शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आरटीओ भ्रष्टाचार अन्य कुठल्या शहरात घडला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:12 IST

आरटीओचे निलंबित मोटार निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी राज्यातील आरटीओ विभागात सुरू असलेल्या गैरव्यवहाराबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात ...

आरटीओचे निलंबित मोटार निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी राज्यातील आरटीओ विभागात सुरू असलेल्या गैरव्यवहाराबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीत परिवहन खात्याचे मंत्री अनिल परब यांच्यासह अवर सचिव, सचिवांपासून वरिष्ठ आरटीओ अधिकाऱ्यांपर्यंत विविध आरोप करण्यात आले आहेत. यामुळे पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी याप्रकरणी गुन्हे शाखेचे उपायुक्त संजय बारकुंड यांना चौकशीचे आदेश दिले होते. यानुसार त्यांनी २७ मेपासून चौकशी सुरू करण्यात आली होती. या चौकशीदरम्यान, तक्रारदारासह ७९ आरटीओ अधिकारी, एक पोलीस अधिकारी, सहा खासगी व्यक्ती अशा एकूण ८६ व्यक्तींचे जाबजबाब पोलिसांकडून नोंदविले गेले. सुमारे पंधरा दिवस चौकशी चालली. या चौकशीतून नेमके काय साध्य झाले? हा प्रश्न अनुत्तरितच राहतो.

---इन्फो--

चौकशीचे १५ दिवस अन‌् पाच हजार पानांचा अहवाल

या चौकशीचा ५ हजार ३०० पानांचा अहवाल तयार करून पाण्डेय यांच्याकडे सोपविला गेला. त्यांनी दहा दिवस या अहवालाची पडताळणी करत विविध आरोप आणि त्यासंबंधी सादर केलेल्या पुराव्यांची शहानिशा केली. दरम्यान, आयुक्तालयाच्या हद्दीत यासंबंधी कुठलाही गुन्हा घडला नसल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याचा खुलासा पोलिसांकडून करण्यात आला. तक्रारीतील विविध तथ्यांनुसार मुद्देसूद अहवाल पाण्डेय यांनी राज्याच्या पोलीस महासंचालक कार्यालयाकडे पाठविला आहे.

---इन्फो--

महासंचालक कार्यालयाच्या निर्णयाकडे लक्ष

आरटीओ भ्रष्टाचाराच्या तक्रारीमधील आरोपांची व्याप्ती राज्यव्यापी आहे. तसेच ज्या व्यक्तींविरुध्द यामध्ये गंभीर आरोप केले गेले आहेत, त्या सर्व व्यक्ती उच्चपदस्थ आहेत. यामुळे शहर पोलिसांकडे आलेल्या तक्रारीची दखल घेत चौकशीचे सत्र राबविले गेले आणि महासंचालक कार्यालयाकडे अंतिम अहवाल पाठविला गेला आहे. या अहवालात तक्रारींमधील तथ्यांनुसार मुद्देसूद बाबी मांडण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी स्पष्ट केल्याने नेमके कोणते तथ्य चौकशीत पुढे आले आहे? हे अद्याप गुलदस्त्यात आहे. यामुळे पोलीस महासंचालक कार्यालयाच्या निर्णयाकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे.