शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
2
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
3
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
4
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
5
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
6
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
7
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
8
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
9
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
10
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
11
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
12
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
13
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
14
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
15
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
16
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
17
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
18
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
19
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
20
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक

खाल्ली मिसळपाव तर बिघडले कोठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:14 IST

नाशिक : दुकानाचे शटर नुसते किलकिले केले की पाच हजाराचा, सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावल्यास हजार रुपये दंड ...

नाशिक : दुकानाचे शटर नुसते किलकिले केले की पाच हजाराचा, सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावल्यास हजार रुपये दंड तर नियम डावलून उपहार गृह सुरू ठेवल्यास ते कायमस्वरूपी बंद करण्याची शिक्षा आपत्ती व्यवस्थापन कायद्यात नमूद करण्यात आली आहे. अर्थातच गेल्या वर्षभरापासून कोरोना महामारीचा व लॉकडाऊनचा सामना करणाऱ्या प्रत्येक नाशिककरांना आता आपत्ती व्यवस्थापन कायदा तसा चांगला पाठही झाला आहे. तरीही, या कायद्याच्या उल्लंघनाची पावलोपावली घोडचूक करणारे दररोजच पोलीस व महापालिका प्रशासनाला गवसत आहेत. दंड व दंडुक्याचा वापर करून घोडचूक करणाऱ्यांना वेसन घालण्याचे काम अविरत केले जात असून, त्यात फक्त शहरातील जनताच बेदरकार आहे, असे नव्हे तर ग्रामीण भागातदेखील या कायद्याचा आधार घेऊन ग्रामसेवकांकरवी जिल्हा परिषदेमार्फत कारवाई केली जात आहे. हे सारे सांगण्याचे तात्पर्य इतकेच की, वर्षभरापासून अस्तित्वात असलेल्या आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा वापर करण्याचे अधिकार ज्या घटना व्यवस्थापकांना प्रदान करण्यात आले आहेत, त्यांच्या समक्षच या कायद्याचे सर्रास उल्लंघन करण्याचे धाडस सहसा कोणी न्यायप्रिय व्यक्ती करूच शकणार नाही. तसे केल्यास त्याची कोणतीच खैर राहणार नाही, हे नव्याने सांगायला नको; परंतु या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी कायद्याच्याच रक्षकांकडून भररस्त्यात शामियाना उभारला जात असेल व मुदत टळून गेल्यावरही उपहार गृहचालक झणझणीत मिसळ पाव पुरवित असेल तर त्याचा दोष कोणी कोणाला लावायचा? आयोजकांना, सेवा देणाऱ्यांना की, हा सारा प्रकार उघड्या डोळ्यांनी पाहात त्याचा आस्वाद घेणाऱ्यांना?; परंतु असले प्रश्न पडून काही उपयोग होईल, असे मुळात वाटून घेण्याचे कारण नाही. गेल्या वर्षभरापासून कोरोनाशी दोन हात करण्याचे बळ आपल्या हाताखालील अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये भरण्याबरोबरच जनतेलाही त्याबाबत अवगत करण्याचे काम करणारे, प्रसंगी शासनाकडून कानउघाडणी तर प्रसिद्धी माध्यमांकडून केली जाणारी बोचरी टीका सोसूनही खंबीर राहणाऱ्या अधिकाऱ्यांनी वेळात वेळ काढून लालगालिचा, नरम नरम खुर्च्या, आकर्षक कनातीचा मंडपात बसून मिसळचा आस्वाद घेतला तर बिघडले कोठे? लॉकडाऊनच्या काळात जारी करण्यात आलेल्या आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन अधिकाऱ्यांनी नव्हे तर त्यांच्यासाठी सोय करणाऱ्या हाताखालच्या यंत्रणेने केले आहे, बोल लावायचे तर त्यांनाच लावावे लागेल. अधिकारी फक्त निमित्तमात्र होते!