शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
5
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
6
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
8
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
9
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
10
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
11
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
12
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
13
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
14
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
15
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
16
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
17
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
18
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
19
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
20
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!

आरटीईची प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:15 IST

नाशिक : बालकांचा शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत खासगी विनाअनुदानित व स्वयंअर्थसाहाय्य शाळांमधील आर्थिक दुर्बल व वंचित ...

नाशिक : बालकांचा शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत खासगी विनाअनुदानित व स्वयंअर्थसाहाय्य शाळांमधील आर्थिक दुर्बल व वंचित घटकांतील मुलांसाठी

राखीव २५ टक्के जागांवर २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी सोडत जाहीर झाल्यानंतर प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना आता पुढील प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होणार याची प्रतीक्षा लागली आहे.

प्राथमिक शिक्षण संचालनालयाने ७ एप्रिलला प्रवेशासाठीची सोडत जाहीर केली असून, सोडतीत प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना १५ एप्रिलपासून एसएमएसही प्राप्त झाले आहेत. सोडतीत राज्यातील ८२ हजार १२९ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली असून, यात नाशिकमधील ४२०८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या सर्व विद्यार्थ्यांच्या कागदपत्रे पडताळणीची प्रक्रिया प्रलंबित असून, प्रवेशाची संधी मिळालेल्या या विद्यार्थ्यांच्या पालकांना आता कागदपत्र पडताळणी प्रक्रिया कधी सुरू होणार याची प्रतीक्षा लागली आहे. प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी पडताळणी समितीकडून कागदपत्रांची पडताळणी करून घेणे आवश्यक आहे. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लागू केलेल्या निर्बंधांमुळे सध्या ही सर्व प्रवेशप्रक्रिया ठप्प झाली आहे. दरम्यान, गेल्या वर्षी देशव्यापी टाळेबंदी सुरू असताना प्रवेशप्रक्रिया राबविण्यात आली नाही. टाळेबंदी शिथिल झाल्यावर प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची सूचना संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

इन्फो -

जिल्ह्यातील आरटीईची स्थिती

शाळा - ४५०

उपलब्ध जागा - ४,५४४

प्राप्त अर्ज - १३,३३०

लॉटरीत निवड - ४,२०८