शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

खाल्ली मिसळपाव तर बिघडले कोठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:14 IST

नाशिक : दुकानाचे शटर नुसते किलकिले केले की पाच हजाराचा, सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावल्यास हजार रुपये दंड ...

नाशिक : दुकानाचे शटर नुसते किलकिले केले की पाच हजाराचा, सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावल्यास हजार रुपये दंड तर नियम डावलून उपहार गृह सुरू ठेवल्यास ते कायमस्वरूपी बंद करण्याची शिक्षा आपत्ती व्यवस्थापन कायद्यात नमूद करण्यात आली आहे. अर्थातच गेल्या वर्षभरापासून कोरोना महामारीचा व लॉकडाऊनचा सामना करणाऱ्या प्रत्येक नाशिककरांना आता आपत्ती व्यवस्थापन कायदा तसा चांगला पाठही झाला आहे. तरीही, या कायद्याच्या उल्लंघनाची पावलोपावली घोडचूक करणारे दररोजच पोलीस व महापालिका प्रशासनाला गवसत आहेत. दंड व दंडुक्याचा वापर करून घोडचूक करणाऱ्यांना वेसन घालण्याचे काम अविरत केले जात असून, त्यात फक्त शहरातील जनताच बेदरकार आहे, असे नव्हे तर ग्रामीण भागातदेखील या कायद्याचा आधार घेऊन ग्रामसेवकांकरवी जिल्हा परिषदेमार्फत कारवाई केली जात आहे. हे सारे सांगण्याचे तात्पर्य इतकेच की, वर्षभरापासून अस्तित्वात असलेल्या आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा वापर करण्याचे अधिकार ज्या घटना व्यवस्थापकांना प्रदान करण्यात आले आहेत, त्यांच्या समक्षच या कायद्याचे सर्रास उल्लंघन करण्याचे धाडस सहसा कोणी न्यायप्रिय व्यक्ती करूच शकणार नाही. तसे केल्यास त्याची कोणतीच खैर राहणार नाही, हे नव्याने सांगायला नको; परंतु या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी कायद्याच्याच रक्षकांकडून भररस्त्यात शामियाना उभारला जात असेल व मुदत टळून गेल्यावरही उपहार गृहचालक झणझणीत मिसळ पाव पुरवित असेल तर त्याचा दोष कोणी कोणाला लावायचा? आयोजकांना, सेवा देणाऱ्यांना की, हा सारा प्रकार उघड्या डोळ्यांनी पाहात त्याचा आस्वाद घेणाऱ्यांना?; परंतु असले प्रश्न पडून काही उपयोग होईल, असे मुळात वाटून घेण्याचे कारण नाही. गेल्या वर्षभरापासून कोरोनाशी दोन हात करण्याचे बळ आपल्या हाताखालील अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये भरण्याबरोबरच जनतेलाही त्याबाबत अवगत करण्याचे काम करणारे, प्रसंगी शासनाकडून कानउघाडणी तर प्रसिद्धी माध्यमांकडून केली जाणारी बोचरी टीका सोसूनही खंबीर राहणाऱ्या अधिकाऱ्यांनी वेळात वेळ काढून लालगालिचा, नरम नरम खुर्च्या, आकर्षक कनातीचा मंडपात बसून मिसळचा आस्वाद घेतला तर बिघडले कोठे? लॉकडाऊनच्या काळात जारी करण्यात आलेल्या आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन अधिकाऱ्यांनी नव्हे तर त्यांच्यासाठी सोय करणाऱ्या हाताखालच्या यंत्रणेने केले आहे, बोल लावायचे तर त्यांनाच लावावे लागेल. अधिकारी फक्त निमित्तमात्र होते!