शहरं
Join us  
Trending Stories
1
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
2
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
3
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
4
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
5
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
6
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
7
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
8
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
9
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
10
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
11
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
12
Rohini Acharya : "मला घाणेरड्या शिव्या दिल्या, मारायला चप्पल उचलली, आई-वडिलांना..."; रोहिणी यांची भावुक पोस्ट
13
प्यार किया तो डरना क्या! ८३ वर्षीय आजीच्या प्रेमात वेडा झाला २३ वर्षांचा तरुण, कुटुंबाने दिली साथ
14
याला म्हणतात धमाका शेअर...! फक्त 2 वर्षांत दिला 16000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल आता 5 बोनस शेअर वाटणार कंपनी
15
जैश टेरर मॉड्यूलवर मोठी कारवाई: अनंतनागमध्ये छाप्यानंतर हरियाणाची महिला डॉक्टर ताब्यात
16
अ‍ॅसिड फेकलं, छतावरुन ढकललं; 'तो' वाद टोकाला गेला, नवरा थेट बायकोच्या जीवावर उठला
17
Mumbai: वाकोला ते बीकेसी उन्नत मार्गाचे ८० टक्के काम पूर्ण; लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार!
18
गोरखपूरमध्ये उभारलं जातंय जागतिक दर्जाचे विज्ञान उद्यान; योगी सरकारने घेतला मोठा निर्णय
19
National Jamboree: ६१ वर्षांनंतर लखनौत ऐतिहासिक 'राष्ट्रीय जंबोरी'; ३२,००० हून अधिक स्काउट्स होणार सहभागी
20
घरबसल्या पैसे दुप्पट कसे होतील? तेजस्वी प्रकाशने सांगितला फॉर्म्युला, मुलींना दिला आर्थिक सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाणपुलाखालील गुंता सुटणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 01:01 IST

नाशिक : अरुंद चौकात फळविक्रेत्यांची रस्त्यातच दुकानदारी, रिक्षांचा थांबा, वाहनांचा गराडा अन् बेशिस्त वाहतूक अशा विविध कारणांमुळे वडाळा रस्त्याच्या प्रारंभी उड्डाणपुलाखाली होणारा वाहतुकीचा गुंता सुटणार कधी? असा प्रश्न त्रस्त नागरिकांकडून विचारला जात आहे. वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे दररोज या चौकात लहान-मोठ्या अपघातांच्या घटना घडतात; मात्र याकडे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे दुर्लक्ष ...

ठळक मुद्देवडाळारोड कॉर्नर : चौफुली ओलांडताना अपघात; कोंडी नित्याचीच

नाशिक : अरुंद चौकात फळविक्रेत्यांची रस्त्यातच दुकानदारी, रिक्षांचा थांबा, वाहनांचा गराडा अन् बेशिस्त वाहतूक अशा विविध कारणांमुळे वडाळा रस्त्याच्या प्रारंभी उड्डाणपुलाखाली होणारा वाहतुकीचा गुंता सुटणार कधी? असा प्रश्न त्रस्त नागरिकांकडून विचारला जात आहे. वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे दररोज या चौकात लहान-मोठ्या अपघातांच्या घटना घडतात; मात्र याकडे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे दुर्लक्ष होत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.मुंबई महामार्गावरील द्वारका-मुंबई नाक्याकडून येणारी वाहतूक, वडाळा-पाथर्डी रस्त्यावरून ये-जा करणारी वाहने, दोन्ही समांतर रस्त्यावरील वर्दळीमुळे या चौकात दिवसभर वाहनांची कोंडी होते. प्रत्येक वाहनधारक एकमेकांचे वाहन चुकवून वाट काढण्याचा प्रयत्न करत असतो. यावेळी बेशिस्त रिक्षाचालक तसेच शहरात इतरत्र जाणारे वाहनचालक या चौकातून मार्ग बदलतात. मुंबईनाक्याकडून येणारी वाहने शालिमारकडे जाताना थेट चौकातून वळण घेत द्वारकेचा वळसा वाचवितात आणि वडाळानाकामार्गे सारडासर्कलकडे रवाना होतात. तसेच या चौकातच फळविक्रेते व्यवसाय उड्डाणपुलाच्या खांबांच्या आधारे हातगाडी लावून करत असल्याने फळे खरेदी करण्यासाठी दुचाकीस्वार रस्त्यात वाहने थांबवितात. यामुळे अपघाताच्या घटना येथे सातत्याने घडतात. अरुंद चौक असल्यामुळे वडाळा-पाथर्डी रस्त्याच्या प्रारंभी रिक्षाथांब्यापासून, तर संपूर्ण उड्डाणपुलाखाली वाहतुकीचा फज्जा उडालेला दिसतो. दोन्ही समांतर रस्त्यांवरील वाहतूक, महामार्गावरील वाहने आणि वडाळा रस्त्यावरून येणारी वाहतूक या चौकात समोरासमोर येऊन अपघाताच्यासिग्नल केवळ शोभेपुरताया चौकातील वाहतूक सुरक्षिततेसाठी व वाहनकोंडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शहर वाहतूक नियंत्रण शाखेने सिग्नल मंजूर करून त्याची उभारणी महापालिके च्या माध्यमातून करून घेतली आहे; मात्र हे सिग्नल अद्याप कार्यान्वित होण्याच्या प्रतीक्षेत असल्याने सध्या सिग्नल केवळ शोभेपुरताच ठरत आहे. सिग्नल कार्यान्वित झाल्यानंतर वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होईल, असे नागरिकांचे म्हणणे आहे.घटनांना निमंत्रण मिळते.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी