शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

टाळ वाजवीत कुठे गेली स्वारीऽऽ

By admin | Updated: October 30, 2014 22:28 IST

वासुदेवाचे दर्शन झाले दुर्मीळ

खामखेडा : ‘टिंलम् टिंलम् टाळ वाजवीत आली वासुदेवाची स्वारी...’ असे म्हणत गाव जागवीत मुखी हरिनाम गात जाणारा वासुदेव पूर्वी खेड्यापाड्यात पहाटेच दाखल व्हायचा.. परंतु आता या वासुदेवाचे दर्शन दुर्मीळ झाले आहे.अगदी प्राचीन राजा-राजवाड्याच्या काळापासून वासुदेवाची भूमिका राहत असे. पूर्वी वासुदेव समाजप्रबोधनाचे काम करीत असे. डोक्यावर मोरपिसाची टोपी, गळ्यात मोठमोठ्या मण्यांची माळ, चंदनाचा टिळा, अंगामध्ये अंगरखा, एक टांगी धोतर, एका हातामध्ये टाळी आणि दुसऱ्या हातामध्ये चिपळी असा पेहराव असलेला वासुदेव पूर्वी गावागावांमध्ये सकाळच्या वेळेत नेहमी दिसत असे. हा वासुदेव गावामध्ये आल्यानंतर त्याच्या भोवती लहान मुलांची गर्दी होत असे. वासुदेव प्रत्येक घरासमोर जाऊन मुखी हरिनामाची ओवी गात उभे राहतो. तेव्हा घरामधील सुहासिनी सुपामध्ये धान्य आणून वासुदेवाला दान देत असे. वासुदेव तिच्या संसारचे नाव व कुळ विचारून त्यांच्या नावाचा गजर करून धान्य आपल्या झोळीमध्ये घेत असे.सध्या सटाणा येथे वास्तव्यास असलेल्या वासुदेवाला विचारणा केली असता तो म्हणाला की, पूर्वीचे लोक चांगले आणि मायाळू होते. आमचा आदरभाव केला जात असे. घरासमोर उभे राहताच घरातून ताबडतोब धान्याचे सूप येत असे. परंतु आता काळ बदललेला आहे. काही तरुण मुले आमची चेष्टा करीत टर उडवितात. आमची मुले या व्यवसायाला नाही म्हणतात. त्यांना यात रस नाही. तसेच पूर्वी सर्व लोक गावामध्ये राहत. आता शेतकरी सर्व लोक मळ्यामध्ये राहतात. त्यामुळे अगदी मोजके लोक दानधर्म करतात. प्रत्येक मळ्यामध्ये फिरणे परवडत नाही. तसेच शासनाने आमचा विचार करून आम्हाला थोड्याफार प्रमाणात मानधन सुरू करावे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. (वार्ताहर)