शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

वडाळा परिसरातील गोठे केव्हा हटणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:16 IST

इंदिरानगर : शहरातील सर्वांत जास्त वडाळा गाव परिसरात जनावरांचे गोठे आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न तीस वर्षांपासून ...

इंदिरानगर : शहरातील सर्वांत जास्त वडाळा गाव परिसरात जनावरांचे गोठे आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न तीस वर्षांपासून गंभीर बनत चालला आहे. एक वर्षापूर्वी डिसेंबर महिन्यात जनावरांचे गोठे स्थलांतरित करण्याच्या आदेश देण्यात आला होता; परंतु तेव्हाही केवळ नोटीस वाटप करण्याचाच सोपस्कार करण्यात आला होता. जनावरांचे गोठे हलविण्यास तेव्हाही मुहूर्त लागला नाही. आताही स्थायी समितीत या विषयावर चर्चा झाली आणि सभापतींनी आदेशही दिला. मात्र, गोठे खरोखरच हटतील काय, या विषयावर शंका आहे.

जनावरांच्या गोठ्यातील मलमूत्र नागरिकांच्या घरात शिरत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. वडाळा गाव रस्ता व वडाळा गावातील लोकवस्तीत जनावरांचे गोठे हाेते. महापालिकेच्या कारवाईच्या इशाऱ्यावर काही प्रमाणात गोठे हटविण्यात आले. मात्र, बहुतांश गोठे ‘जैसे थे’ आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाला माणसांपेक्षा जनावरे महत्त्वाचे असल्याचा आरोप संतप्त नागरिकांनी केला आहे. महापालिकेच्या वतीने गोठेधारकांना फक्त नोटिसा बजावण्याचा सोपस्कार पार पाडला जातो.

वडाळागावात जिनतनगर, मेहबूबनगर, अण्णाभाऊ साठेनगर, मुमताजनगर, गुलशननगर यासह रहिवासी परिसर असून, सुमारे बारा हजार लोकवस्ती असलेले वडाळा गाव आहे. सुमारे दहा वर्षांपूर्वी एक ते दोन जनावरांचे गोठे होते. आता त्यांची संख्या चाळीस ते पंचेचाळीसपर्यंत आहे. जनावरांच्या मलमूत्राचा प्रश्न निर्माण होत असल्याने बहुतेक गोठेधारक जनावरांचे मलमूत्र सर्रासपणे गोठ्याबाहेर खड्डा करून किंवा बाहेर सोडून देतात. त्यामुळे पिंगूळ बाग परिसरातील काही नागरिकांच्या घरात मलमूत्र शिरत आहे, तसेच मलमूत्र नाल्यांमध्ये सोडून दिल्याने सदर नाला विविध कॉलनी आणि सोसायट्यांमधून जात असल्याने घाण आणि दुर्गंधी पसरली आहे, तसेच सध्या पाणी जाऊन मलमूत्र दुतर्फा रस्त्यावर वाहत असते. अनेक वेळेस समक्ष भेटून आणि निवेदन देऊनसुद्धा अद्यापि जनावरांचे गोठे हटवले जात नाहीत.

इन्फो..

आयुक्तांचे दौरे की रोड शो?

सुमारे दोन वर्षांपूर्वी तत्कालीन आयुक्तांनी वडाळा गावातील जनावरांच्या गोठ्यांच्या मलमूत्रामुळे नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असल्याने या भागाची पाहणी केली होती. त्यानंतर अद्यापि परिस्थिती ‘जैसे थे’च असल्याने दौरे फक्त ‘रोड शाे’ ठरत आहेत.

इन्फो..

राजकीय विरोध

नाशिक शहरातील बहुतांश ठिकाणी गोठ्यांचा प्रश्न गंभीर आहे; परंतु काही राजकीय नेत्यांचे गोठे असल्याने दरवेळी याबाबत केवळ घोषणाच होते आणि गोठे हटविण्याचा विषय मागे पडतो. त्यामुळे आताही कार्यवाही होईल की नाही, याबाबत सांशकताच आहे.