शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

कोणता झेंडा घ्यावा हाती?

By admin | Updated: June 17, 2014 00:10 IST

कोणता झेंडा घ्यावा हाती?

 

शैलेश कर्पे

सिन्नरगेल्या आठवड्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व जनसेवा मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ वाजे यांच्या ‘मातोश्री’वर झालेल्या भेटीचे वृत्त तालुक्यात येऊन धडकल्यानंतर सिन्नरच्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विधानसभा निवडणुकीला अजून सुमारे चार महिन्यांचा कालावधी असताना पक्षांतराचे वारे जोराने वाहू लागल्याचे चित्र आहे. त्यात वाजे यांचा कथित सेनाप्रवेश लांबणीवर पडल्याने व आमदार माणिकराव कोकाटे यांच्या सेनाप्रवेशाची चर्चा म्हणा वा अफवा झडू लागल्याने येथील सारीच राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.लोकसभा निवडणुकीत तालुक्यातील सर्वच नेते पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यासोबत असताना महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांना ५२ हजारांचे मताधिक्य मिळाले. त्यामुळे कितीही नाही म्हटले तरी मोदींचा प्रभाव आणि भगव्या लाटेचा परिणाम तालुक्यातील जनतेने अनुभवला. या लाटेवर स्वार होण्यासाठी विधानसभा लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या सर्वच उमेदवारांची धडपड सुरू झाल्याचे चित्र आहे. युतीच्या संसारात सिन्नर मतदारसंघ शिवसेनेकडे असल्याने शिवसेना प्रवेशासाठी अनेकजण आतुर झाले आहेत. मात्र उमेदवारीचा निर्णय आत्ताच घेतला जाणार नसल्यामुळे साराच संभ्रम दाटला आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवाराला मिळालेले ५२ हजारांचे मताधिक्य सर्वांनाच शिवसेनेकडे आकर्षित करीत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत माणिकराव कोकाटे कॉँग्रेसचे उमेदवार होते तर प्रकाश वाजे यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. या चुरशीच्या लढतीत कोकाटे यांनी निसटता विजय मिळविला होता. यावेळी केंद्रात सत्ताबदल झाल्याने त्याचा कित्ता राज्यात गिरविला जाऊ शकतो या भीतीने कोकाटे गटाने राजाभाऊ वाजे यांच्या संभाव्य सेना प्रवेशाचा काही प्रमाणात का होईना धसका घेतल्याची चर्चा आहे. संभाव्य धोका टाळण्यासाठी वाजे यांच्याऐवजी शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख विजय करंजकर किंवा पंचायत समितीचे सभापती बाळासाहेब वाघ यांना उमेदवारी मिळावी यादृष्टीने काहींनी हालचाली सुरू केल्याचे समजते. तालुक्यात शिवसेनेला असलेले पोषक वातावरण पाहता कोकाटे यांनीच शिवसेनेत प्रवेश करावा यासाठी कोकाटे समर्थकांचा एक गट प्रयत्न करीत असल्याची चर्चा आहे. वाजे यांना शिवसेनेत प्रवेश देण्यापूर्वी शिवसेनेच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांचे मत जाणून घेतले जाणार आहे. त्यामुळे वाजे यांचा सेनाप्रवेश लांबणीवर पडल्याचे कळते. वाजे यांचा सेनाप्रेवश लांबण्यामागे कोकाटे यांच्या शिवसेनाप्रवेशाची अफवा पसरवली जात आहे. मात्र कोकाटे यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसते. कोकाटे यांच्यासोबत दोन हात करण्याचा वाजे यांचा निर्धार असल्याने कोकाटे कोणत्याही पक्षात गेले किंवा आहे तेथेच थांबले तरी वाजे यांची त्यांच्याविरोधातली उमेदवारी निश्चित मानली जात आहे. एकंदरीतच सिन्नरच्या नेत्यांची अवस्था लाटेवर स्वार होण्याची असली तरी महायुतीचे (शिवसेनेचे) तिकीट कोणाला तरी एकालाच मिळणार आहे. त्यामुळे ‘कोणता झेंडा घेऊ हाती?’ अशी अवस्था कोकाटे यांच्यासह वाजे, आव्हाड, वाघ यांची झाली आहे...