शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

उड्डाणपुलाखालील गुंता सुटणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 01:01 IST

नाशिक : अरुंद चौकात फळविक्रेत्यांची रस्त्यातच दुकानदारी, रिक्षांचा थांबा, वाहनांचा गराडा अन् बेशिस्त वाहतूक अशा विविध कारणांमुळे वडाळा रस्त्याच्या प्रारंभी उड्डाणपुलाखाली होणारा वाहतुकीचा गुंता सुटणार कधी? असा प्रश्न त्रस्त नागरिकांकडून विचारला जात आहे. वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे दररोज या चौकात लहान-मोठ्या अपघातांच्या घटना घडतात; मात्र याकडे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे दुर्लक्ष ...

ठळक मुद्देवडाळारोड कॉर्नर : चौफुली ओलांडताना अपघात; कोंडी नित्याचीच

नाशिक : अरुंद चौकात फळविक्रेत्यांची रस्त्यातच दुकानदारी, रिक्षांचा थांबा, वाहनांचा गराडा अन् बेशिस्त वाहतूक अशा विविध कारणांमुळे वडाळा रस्त्याच्या प्रारंभी उड्डाणपुलाखाली होणारा वाहतुकीचा गुंता सुटणार कधी? असा प्रश्न त्रस्त नागरिकांकडून विचारला जात आहे. वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे दररोज या चौकात लहान-मोठ्या अपघातांच्या घटना घडतात; मात्र याकडे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे दुर्लक्ष होत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.मुंबई महामार्गावरील द्वारका-मुंबई नाक्याकडून येणारी वाहतूक, वडाळा-पाथर्डी रस्त्यावरून ये-जा करणारी वाहने, दोन्ही समांतर रस्त्यावरील वर्दळीमुळे या चौकात दिवसभर वाहनांची कोंडी होते. प्रत्येक वाहनधारक एकमेकांचे वाहन चुकवून वाट काढण्याचा प्रयत्न करत असतो. यावेळी बेशिस्त रिक्षाचालक तसेच शहरात इतरत्र जाणारे वाहनचालक या चौकातून मार्ग बदलतात. मुंबईनाक्याकडून येणारी वाहने शालिमारकडे जाताना थेट चौकातून वळण घेत द्वारकेचा वळसा वाचवितात आणि वडाळानाकामार्गे सारडासर्कलकडे रवाना होतात. तसेच या चौकातच फळविक्रेते व्यवसाय उड्डाणपुलाच्या खांबांच्या आधारे हातगाडी लावून करत असल्याने फळे खरेदी करण्यासाठी दुचाकीस्वार रस्त्यात वाहने थांबवितात. यामुळे अपघाताच्या घटना येथे सातत्याने घडतात. अरुंद चौक असल्यामुळे वडाळा-पाथर्डी रस्त्याच्या प्रारंभी रिक्षाथांब्यापासून, तर संपूर्ण उड्डाणपुलाखाली वाहतुकीचा फज्जा उडालेला दिसतो. दोन्ही समांतर रस्त्यांवरील वाहतूक, महामार्गावरील वाहने आणि वडाळा रस्त्यावरून येणारी वाहतूक या चौकात समोरासमोर येऊन अपघाताच्यासिग्नल केवळ शोभेपुरताया चौकातील वाहतूक सुरक्षिततेसाठी व वाहनकोंडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शहर वाहतूक नियंत्रण शाखेने सिग्नल मंजूर करून त्याची उभारणी महापालिके च्या माध्यमातून करून घेतली आहे; मात्र हे सिग्नल अद्याप कार्यान्वित होण्याच्या प्रतीक्षेत असल्याने सध्या सिग्नल केवळ शोभेपुरताच ठरत आहे. सिग्नल कार्यान्वित झाल्यानंतर वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होईल, असे नागरिकांचे म्हणणे आहे.घटनांना निमंत्रण मिळते.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी