शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

खाल्ली मिसळपाव तर बिघडले कोठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:14 IST

नाशिक : दुकानाचे शटर नुसते किलकिले केले की पाच हजाराचा, सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावल्यास हजार रुपये दंड ...

नाशिक : दुकानाचे शटर नुसते किलकिले केले की पाच हजाराचा, सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावल्यास हजार रुपये दंड तर नियम डावलून उपहार गृह सुरू ठेवल्यास ते कायमस्वरूपी बंद करण्याची शिक्षा आपत्ती व्यवस्थापन कायद्यात नमूद करण्यात आली आहे. अर्थातच गेल्या वर्षभरापासून कोरोना महामारीचा व लॉकडाऊनचा सामना करणाऱ्या प्रत्येक नाशिककरांना आता आपत्ती व्यवस्थापन कायदा तसा चांगला पाठही झाला आहे. तरीही, या कायद्याच्या उल्लंघनाची पावलोपावली घोडचूक करणारे दररोजच पोलीस व महापालिका प्रशासनाला गवसत आहेत. दंड व दंडुक्याचा वापर करून घोडचूक करणाऱ्यांना वेसन घालण्याचे काम अविरत केले जात असून, त्यात फक्त शहरातील जनताच बेदरकार आहे, असे नव्हे तर ग्रामीण भागातदेखील या कायद्याचा आधार घेऊन ग्रामसेवकांकरवी जिल्हा परिषदेमार्फत कारवाई केली जात आहे. हे सारे सांगण्याचे तात्पर्य इतकेच की, वर्षभरापासून अस्तित्वात असलेल्या आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा वापर करण्याचे अधिकार ज्या घटना व्यवस्थापकांना प्रदान करण्यात आले आहेत, त्यांच्या समक्षच या कायद्याचे सर्रास उल्लंघन करण्याचे धाडस सहसा कोणी न्यायप्रिय व्यक्ती करूच शकणार नाही. तसे केल्यास त्याची कोणतीच खैर राहणार नाही, हे नव्याने सांगायला नको; परंतु या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी कायद्याच्याच रक्षकांकडून भररस्त्यात शामियाना उभारला जात असेल व मुदत टळून गेल्यावरही उपहार गृहचालक झणझणीत मिसळ पाव पुरवित असेल तर त्याचा दोष कोणी कोणाला लावायचा? आयोजकांना, सेवा देणाऱ्यांना की, हा सारा प्रकार उघड्या डोळ्यांनी पाहात त्याचा आस्वाद घेणाऱ्यांना?; परंतु असले प्रश्न पडून काही उपयोग होईल, असे मुळात वाटून घेण्याचे कारण नाही. गेल्या वर्षभरापासून कोरोनाशी दोन हात करण्याचे बळ आपल्या हाताखालील अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये भरण्याबरोबरच जनतेलाही त्याबाबत अवगत करण्याचे काम करणारे, प्रसंगी शासनाकडून कानउघाडणी तर प्रसिद्धी माध्यमांकडून केली जाणारी बोचरी टीका सोसूनही खंबीर राहणाऱ्या अधिकाऱ्यांनी वेळात वेळ काढून लालगालिचा, नरम नरम खुर्च्या, आकर्षक कनातीचा मंडपात बसून मिसळचा आस्वाद घेतला तर बिघडले कोठे? लॉकडाऊनच्या काळात जारी करण्यात आलेल्या आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन अधिकाऱ्यांनी नव्हे तर त्यांच्यासाठी सोय करणाऱ्या हाताखालच्या यंत्रणेने केले आहे, बोल लावायचे तर त्यांनाच लावावे लागेल. अधिकारी फक्त निमित्तमात्र होते!