिंडोरी, निफाड, चांदवड हे तालुके द्राक्ष उत्पादनात आघाडीवर तर बागलाण तालुक्यातील विशिष्ट भागात अर्ली द्राक्ष घेतले जाते. तेवढाच काय तो मालेगाव लोकसभा मतदार संघाचा द्राक्षाशी संबंध. हे सारे सांगण्याचा उद्देश इतकाच की, जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्र सरकारच्यावतीने द्राक्ष क्लस्टर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला व या क्लस्टरची माहिती देण्यासाठी कृषी अधिकाऱ्यांनी बोलविलेल्या बैठकीत फक्त नाशिक लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत गोडसे यांनाच पाचारण करून भाजपाच्या दोन्ही खासदारांना बैठकीपासून डावलण्याचा प्रमाद अधिकाऱ्यांनी केल्याचा वहीम खासदार भारती पवार यांनी व्यक्त केला आहे. केंद्र सरकारच्या योजनेची माहिती देण्यापासून चक्क खासदारांनाच वंचित ठेवण्याचा ‘उद्योग’ खरोखरच अधिकाऱ्यांनी केला की त्यांना भाग पाडण्यात आले याचा तूर्त उलगडा होऊ शकला नसला तरी, या निमित्ताने गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यातील विकासकामांचे श्रेय घेण्याची सेना-भाजपात जी काही चढाओढ लागली आहे ती लपून राहिलेली नाही.

तसे पाहिले तर केंद्रातील भाजपाच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच एनडीए सरकारमधून शिवसेनेने कधीच फारकत घेतली आहे. त्यातून अधून-मधून दोन्ही पक्षांमध्ये खटके उडण्याच्या घटनाही घडल्या आहेत. राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर बदललेल्या राजकीय समीकरणानंतर यात अधिक वाढ झाली असून, एकमेकांवर कुरघोडी करण्याची कोणतीही संधी दोन्ही पक्षांनी कधीच सोडलेली नाही. अशा परिस्थितीत शासकीय बैठकीला खासदारांना डावलण्याच्या घटनेचे भाजपाने भांडवल करू नये? असे कसे घडू शकते? केंद्र सरकारची योजना व राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांकरवी ती राबविली जाणार असल्याने साहजिकच खासदारांना पाचारण करतांना आमदारांनाही त्याची माहिती दिली जाणे अपेक्षित धरण्यात आले आहे. परंतु फक्त शिवसेनेच्या खासदारांना व त्यांच्या निकटच्या मर्यादित शेतकऱ्यांनाच या योजनेची माहिती देण्याचा अधिकाऱ्यांचा हेतू स्पष्ट होऊ शकलेला नाही. शिवाय केंद्रातील सत्ताधारी पक्षाचा खासदार उघड उघड अधिकाऱ्यांच्या वर्तनाविषयी नाराजी व निषेध व्यक्त करीत असताना अधिकाऱ्यांनी त्याबाबत साधी दिलगिरी वा माफी मागण्याची तसदी घेतलेली नाही. त्यामुळे या बैठकीमागे खासदार गोडसे यांचीच फूस असण्याची व्यक्त होणारी गुप्त शंका नाकारता येणार नाही. तसे नसते तर आपल्याच बरोबरीच्या लोकप्रतिनिधींना अधिकाऱ्यांकडून मिळत असलेल्या दुय्यम वागणुकीबाबत गोडसे यांनी साधा खेद देखील व्यक्त केलेला नाही. राहिला प्रश्न अधिकाऱ्यांचा तर लोकप्रतिनिधींची वेळ घेतल्याशिवाय कोणतीही बैठक कोणताही अधिकारी आयोजित करू शकत नाही हे आजवरचे सत्य आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे गोडसे यांची बैठकीसाठी वेळ घेतली गेली असेल त्याच वेळी बैठकीतील विषय व निमंत्रितांची नावे याबाबत त्यांना अवगत केले गेले असेल. शिवाय द्राक्ष उत्पादक कोणत्या भागात अधिक आहेत, त्यांचे प्रतिनिधीत्व कोण करते याविषयी अधिकारी अवगत असावेत असे सामान्य जनतेची जेथे भाबडी आशा असेल तेथे एक खासदार असलेल्या लोकप्रतिनिधीने हा प्रश्न प्रतिष्ठेचा का करू नये? असो. भारती पवार यांनी व्यक्त केलेला राग समजण्यासारखा असला तरी, बदलत्या हवामानाची ‘रिस्क’ घेऊन अर्ली द्राक्ष घेणाऱ्या उत्पादकांचे प्रतिनिधीत्व करणारे मालेगावचे खासदार सुभाष भामरे यांनाही या बैठकीपासून डावलल्याबद्दल त्यांना वैषम्य वाटू नये? हे देखील अनाकलनीय आहे.

(सदर वृत्तात खासदार गोडसे, भारती पवार यांचे छायाचित्र वापरावे)