शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
2
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
3
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! आतापर्यंत ३७ जणांना अटक
4
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
5
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
6
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
7
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
8
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
9
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
10
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
11
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
12
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
13
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
14
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
15
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
16
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
17
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
18
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
19
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
20
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार

केंद्र शासनाने पाठविलेला ऑक्सिजन गेला कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:16 IST

शहरासह जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्सचीदेखील मागणी वाढू लागली आहे. गेल्या सुमारे पंधरा ते वीस ...

शहरासह जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्सचीदेखील मागणी वाढू लागली आहे. गेल्या सुमारे पंधरा ते वीस दिवसांपासून शहरात ऑक्सिजनची टंचाई आहे. त्यामुळे महापालिकेने नवीन रुग्णालयांना ऑक्सिजन बेडसची परवानगी देणेही बंद केले आहे, तर खासगी रुग्णालयांनी रुग्ण दाखल करतानाच ऑक्सिजन पुरवठ्याबाबत अनियमिततेविषयी संमतीपत्रदेखील लिहून घेतल्याचे सांगितले जात आहे. अशा स्थितीत केंद्र शासनाने विशाखापट्टणम येथून ऑक्सिजन एक्स्प्रेसने नाशिक जिल्ह्यासाठी ऑक्सिजन पाठविल्याने दिलासादायक चित्र निर्माण झाले होते. पन्नास टन ऑक्सिजन येणार असल्याचे सुरुवातीला सांगितले गेले. प्रत्यक्षात २८ टन ऑक्सिजन मिळाला. त्यातील साडेचार टन साठा धुळ्याला गेला. उर्वरित साठा नाशिक जिल्ह्यासाठी असला तरी त्याचा वापर नक्की कोठे झाला, असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.

सोमवारी म्हणजे साठा येऊन दोन दिवस झाले तरी ऑक्सिजन कोणकोणत्या रुग्णालयांना गेला हेच स्पष्ट होत नसल्याचे सांगण्यात येत आहे. नाशिक शहरात आलेला ऑक्सिजन सिन्नरच्या दोन आणि नाशिक शहरातील तीन पुरवठादारांना वाटून देण्यात आला आहे आणि सहा टन साठा अति दक्षतेची गरज म्हणून ठेवण्यात आला आहे. मात्र, असे असले तरी रुग्णालयांना गरजेच्या वेळीच जर साठा दिला जाणार नसेल तर हा सहा टन साठा काेणासाठी आहे, हेच स्पष्ट होत नाही, असे अधिकाऱ्यांचेदेखील म्हणणे आहे.

इन्फेा...

जर मुबलकच नाही तर राखीव कोणासाठी?

नाशिक शहरातील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची गरज असलेले रुग्ण मुळातच गंभीर आहेत आणि त्यांनाच जर ऑक्सिजनचा साठा मिळणार नाही, तर राखीव कोणासाठी असा प्रश्नदेखील उपस्थित केला जात आहे. ही दाखल रुग्णांची अवस्था आहे; परंतु ऑक्सिजन नाही त्यामुळे खासगी रुग्णालयात दाखल करून घेतले जात नाही, असे रुग्णसुद्धा अनेक असून त्यांना कधी दिलासा मिळणार, असा प्रश्न आहे.

इन्फो...

हक्काचा साठा वळविल्यानेच टंचाई : फरांदे

केंद्र शासनाने नाशिकसाठी पाठविलेला हक्काचा ऑक्सिजन साठा अन्यत्र वळविण्यात आल्याने नाशिक शहरात ऑक्सिजनअभावी भीषण अवस्था ओढावल्याचा आरोप भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी केला आहे. यासंदर्भात फरांदे यांनी मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री आणि पालकमंत्री यांना निवेदन दिले असून, शहरात ऑक्सिजन नसल्याने अनेक रुग्णांना घेऊन जाण्याच्या सूचना रुग्णालयांनी केल्या आहेत. त्यामुळे तातडीने ऑक्सिजन पुरवठा करावा, अन्यथा मंत्रालयाबाहेर आंदोलन करण्याचा इशाराही फरांदे यांनी दिला आहे.