शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
7
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
8
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
10
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
11
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
12
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
13
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
14
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
15
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
16
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
17
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
18
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
19
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
20
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला

दडलास कुठे रे बापा? : पावसाअभावी पिके मरणासन्न अवस्थेत; नदी-नाले कोरडेठाक; दहा दिवसाआड पाणीपुरवठा

By admin | Updated: August 26, 2015 23:46 IST

बागलाणमधील बळीराजा तदुष्काळाच्या छाये!

नामपूर- पावसाळ्याचे तीन महिने कोरडे गेल्याने पिके मरणासन्न अवस्थेत उभी असल्याचे पाहून बागलाण तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतमालाला भाव नाही, तेल्याने डाळिंबाचा घात केला आणि यंदा पावसाने ओढ दिल्याने तालुक्यावर दुष्काळाचे सावट घोंगावू लागले आहे. दहा दिवसाआड होणारा पाणीपुरवठा व पिकांची बिकट अवस्था असे ‘जीवघेणे’ चित्र तालुक्याने यापूर्वी कधीच पाहिले नसल्याने बळीराजा चिंताक्रांत बनला आहे.प्रारंभीचा अल्प पाऊसवगळता सलग तीन महिने पावसाने ओढ दिल्याने नदी, नाले, धरणे व विहिरी कोरड्याठाक दिसत आहेत. परिणामी पाण्यासाठी सधन समजल्या जाणाऱ्या नामपूरमध्ये सध्या दहा दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने महिलावर्गावर ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ आली आहे. बागलाण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने कांदा हे डाळिंबाखालोखाल महत्त्वाचे पीक मानले जाते. मात्र या भागातील जवळपास ९० टक्के शेतकऱ्यांचा कांदा आधीच विकला गेला आहे. ज्या १० टक्के शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक आहे, त्यांच्या कांद्याला सहा हजारांचा भाव मिळत आहे. कांद्याला बऱ्यापैकी भाव मिळताच दिल्लीश्वरांच्या डोळ्यात पाणी आले आणि ही भाववाढ कमी कशी होईल, त्यादृष्टीने प्रयत्न सुरू झाले. मात्र जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले तरी कोणीही चकार शब्द काढत नसल्याने सर्वसामान्यांत सखेद नाराजी व्यक्त होत आहे.यंदा पावसाळी कांद्यालाही चांगला भाव मिळण्याचा अंदाज वर्तविला जात असला तरी विहिरींनाच पाणी नसल्याने कांदा पिकवायचा कसा या विवंचनेत कांदा उत्पादक सापडले आहेत. पाण्याअभावी कांद्याची पुरेशी लागवड करण्यात अडचणी जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे पावसाळी कांद्याकडून मिळणाऱ्या दोन पैशांच्याही आशा मावळल्या आहेत. मोसम पट्ट्यातील पाण्याची पातळी प्रचंड खालावली आहे. यास वाळू उपसाही कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. मोसम नदीच्या उगमापासून ती ज्या ठिकाणी मिळते या दरम्यान अपवादवगळता मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत आहे. त्यामुळे नदी उघडी, बोडकी व भकास दिसू लागली आहे. वाळूमुळे पाणी संचय होऊन ते जमिनीत जिरायचे, त्यामुळे विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ व्हायची. दरम्यान, सध्या होत असलेला वाळू उपसा कायम असाच सुरू राहिला तर हा परिसर भविष्यात वाळवंट होण्याची भीती व्यक्त होत आहे.सध्या तालुक्यातील शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. शेतकरी व शेतमजुरांच्या हाताला काम नाही. त्याचा थेट परिणाम व्यापारावर झाल्याचे दिसून येत आहे. किराणा, कापड, खते, स्टेशनरी या व्यावसायिकांसह व्यापाऱ्यांनाही त्याचा फटका बसला आहे. यासाठी बागलाण तालुका दुष्काळी जाहीर करून शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा, अशी मागणी स्नेहराज सावंत, समीर सावंत, अण्णासाहेब सावंत व सरपंच भाऊसाहेब सावंत आदिंनी केली आहे.