शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाणपुलाखालील गुंता सुटणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 01:01 IST

नाशिक : अरुंद चौकात फळविक्रेत्यांची रस्त्यातच दुकानदारी, रिक्षांचा थांबा, वाहनांचा गराडा अन् बेशिस्त वाहतूक अशा विविध कारणांमुळे वडाळा रस्त्याच्या प्रारंभी उड्डाणपुलाखाली होणारा वाहतुकीचा गुंता सुटणार कधी? असा प्रश्न त्रस्त नागरिकांकडून विचारला जात आहे. वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे दररोज या चौकात लहान-मोठ्या अपघातांच्या घटना घडतात; मात्र याकडे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे दुर्लक्ष ...

ठळक मुद्देवडाळारोड कॉर्नर : चौफुली ओलांडताना अपघात; कोंडी नित्याचीच

नाशिक : अरुंद चौकात फळविक्रेत्यांची रस्त्यातच दुकानदारी, रिक्षांचा थांबा, वाहनांचा गराडा अन् बेशिस्त वाहतूक अशा विविध कारणांमुळे वडाळा रस्त्याच्या प्रारंभी उड्डाणपुलाखाली होणारा वाहतुकीचा गुंता सुटणार कधी? असा प्रश्न त्रस्त नागरिकांकडून विचारला जात आहे. वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे दररोज या चौकात लहान-मोठ्या अपघातांच्या घटना घडतात; मात्र याकडे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे दुर्लक्ष होत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.मुंबई महामार्गावरील द्वारका-मुंबई नाक्याकडून येणारी वाहतूक, वडाळा-पाथर्डी रस्त्यावरून ये-जा करणारी वाहने, दोन्ही समांतर रस्त्यावरील वर्दळीमुळे या चौकात दिवसभर वाहनांची कोंडी होते. प्रत्येक वाहनधारक एकमेकांचे वाहन चुकवून वाट काढण्याचा प्रयत्न करत असतो. यावेळी बेशिस्त रिक्षाचालक तसेच शहरात इतरत्र जाणारे वाहनचालक या चौकातून मार्ग बदलतात. मुंबईनाक्याकडून येणारी वाहने शालिमारकडे जाताना थेट चौकातून वळण घेत द्वारकेचा वळसा वाचवितात आणि वडाळानाकामार्गे सारडासर्कलकडे रवाना होतात. तसेच या चौकातच फळविक्रेते व्यवसाय उड्डाणपुलाच्या खांबांच्या आधारे हातगाडी लावून करत असल्याने फळे खरेदी करण्यासाठी दुचाकीस्वार रस्त्यात वाहने थांबवितात. यामुळे अपघाताच्या घटना येथे सातत्याने घडतात. अरुंद चौक असल्यामुळे वडाळा-पाथर्डी रस्त्याच्या प्रारंभी रिक्षाथांब्यापासून, तर संपूर्ण उड्डाणपुलाखाली वाहतुकीचा फज्जा उडालेला दिसतो. दोन्ही समांतर रस्त्यांवरील वाहतूक, महामार्गावरील वाहने आणि वडाळा रस्त्यावरून येणारी वाहतूक या चौकात समोरासमोर येऊन अपघाताच्यासिग्नल केवळ शोभेपुरताया चौकातील वाहतूक सुरक्षिततेसाठी व वाहनकोंडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शहर वाहतूक नियंत्रण शाखेने सिग्नल मंजूर करून त्याची उभारणी महापालिके च्या माध्यमातून करून घेतली आहे; मात्र हे सिग्नल अद्याप कार्यान्वित होण्याच्या प्रतीक्षेत असल्याने सध्या सिग्नल केवळ शोभेपुरताच ठरत आहे. सिग्नल कार्यान्वित झाल्यानंतर वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होईल, असे नागरिकांचे म्हणणे आहे.घटनांना निमंत्रण मिळते.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी