शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

कोणता झेंडा घ्यावा हाती?

By admin | Updated: June 17, 2014 00:10 IST

कोणता झेंडा घ्यावा हाती?

 

शैलेश कर्पे

सिन्नरगेल्या आठवड्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व जनसेवा मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ वाजे यांच्या ‘मातोश्री’वर झालेल्या भेटीचे वृत्त तालुक्यात येऊन धडकल्यानंतर सिन्नरच्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विधानसभा निवडणुकीला अजून सुमारे चार महिन्यांचा कालावधी असताना पक्षांतराचे वारे जोराने वाहू लागल्याचे चित्र आहे. त्यात वाजे यांचा कथित सेनाप्रवेश लांबणीवर पडल्याने व आमदार माणिकराव कोकाटे यांच्या सेनाप्रवेशाची चर्चा म्हणा वा अफवा झडू लागल्याने येथील सारीच राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.लोकसभा निवडणुकीत तालुक्यातील सर्वच नेते पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यासोबत असताना महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांना ५२ हजारांचे मताधिक्य मिळाले. त्यामुळे कितीही नाही म्हटले तरी मोदींचा प्रभाव आणि भगव्या लाटेचा परिणाम तालुक्यातील जनतेने अनुभवला. या लाटेवर स्वार होण्यासाठी विधानसभा लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या सर्वच उमेदवारांची धडपड सुरू झाल्याचे चित्र आहे. युतीच्या संसारात सिन्नर मतदारसंघ शिवसेनेकडे असल्याने शिवसेना प्रवेशासाठी अनेकजण आतुर झाले आहेत. मात्र उमेदवारीचा निर्णय आत्ताच घेतला जाणार नसल्यामुळे साराच संभ्रम दाटला आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवाराला मिळालेले ५२ हजारांचे मताधिक्य सर्वांनाच शिवसेनेकडे आकर्षित करीत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत माणिकराव कोकाटे कॉँग्रेसचे उमेदवार होते तर प्रकाश वाजे यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. या चुरशीच्या लढतीत कोकाटे यांनी निसटता विजय मिळविला होता. यावेळी केंद्रात सत्ताबदल झाल्याने त्याचा कित्ता राज्यात गिरविला जाऊ शकतो या भीतीने कोकाटे गटाने राजाभाऊ वाजे यांच्या संभाव्य सेना प्रवेशाचा काही प्रमाणात का होईना धसका घेतल्याची चर्चा आहे. संभाव्य धोका टाळण्यासाठी वाजे यांच्याऐवजी शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख विजय करंजकर किंवा पंचायत समितीचे सभापती बाळासाहेब वाघ यांना उमेदवारी मिळावी यादृष्टीने काहींनी हालचाली सुरू केल्याचे समजते. तालुक्यात शिवसेनेला असलेले पोषक वातावरण पाहता कोकाटे यांनीच शिवसेनेत प्रवेश करावा यासाठी कोकाटे समर्थकांचा एक गट प्रयत्न करीत असल्याची चर्चा आहे. वाजे यांना शिवसेनेत प्रवेश देण्यापूर्वी शिवसेनेच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांचे मत जाणून घेतले जाणार आहे. त्यामुळे वाजे यांचा सेनाप्रवेश लांबणीवर पडल्याचे कळते. वाजे यांचा सेनाप्रेवश लांबण्यामागे कोकाटे यांच्या शिवसेनाप्रवेशाची अफवा पसरवली जात आहे. मात्र कोकाटे यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसते. कोकाटे यांच्यासोबत दोन हात करण्याचा वाजे यांचा निर्धार असल्याने कोकाटे कोणत्याही पक्षात गेले किंवा आहे तेथेच थांबले तरी वाजे यांची त्यांच्याविरोधातली उमेदवारी निश्चित मानली जात आहे. एकंदरीतच सिन्नरच्या नेत्यांची अवस्था लाटेवर स्वार होण्याची असली तरी महायुतीचे (शिवसेनेचे) तिकीट कोणाला तरी एकालाच मिळणार आहे. त्यामुळे ‘कोणता झेंडा घेऊ हाती?’ अशी अवस्था कोकाटे यांच्यासह वाजे, आव्हाड, वाघ यांची झाली आहे...