शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
4
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
5
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
6
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
7
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
8
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
9
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
10
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
11
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
12
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
13
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
14
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
15
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
16
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
17
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
18
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
19
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
20
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 

दडलास कुठे रे बापा? : पावसाअभावी पिके मरणासन्न अवस्थेत; नदी-नाले कोरडेठाक; दहा दिवसाआड पाणीपुरवठा

By admin | Updated: August 26, 2015 23:46 IST

बागलाणमधील बळीराजा तदुष्काळाच्या छाये!

नामपूर- पावसाळ्याचे तीन महिने कोरडे गेल्याने पिके मरणासन्न अवस्थेत उभी असल्याचे पाहून बागलाण तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतमालाला भाव नाही, तेल्याने डाळिंबाचा घात केला आणि यंदा पावसाने ओढ दिल्याने तालुक्यावर दुष्काळाचे सावट घोंगावू लागले आहे. दहा दिवसाआड होणारा पाणीपुरवठा व पिकांची बिकट अवस्था असे ‘जीवघेणे’ चित्र तालुक्याने यापूर्वी कधीच पाहिले नसल्याने बळीराजा चिंताक्रांत बनला आहे.प्रारंभीचा अल्प पाऊसवगळता सलग तीन महिने पावसाने ओढ दिल्याने नदी, नाले, धरणे व विहिरी कोरड्याठाक दिसत आहेत. परिणामी पाण्यासाठी सधन समजल्या जाणाऱ्या नामपूरमध्ये सध्या दहा दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने महिलावर्गावर ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ आली आहे. बागलाण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने कांदा हे डाळिंबाखालोखाल महत्त्वाचे पीक मानले जाते. मात्र या भागातील जवळपास ९० टक्के शेतकऱ्यांचा कांदा आधीच विकला गेला आहे. ज्या १० टक्के शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक आहे, त्यांच्या कांद्याला सहा हजारांचा भाव मिळत आहे. कांद्याला बऱ्यापैकी भाव मिळताच दिल्लीश्वरांच्या डोळ्यात पाणी आले आणि ही भाववाढ कमी कशी होईल, त्यादृष्टीने प्रयत्न सुरू झाले. मात्र जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले तरी कोणीही चकार शब्द काढत नसल्याने सर्वसामान्यांत सखेद नाराजी व्यक्त होत आहे.यंदा पावसाळी कांद्यालाही चांगला भाव मिळण्याचा अंदाज वर्तविला जात असला तरी विहिरींनाच पाणी नसल्याने कांदा पिकवायचा कसा या विवंचनेत कांदा उत्पादक सापडले आहेत. पाण्याअभावी कांद्याची पुरेशी लागवड करण्यात अडचणी जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे पावसाळी कांद्याकडून मिळणाऱ्या दोन पैशांच्याही आशा मावळल्या आहेत. मोसम पट्ट्यातील पाण्याची पातळी प्रचंड खालावली आहे. यास वाळू उपसाही कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. मोसम नदीच्या उगमापासून ती ज्या ठिकाणी मिळते या दरम्यान अपवादवगळता मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत आहे. त्यामुळे नदी उघडी, बोडकी व भकास दिसू लागली आहे. वाळूमुळे पाणी संचय होऊन ते जमिनीत जिरायचे, त्यामुळे विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ व्हायची. दरम्यान, सध्या होत असलेला वाळू उपसा कायम असाच सुरू राहिला तर हा परिसर भविष्यात वाळवंट होण्याची भीती व्यक्त होत आहे.सध्या तालुक्यातील शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. शेतकरी व शेतमजुरांच्या हाताला काम नाही. त्याचा थेट परिणाम व्यापारावर झाल्याचे दिसून येत आहे. किराणा, कापड, खते, स्टेशनरी या व्यावसायिकांसह व्यापाऱ्यांनाही त्याचा फटका बसला आहे. यासाठी बागलाण तालुका दुष्काळी जाहीर करून शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा, अशी मागणी स्नेहराज सावंत, समीर सावंत, अण्णासाहेब सावंत व सरपंच भाऊसाहेब सावंत आदिंनी केली आहे.