शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे जाणारा सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
3
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
4
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
5
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
6
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
7
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
8
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
9
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
10
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
11
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
12
Electric Car: एका चार्जवर ३ देश फिरले, 'या' इलेक्ट्रिक कारची गिनीज बूकमध्ये नोंद होणार!
13
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
14
"सैफ रुग्णालयात असताना करीना कपूरच्या कारवरही हल्ला झाला", रोनित रॉयचा धक्कादायक खुलासा
15
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!
16
Air India Plane Crash: टेकऑफ ते क्रॅश होईपर्यंत 'त्या' ९८ सेकंदात काय झालं?; AAIB चा रिपोर्ट, धक्कादायक खुलासे
17
अमृता सुभाषची झाली फसवणूक? ठळक अक्षरात लिहिलं CHEATED; "ह्याबद्दल बोलूच पण..."
18
अन्न-पाणीही मिळेना, लोकांची होतेय तडफड! गाझामध्ये मदत केंद्राजवळच ७९८ लोकांचा मृत्यू
19
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
20
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र

भाजपा कुठे फेडणार हे पाप?

By admin | Updated: February 12, 2017 00:41 IST

रामदास कदम : सिडकोतील सभेत केली टीका

सिडको : भाजपाने हल्ली गुंडांना पक्षात प्रवेश देऊन त्यांना पवित्र करणे व जनतेला त्रास देण्याचे उद्योग अवलंबिले असून, हे पाप भाजपा कसे फेडणार, असा सवाल पर्यावरण मंत्री व शिवसेना नेते रामदास कदम यांनी केला आहे.महापालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ सिडकोतील प्रभाग क्रमांक २५ मधील शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, श्रमिक सेनेचे शिवाजी भोर, महिला आघाडीच्या महानगरप्रमुख डॉ. शामला दीक्षित, सुभाष गायधनी आदि उपस्थित होते. रामदास कदम पुढे म्हणाले, भाजपा ही गेल्या पंचवीस वर्षांपासून सेनेच्या पाठीत खंजीर खुपसत आहे. देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री हेदेखील सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करीत आहे. अच्छे दिन येतील, देशातील काळेधन बाहेर येईल, असे मोदी सांगत होते. परंतु प्रत्यक्षात असे काहीच झाले नाही. याचा परिणाम सर्वसामान्य जनतेवरच झाला. गोध्रा हत्त्याकांड घडल्यावर नरेंद्र मोदींना भाजपा पक्षातून काढणार होते. तेव्हा शिवसेनाप्रमुखांनी मध्यस्थी करीत मोदींना काढू नये, असे सांगितले. विधानसभेत युती ठेवायची नाही ही भाजपाची चाल होती, परंतु त्यांनी शेवटपर्यंत गाफील ठेवले. यानंतरही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ६३ आमदार निवडून आले. भाजपा सरकार हे वेगळा विदर्भ करण्याची भाषा करीत असून, अखंड महाराष्ट्राची शपथ घेतात. यामुळे यापुढील काळात कोणीही गाफील राहणार नसून, आदेश येताच राजीनामे देणार असल्याचेही कदम यांनी सांगितले.शिवसेनाप्रमुखांनी छगन भुजबळ, नारायण राणे, राज ठाकरे यांना मोठे केले. ज्यांनी ज्यांनी सेनाप्रमुखांना त्रास देण्याचा प्रयत्न केला त्यांचे आज काय हाल होत आहेत, ते सर्वश्रृत आहे. यामुळे येत्या महापालिका निवडणुकीत भाजपासह राष्ट्रवादी, मनसे या पक्षांना भुईसपाट होतील असा दावाही रामदास कदम यांनी केले. यावेळी सेनेचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांनी प्रास्ताविक केले.आभार श्यामकुमार साबळे यांनी मानले. हर्षा बडगुजर व चारूशीला गायकवाड यांनी स्वागत केले. (वार्ताहर)